शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

मोर्चामुळे साखर सम्राटांना धडकी भरेल

By admin | Updated: October 8, 2015 01:03 IST

बैठकीत शेट्टींचा इशारा : ‘एफआरपी’ची रक्कम एका हप्त्यात मिळावी

हुपरी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाची, श्रमाची व हक्काची असणारी ‘एफआरपी’ची रक्कम एकाच हप्त्यामध्ये मिळावी, या न्याय्य मागणीसाठी शुक्रवारी (१६ आॅक्टोबर) प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावरती निघणारा मोर्चा इतका भव्य असेल की, हा मोर्चा पाहून राज्यातील साखर सम्राटांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनापासून कामाला लागावे, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हातकणंगले तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष राजाराम देसाई होते. चांदी कारखानदार असोसिएशनच्या हुपरीभूषण य. रा. तथा बापूसाहेब नाईक सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेट्टी म्हणाले, साखर सम्राटांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना लुटण्याचा व लुबाडण्याचा उद्योग चालविला आहे. यापुढेही आता ते शेतकऱ्यांच्या हक्काचे असणाऱ्या ‘एफआरपी’चे तुकडे पाडून रक्कम वितरित करण्याचे षड्यंत्र रचित आहेत. ‘एफआरपी’एक रकमी देणे कायद्याने बंधनकारक असतानाही शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या अपरोक्षच वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपल्या बगलबच्च्यांकरवी एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा बेकायदेशीर ठराव करीत आहेत. आपल्या हक्काची ‘एफआरपी’ची रक्कम एकाच हप्त्यामध्ये मिळावी, अशी सर्वच शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीचे सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज संघटनेकडे शेतकऱ्यांनी आतापर्यंत केले आहेत. येथून पुढेही १६ तारखेपर्यंत जमा होणार आहेत. शेतकऱ्यांचे लाखो अर्ज बैलगाडीतून नेऊन साखर सहसंचालकांना ते देण्यात येणार आहेत. ते म्हणाले, साखर सम्राटांनी सर्वसाधारण सभेत केलेले ठराव शेतकऱ्यांची फसवणूक करून व त्यांना अंधरात ठेवून केल्याचा पर्दापाश शेतकऱ्यांनी संघटनेकडे केलेल्या लाखो अर्जांच्या संख्येवरून स्पष्ट होत आहे. ज्या साखर कारखान्यांनी गत हंगामातील देणी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली नाहीत, त्यांना वठणीवर आणून रक्कम वसूल केली जाणार आहे. देणी भागविल्याशिवाय कारखान्याचे गाळपच काय धुराडेही पेटू दिले जाणार नाही, अशी चोख व्यवस्था आम्ही करणार आहोत. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान काटे, शिवाजी माने, वैभव कांबळे, रमेश भोजकर, अरुण मगदूम, जयकुमार कोले, सागर चौगुले, राजेंद्र कोल्हापूरे, प्रा. जालिंदर पाटील, संतोष जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक बल्लोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर शहराध्यक्ष राजाराम देसाई यांनी आभार मानले.