शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

‘स्वाभिमानी’ करणार उसाचे मार्केटिंग : राजेंद्र गड्यान्नावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 00:22 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज विभागात कारखानदारांना दराच्या स्पर्धेत उतरण्याचे आवाहनशेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे,

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागात चांगल्या प्रतीचा ऊस असूनदेखील जिल्ह्यासह सीमाभागातील अन्य साखर कारखान्यांपेक्षा या विभागातील शेतकºयांच्या उसाला कमी दर मिळत आहे. त्यामुळे यावर्षी प्रतिटन किमान तीन हजार रुपये दर मिळवून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटना उसाचे मार्केटिंग करणार असून, त्यासाठी गावोगावी जनजागृती मेळावे घेणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी दिली.

जिल्ह्यातील कारखानदार आणि संघटना यांच्यात झालेल्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये दर देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील कारखान्यांची ‘एफआरपी’च कमी बसत असल्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान होणारआहे. म्हणून शेतकºयांच्या फायद्यासाठीच ‘स्वाभिमानी’ उसाचे मार्केटिंग करणार असून, या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी या परिसरातील कारखान्यांनीही ऊस दराच्या स्पर्धेत उतरावे, असे आवाहन केले.

येथील शासकीय विश्रागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संघटनेची भूमिका मांडली. यावेळी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप बेळगुद्री, आजरा तालुकाध्यक्ष तानाजीराव देसाई उपस्थित होते. कारखानदारांच्या नादान कारभारामुळेच गडहिंग्लज परिसरातील ऊस उत्पादकांचे नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.गडहिंग्लज परिसरातील ऊस सर्वाधिक साखर उताºयाचा असूनही कमी गाळप यामुळेचया परिसरातील कारखान्यांचीएफआरपी कमी बसते. मात्र, यंदा परिसरात उसाचे उत्पादन चांगले आहे. जिल्हा पातळीवर ठरलेल्यासूत्रानुसार यावर्षी शेतकºयांना दोन पैसे जादा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकºयांनी ऊस तोडीची घाई करू नये, असे आवाहनही गड्यान्नावर यांनी यावेळी केले.काही कारखाने संपर्कातगेल्यावर्षीचे गाळप आणि उतारा विचारात घेता गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील सर्व कारखान्यांची ‘एफआरपी’ २५०० ते २६०० रुपयांच्या दरम्यान बसते. मात्र, निपाणीच्या हालसिद्धनाथने ३१५१ दर जाहीर केला असून, संकेश्वरच्या हिरण्यकेशीनेही ३००० रुपये दर दिला आहे. त्यामुळे शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठीच आम्ही उसाचे मार्केटिंग करणार असून, काही कारखाने आपल्या संपर्कात आहेत, असा दावाही गड्यान्नावर यांनी यावेळी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप