शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

औषधी वनस्पतींच्या शेतीचा मार्गदर्शक

By admin | Updated: September 22, 2015 00:33 IST

कृषीक्रांतीचे शिलेदार

संपूर्ण घराण्याला एक संस्कृती असेल, तर मुले थोरांचे अनुकरण करत त्याच मार्गाने जायचा प्रयत्न करतात. कौल घराण्याचा आजही देशातील राजकारणात मोठा दबदबा असला तरी कैलासनाथ कौल यांनी निसर्ग विज्ञानात त्यातही वनस्पतीशास्त्रात एवढे मोठे कार्य करून ठेवले आहे की उद्यानशास्त्रात आणि फलोद्यानशास्त्रात तज्ज्ञ म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते.आई राजमती आणि वडील जवाहर मुल अटल कौल या काश्मिरी पंडित दांपत्याच्या पोटी कैलासनाथ यांचा जन्म १९०५ मध्ये झाला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांचे मेहुणे होते. त्यांचे आजोबा काश्मीर संस्थानचे दिवाण होते. शालेय जीवनात कैलासनाथ विज्ञान वगळता अन्य विषयांचा अभ्यास करीत नसत. गांधीजींच्या प्रेरणेने ते स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले. परिणामी, ब्रिटीश सरकारने त्यांचा खारफूट जमिनीवर केलेल्या संशोधनाचा पीएच.डी. प्रबंध जप्त केला. पुढे १९३७ मध्ये पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्या सल्ल्यावरून त्यांची वनस्पतीतज्ज्ञ म्हणून ब्रिटीश सरकारने नियुक्ती करुन त्यांना अफगाणिस्तान येथे पाठविले. तेथून त्यांच्या या विषयातील कार्याला व संशोधनाला सुरूवात झाली. अफगाणिस्तानात त्यांनी पेशावर कोहात आणि बानू जिल्ह्यात उद्याने उभारण्याचे कार्य केले.लखनौ येथे नॅशनल बोटॅनिकल गार्डन म्हणजेच आजची नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट त्यांनी तयार केली. इंग्लंडमध्ये रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये पहिले भारतीय संशोधक म्हणून काम केले. इंग्लंडमधील विविध विद्यापीठात संशोधन केले. १९६५ पर्यंत राष्ट्रीय उद्यानप्रमुख म्हणून ते कार्य पहात राहिले. त्यांच्या कार्यकाळात लखनौ येथील नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूूट उद्यान जगतातील पहिल्या पाच उद्यानात गणले जात असे. त्यांनी भारताबरोबर अन्य देशांतही उद्याने उभारणीत मोठे कार्य केले. श्रीलंकेतील पॅराडेनिया, इंडोनेशियातील बोगोर, थायलंडमधील बँकॉक उद्यान तसेच सिंगापूर, हाँगकाँग, फिलीपाईन्स येथे उद्याने उभारली. १९५३ ते १९६५ या कालखंडात त्यांनी काराकोरम पर्वतरांगांपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून पूर्व भारत अरुणाचल प्रदेशापर्यंत वनस्पती, पिकांचे सर्वेक्षण करून प्रांत सूची बनवली. फलोद्यानशास्त्र विकसित करण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग केला. त्यांनी काश्मीरमध्ये प्रामुख्याने वाढत असलेल्या दवणा या वनस्पतीवर मूलभूत संशोधन केले. या वनस्पतीपासून मिळणारे सँन्टोनिन व त्याचे औषधी उपयोग शोधून काढले. त्याशिवाय विविध औषधी वनस्पती व त्यांचे शास्त्रशुध्द उत्पादनाचे तंत्र त्यांनी सांगितले. पर्यायाने भारतात औषधी वनस्पतीच्या शेतीस सुरूवात झाली.त्यांनी भारतीय पॉलिओबोटॅनिकल सोसायटीचे अध्यक्ष म्हणून १९६८ मध्ये काम पाहिले. तर १९७५मध्ये कानपूरच्या चंद्रशेखर आझाद अ‍ॅग्रीकल्चरल आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड झाली. भारतात औषधी वनस्पतीच्या किफायती उत्पादनासाठी त्यांनी मोठे कार्य केले. वनस्पतीपासून मिळणारे लाकूड, इंधन, खते, औषधे, पशुखाद्य, रसायने, फर्निचरयुक्त लाकूड, पशुपालन, मृदासंवर्धन आणि सौंदर्यप्रसाधने या सर्व क्षेत्रात संशोधन केले. जगभरातील मोठ्या वैज्ञानिकांच्या संशोधनाचा भारताला कसा उपयोग करून देता येईल याचा ते सातत्याने विचार करायचे. पुढे त्यांच्याच संकल्पनेतून भारतात विज्ञान मंदिराची उभारणी झाली. पुढे शासनाने ही संकल्पना स्कूल आॅफ सायन्स म्हणून स्वीकारली. शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. डॉ. व्ही. एन. शिंदे उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.