शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: प्राधिकरणातील ४२ गावांचा एप्रिलपर्यंत ‘मास्टर प्लॅन’ करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:09 IST

दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

कोल्हापूर : प्राधिकरणाने चांगला आराखडा करून शहरालगतच्या ४२ गावांमध्ये विकास करणे आवश्यक होते; पण याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशी अहवालातील दोषींवर कारवाई करा, कामे वेळेत पूर्ण करा, अन्यथा कारवाई करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदला अशा सक्त सूचना सोमवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. यापुढील बैठकीत प्राधिकरणाने लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ४२ गावांचा मास्टर प्लॅन करून त्याचे सादरीकरण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करा, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ. संपत खिलारी उपस्थित होते. प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण यांनी सादरीकरण केले. ‘लोकमत’ने या कार्यालयातील भोंगळ कारभाराची सडेतोड वृत्तमालिका लिहून पर्दाफाश केला होता.आमदार अमल महाडिक व चंद्रदीप नरके यांनी पुढील तीन महिन्यांत प्राधिकरण कार्यालयाच्या कामाला गती द्यावी, अशी सूचना केली. संजयकुमार चव्हाण यांनी करवीरमधील ३७ व हातकणंगलेमधील ५ अशा ४२ गावांसाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणाचे एकूण क्षेत्र महापालिका वगळून १८६.१३ चौरस किलोमीटर. आहे. समाविष्ट ४२ गावांत येत्या काळात दिलेल्या सूचनांनुसार सर्व बाबींचा विचार करून पुढील उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन कराअनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा अहवाल सादर करा, ४२ गावांतील सार्वजनिक जागांमधून उत्पन्न कसे घेता येईल याचे नियोजन करा. यापुढे दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा घेतला जाईल. अनधिकृत कामे थांबविणे, नवीन कामांना मंजुरी, संनियंत्रण यासह नव्याने विकासात्मक कामे हाती घ्या. पुढील २०० वर्षांचा विचार करून मास्टर प्लॅन करताना अनुभवी व तांत्रिकदृष्ट्या सक्षम संस्थेची मदत घ्या.कर्मचारी भरती करा..मंत्री आबिटकर यांनी प्राधिकरण कार्यालयाला मंजूर पदसंख्येनुसार सर्व रिक्त पदांची भरती करा. सध्या फक्त ११ जण कार्यरत असून, १६ जागा रिक्त आहेत. गरज पडल्यास कंत्राटी पदभरती करून अनुभवी व कौशल्य असलेल्या व्यक्तींची नियुक्ती करण्यास सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर