शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातही, आंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 15:18 IST

उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे.

ठळक मुद्देबीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातहीआंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक शरद पवार उपस्थित राहणार

विश्र्वास पाटील कोल्हापूर : उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे. 

स्वत: इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील,जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, आदी सदस्य त्यास उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रात सध्या १०१ सहकारी व ८७ खासगी कारखाने हंगाम घेतात. एक काळ असा होता की, ऊस हंगाम किमान सहा महिने चालत असे; परंतु आता कारखान्यांची वाढलेली संख्या, लवकर ऊस गाळप करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता यांमुळे गाळप हंगाम चार ते साडेचार महिन्यांवर आले आहे.

कर्नाटकात तर खासगी कारखाने ‘जे काही गाळप करायचे ते १०० दिवसांत करून घ्या,’ हा पॅटर्न राबवीत आहेत. त्यामुळे १०० दिवस हंगाम आणि वर्षाचा खर्च करावा लागत आहे. म्हणून उसाचा हंगाम झाल्यानंतर आणखी किमान दोन-तीन महिने तीच यंत्रणा वापरून आपण बिटापासून साखरनिर्मिती करू शकू का, असा विचार पुढे आला आहे.

शरद पवार व ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख मध्यंतरी युरोपमध्ये जाऊन बिटापासून साखरनिर्मिती कशी होते, त्यातील तंत्रज्ञान व ते महाराष्ट्रात वापरायचे झाल्यास काय करावे लागेल, हे प्रत्यक्ष पाहून आले आहेत. त्यासंबंधीचे सादरीकरण या बैठकीत होणार आहे. ‘व्हीएसआय’ राजारामबापू साखर कारखाना (वाळवा), समर्थ शुगर (जालना) येथे बीट उत्पादनाचे गेली दोन वर्षे प्रयोग घेत आहे.

यंदा तो बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या क्षेत्रात घेतला जात आहे. वेगवेगळ्या हवामानांत हे पीक कसे येते, याचा संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. बीटपासून साखर म्हणजे ऊस बंद असे नाही तर उसाचा हंगाम संपल्यानंतर बंद ठेवाव्या लागणाऱ्या यंत्रणेचा वापर करून उत्पादन घेणे व उत्पादन खर्च कमी करणे व त्यातून शेतकऱ्यालाच चार पैसे कसे जास्त मिळतील असा यामागे विचार आहे. साखर उत्पादन जास्त झाले तरीही त्यापासून इथेनॉल करता येते; त्यामुळे त्यासाठीही घाबरण्याचे कारण नाही.

 ‘व्हीएसआय’ची वार्षिक सभा १५ डिसेंबरला पुण्यातील मांजरी येथील मुख्यालयात होत आहे. तिथेही या विषयाचे सादरीकरण केले जाणार आहे.  उद्या, रविवारी होणाऱ्या  मंडळाच्या बैठकीस ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, अरुण लाड, विजयसिंह मोहिते-पाटील, शंकरराव कोल्हे, गणपतराव तिडके, यशवंतराव गडाख, बी. जी. ठोंबरे, रोहित पवार, नरेंद्र मुरकुंबी हे उपस्थित राहणार आहेत.

एक दृष्टिक्षेपबीट हे साडेचार ते पाच महिन्यांचे पीक असून मुख्यत: ते जास्त थंडी असलेल्या प्रदेशांत चांगले उत्पादित होते. त्यामुळे युरोपमध्ये त्यापासून साखर करणारी कारखानदारी आहे. ब्राझीलसह भारत, थायलंड, आॅस्ट्रेलिया व आफ्रिकन देशांत मुख्यत: उसापासून साखरनिर्मिती होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर