शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातही, आंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:18 IST

उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे.

ठळक मुद्देबीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातहीआंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक शरद पवार उपस्थित राहणार

विश्र्वास पाटील कोल्हापूर : उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे. 

स्वत: इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील,जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, आदी सदस्य त्यास उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रात सध्या १०१ सहकारी व ८७ खासगी कारखाने हंगाम घेतात. एक काळ असा होता की, ऊस हंगाम किमान सहा महिने चालत असे; परंतु आता कारखान्यांची वाढलेली संख्या, लवकर ऊस गाळप करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता यांमुळे गाळप हंगाम चार ते साडेचार महिन्यांवर आले आहे.

कर्नाटकात तर खासगी कारखाने ‘जे काही गाळप करायचे ते १०० दिवसांत करून घ्या,’ हा पॅटर्न राबवीत आहेत. त्यामुळे १०० दिवस हंगाम आणि वर्षाचा खर्च करावा लागत आहे. म्हणून उसाचा हंगाम झाल्यानंतर आणखी किमान दोन-तीन महिने तीच यंत्रणा वापरून आपण बिटापासून साखरनिर्मिती करू शकू का, असा विचार पुढे आला आहे.

शरद पवार व ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख मध्यंतरी युरोपमध्ये जाऊन बिटापासून साखरनिर्मिती कशी होते, त्यातील तंत्रज्ञान व ते महाराष्ट्रात वापरायचे झाल्यास काय करावे लागेल, हे प्रत्यक्ष पाहून आले आहेत. त्यासंबंधीचे सादरीकरण या बैठकीत होणार आहे. ‘व्हीएसआय’ राजारामबापू साखर कारखाना (वाळवा), समर्थ शुगर (जालना) येथे बीट उत्पादनाचे गेली दोन वर्षे प्रयोग घेत आहे.

यंदा तो बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या क्षेत्रात घेतला जात आहे. वेगवेगळ्या हवामानांत हे पीक कसे येते, याचा संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. बीटपासून साखर म्हणजे ऊस बंद असे नाही तर उसाचा हंगाम संपल्यानंतर बंद ठेवाव्या लागणाऱ्या यंत्रणेचा वापर करून उत्पादन घेणे व उत्पादन खर्च कमी करणे व त्यातून शेतकऱ्यालाच चार पैसे कसे जास्त मिळतील असा यामागे विचार आहे. साखर उत्पादन जास्त झाले तरीही त्यापासून इथेनॉल करता येते; त्यामुळे त्यासाठीही घाबरण्याचे कारण नाही.

 ‘व्हीएसआय’ची वार्षिक सभा १५ डिसेंबरला पुण्यातील मांजरी येथील मुख्यालयात होत आहे. तिथेही या विषयाचे सादरीकरण केले जाणार आहे.  उद्या, रविवारी होणाऱ्या  मंडळाच्या बैठकीस ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, अरुण लाड, विजयसिंह मोहिते-पाटील, शंकरराव कोल्हे, गणपतराव तिडके, यशवंतराव गडाख, बी. जी. ठोंबरे, रोहित पवार, नरेंद्र मुरकुंबी हे उपस्थित राहणार आहेत.

एक दृष्टिक्षेपबीट हे साडेचार ते पाच महिन्यांचे पीक असून मुख्यत: ते जास्त थंडी असलेल्या प्रदेशांत चांगले उत्पादित होते. त्यामुळे युरोपमध्ये त्यापासून साखर करणारी कारखानदारी आहे. ब्राझीलसह भारत, थायलंड, आॅस्ट्रेलिया व आफ्रिकन देशांत मुख्यत: उसापासून साखरनिर्मिती होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर