शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्राधिकरणातील ४२ गावांचा एप्रिलपर्यंत ‘मास्टर प्लॅन’ करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:09 IST

दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्राधिकरणाने चांगला आराखडा करून शहरालगतच्या ४२ गावांमध्ये विकास करणे आवश्यक होते; पण याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदला अशा सक्त सूचना सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. यापुढील बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ४२ गावांचा मास्टर प्लॅन करून त्याचे सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करा, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी उपस्थित होते. प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण यांनी सादरीकरण केले. ‘लोकमत’ने या कार्यालयातील भोंगळ कारभाराची सडेतोड वृत्तमालिका लिहून पर्दाफाश केला होता.आमदार अमल महाडिक व चंद्रदीप नरके यांनी पुढील तीन महिन्यांत प्राधिकरण कार्यालयाच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना केली. संजयकुमार चव्हाण यांनी करवीरमधील ३७ व हातकणंगलेमधील ५ अशा ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र महापालिका वगळून १८६.१३ चौरस किलोमीटर. आहे. समाविष्ट ४२ गावांत येत्या काळात दिलेल्या सूचनांनुसार सर्व बाबींचा विचार करून पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन कराअनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा अहवाल सादर करा, ४२ गावांतील सार्वजनिक जागांमधून उत्पन्न कसे घेता येईल याचे नियोजन करा. यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. अनधिकृत कामे थांबविणे, नवीन कामांना मंजुरी, संनियंत्रण यासह नव्याने विकासात्मक कामे हाती घ्या. पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन करताना अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घ्या.कर्मचारी भरती करा..मंत्री आबिटकर यांनी प्राधिकरण कार्यालयाला मंजूर पदसंख्येनुसार सर्व रिक्त पदांची भरती करा. सध्या फक्त ११ जण कार्यरत असून, १६ जागा रिक्त आहेत. गरज पडल्यास कंत्राटी पदभरती करून अनुभवी व कौशल्य असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर