शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल पावसाळ्यातच, अद्याप १७०० विकास संस्थांच्या निवडणुका प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 11:49 IST

राज्य शासनाने मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा आदेश दिला असला तरी प्रक्रिया राबवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ पाहता सहकार विभागाला ते शक्य झाले नाही. यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विभागातील १५ बाजार समित्यांचा बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर विभागात विकास संस्थांच्या निवडणुकांचा धडाका सुरू असला तरी अद्याप १,७०० संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्य शासनाने मार्चअखेर या संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचा आदेश दिला असला तरी प्रक्रिया राबवण्यासाठी द्यावा लागणारा वेळ पाहता सहकार विभागाला ते शक्य झाले नाही. यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने विभागातील १५ बाजार समित्यांचा बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे.विकास संस्थांच्या निवडणुका घेऊनच बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने सहकारी प्राधिकरणाने विकास संस्थांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्यास सुरुवात केली. मार्चपर्यंत प्रलंबित विकास संस्थांच्या निवडणुका घेऊन एप्रिल, मेमध्ये बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असा प्रयत्न प्राधिकरणाचा होता.मात्र, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे तीन हजार विकास संस्था निवडणुकीस पात्र होत्या. यातील बहुतांशी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध होणार असल्या तरी त्यांच्यासाठी प्रारूप यादीपासून उमेदवारी अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया राबवावीच लागते. त्यासाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी जातो. त्यात मनुष्यबळाची मर्यादा असल्याने अडचणी अधिक आहेत.तरीही आतापर्यंत विभागात २ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजून जवळपास १,७०० संस्थाची निवडणूक व्हायची आहे. यातील बहुतांशी संस्थांची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, सगळ्या संस्थांची प्रक्रिया पूर्ण होण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे विभागातील १५ बाजार समित्यांच्या बिगुल पावसाळ्यातच वाजणार, हे निश्चित आहे. तोपर्यंत अशासकीय मंडळच समित्यांचा गाडा हाकणार आहे.

बँका, पतसंस्थांच्या निवडणुका ठप्प

विकास संस्थांच्या निवडणुका प्राध्यानाने घेण्याचे आदेश प्राधिकरणाचे आहेत. त्यामुळे इतर बँका, पतसंस्थांच्या निवडणुका ठप्प आहेत. विकास संस्थांबरोबर त्यांचीही प्रक्रिया सुरू करण्याबाबत प्राधिकरणाच्या पातळीवर विचार सुरू आहे.

मराठवाडा, विदर्भातील संस्थांकडे निवडणूक निधीच नाही

मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांतील २५ टक्के संस्थांकडे निवडणुकीसाठी निधीच नाही. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका घ्यायच्या कशा? असा पेच सहकारी निवडणूक प्राधिकरणासमोर आहे.

जिल्हानिहाय निवडणुकीस पात्र समित्याकोल्हापूर - ३सातारा- ५सांगली - ७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक