शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 10:59 IST

Airport Kolhapur- कोल्हापूर येथील कोल्हापूर विमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.

ठळक मुद्देकोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाबाबत महिन्याभरात बैठक! पंतप्रधान कार्यालयाकडे प्रस्ताव : सुरेश प्रभू यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी घोषणा

कोल्हापूर : येथील कोल्हापूरविमानतळाचे छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत दिल्ली येथे महिन्याभरात बैठक होण्याची शक्यता आहे. नागरी उड्डयन खात्याने या विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला आहे. तत्कालीन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दोन वर्षांपूर्वी या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याची घोषणा केली होती.कोल्हापूर विमानतळ सुरू करण्यात छत्रपती राजाराम महाराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या विमानतळास त्यांचे नाव देण्यासाठी राजारामपुरी व्यापारी असोसिएशन, राष्ट्रीय मोडी विकास प्रबोधिनी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून गेल्या २२ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.

या विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा ठराव दि. २७ मार्च २०१८ रोजी विधिमंडळात करण्यात आला. हा ठराव राज्य शासनाने नागरी विमान वाहतूक विभागाकडे पाठविला. त्यानंतर दि. २ फेब्रुवारी २०१९ रोजी विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही नामकरणाची घोषणा केली. त्यावर पुढे नागरी उड्डयन खात्याने नामकरणाचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविला.

आता या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे. औरंगाबाद येथील खासदार डॉ. भागवत कराड यांनी नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांची भेट घेतली. त्यावर शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबादसह अन्य १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आले असल्याची माहिती मंत्री पुरी यांनी दिली. मंत्रिमंडळाची बैठक महिन्याभरात होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याबाबत महिन्याभरात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. या नामकरणासाठी गेल्या २२ वर्षांपासून आम्ही पाठपुरावा करीत आहोत. नामकरणाची अंमलबजावणी सरकारकडून लवकर व्हावी.- ललित गांधी,अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर