शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

कागलची अर्थवाहिनी श्री शिवाजी सोसायटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:44 IST

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : कागल शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कागलचे यशवंतराव घाटगे हे करवीरच्या ...

जहाँगीर शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककागल : कागल शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कागलचे यशवंतराव घाटगे हे करवीरच्या गादीला दत्तक गेले आणि राजर्षी शाहू महाराज म्हणून जगभर लोकमान्यता पावले. कागलचे तत्कालीन अधिपती श्रीमंत सर पिराजीराव घाटगे तथा बापूसाहेब महाराज हे केवळ शाहू छत्रपतींचे बंधूच नव्हते, तर मार्गदर्शकही होते. त्यामुळे जगभरात जे जे बदल, नवनवे उपक्रम पुढे आले, ते ते करवीरबरोबरच कागलमध्येही आले. त्यापैकीच एक सहकारी संस्थांची स्थापना होय. श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराजांच्या जन्माचे औचित्य साधत कागल शहरात दोन संस्थाही जन्मास आल्या. त्यापैकी एक कागल को-आॅप. बँक आणि दुसरी श्री शिवाजी सोसायटी होय. २० जुलै १९१७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने एकशे एक वर्षांचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. गेली शंभर वर्षे ही संस्था ‘कागलच्या शेतकऱ्यांची अर्थवाहिनी’ बनून वाहत आहे. जशी एखादी नदी वरदायिनी बनून आजूबाजूचा परिसर समृद्ध बनविते, तशीच ही सोसायटी अर्थगंगा बनून कागलच्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदायिनी ठरली आहे.इंग्रजांच्या राजवटीत १९०४ मध्ये भारतात सहकार कायदा लागू झाला. प्रामुख्याने सावकारी पाशातून शेतकºयाला मुक्त करण्यासाठी हा कायदा पुढे आला. त्यातून अर्थपुरवठा करणाºया पतपेढींचा उदय होत गेला. कागल जहागिरीतील नोकर लोकांची पतपेढी असे स्थापनेच्या वेळी या सोसायटीचे स्वरूप होते. पुढे जसजशी याची व्याप्ती वाढत गेली, तसे हे स्वरूपही बदलत गेले. १९४७ पर्यंत कागल संस्थानही स्वतंत्रच होते. या कालावधीत या पतपेढीला राजाश्रय लाभल्याने अधिक उलाढाल करण्यास मदत झाली. १९३५ नंतर शेतीपिकासाठी म्हणून कर्ज देण्याची पद्धत सुरू झाली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सहकार चळवळ अधिक व्यापक होत गेली. १९५९ मध्ये या संस्थेचे नाव बदलून श्री शिवाजी विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसायटी असे करण्यात आले. तेथून आजतागायत हे नाव कायम आहे.कागल शहर हे जरी दूधगंगा नदीकाठी असले, तरी १९९० पर्यंत येथे बारमाही पाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे बागायतदार शेतकरी कमी आणि जिरायतदार अधिक असे स्वरूप होते. अशा काळात या संस्थेने पीक कर्जाबरोबरच इंजिन, आॅईल, तेल खरेदीसाठीही अर्थपुरवठा केला. खते, औषधेही दिली जात असत. धान्य दुकान (रेशन) तर आजही सुरू आहे. १९७२ च्या दुष्काळात तर धान्य आणि जनावरांना चाराही पुरवठा करण्याचे काम या संस्थेने केले. १९८० च्या दशकापर्यंत ही संस्था शेती आणि संबंधित शेतकरी एवढ्यापुरतीच मर्यादित होती. तेव्हा संचालकपदासाठी रस्सीखेच होत नव्हती. कागलमध्ये शाहू सहकारी साखर कारखाना सुरू झाल्यानंतर गुºहाळघरे बंद होत गेली. तंबाखू व अन्य पिकांऐवजी ऊस पिकाचा जोर वाढला. थेट नगदी रक्कम खात्यावर येऊ लागल्याने आर्थिक व्यवहारही वाढत गेले. संस्थेत राजकीय गटही निर्माण झाले.सुरुवातीला विक्रमसिंह घाटगे यांना मानणारा संचालकांचा गट या संस्थेत आला. त्यातून मंडलिक-घाटगे असा राजकीय संघर्ष सुरू झाला. १९९० नंतर दूधगंगा नदीला बारमाही पाणी आले आणि संस्थेचाही आर्थिक प्रवास वेगवान होत गेला. संस्थेचे संचालक असलेले हसन मुश्रीफ हे जिल्हा बँकेचे संचालक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष झाले. त्यातून ही संस्था अधिकच समृद्ध होत गेली. सध्या या संस्थेचे नेतृत्व आ. मुश्रीफ हेच करीत आहेत. १९१७ ते २०१९ असा हा संस्थेचा बदलता प्रवास खरोखरच देदीप्यमान असा आहे. स्वत:च्या मालकीची दुमजली इमारत, दुकानगाळे, २०० मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेले गोडावून आहे. संपूर्ण संगणकीकरण आणि विविध सेवा-सुविधा ही संस्था पुरवीत आहे. नवनवे बदल स्वीकारीत ही संस्था आजही कागलच्या शेतकºयांसाठी प्रमुख आधारस्तंभ बनून कार्यरत आहे.१९७२ च्या दुष्काळात कागलकरांना दिलासाया संस्थेने १९७२ च्या दुष्काळाच्या झळा कागलवासीयांना कमीत कमी कशा बसतील यासाठी प्रयत्न केले. या काळात विहीर खुदाई, इंजिन खरेदी, तेल, आॅईल, डिझेल पुरवठा, गूळ खरेदी-विक्री मार्गदर्शन तर केलेच, पण तत्कालीन अध्यक्ष भाऊसो भरमकर, सचिव महादेव मंडपे, बाबूराव केनवडेकर थेट भोपाळला गेले. तेथून शिप्पी जोंधळा खरेदी करून आणला. तसेच भोगावती, संकेश्वर भागातून वैरणही खरेदी करून आणून ना नफा-ना तोटा या तत्त्वाने कागलकरांना उपलब्ध करून दिली. म्हैस खरेदीबरोबरच वैरणही पुरवठा केला. दुष्काळाच्या काळात या संस्थेने कागलचे पालकत्वच निभावले.दिग्गज संचालक असलेली सोसायटीही संस्था कागल तालुक्यातील सर्वांत जुनी विकास सेवा संस्था आहे. या संस्थेने अनेकांना राजकीय पटलावर आणण्याचे काम केले आहे. १९७८ ते २००९ पर्यंत आ. हसन मुश्रीफ या संस्थेचे संचालक होते. मंत्रिपदावर असतानाही ते संचालक होते. बाबगोंडा पाटील, चंद्रकांत गवळी, भैया माने, नवीद मुश्रीफ, शिवाजीराव गाडेकर, तात्यासाहेब पाटील, जुन्या काळात कै. भाऊसो भरमकर, दादोबा नाना चौगुले, व्ही. ए. घाटगे, बाळगोंडा गोनुगडे या दिग्गजांचाही उल्लेख येथे करता येईल. असे मातब्बर या संस्थेत संचालक म्हणून राहिले आहेत.