शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का ?

By admin | Updated: March 20, 2017 23:32 IST

समस्यांचा पाढा : विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या जनता दरबारात नागरिकांचा सवाल

इचलकरंजी : पोलिस खात्याने पोलिस कर्मचाऱ्यांना मार्च एंडिंगचे ‘टार्गेट’ दिले आहे का? असा सवाल करीत शहरातील वाहतुकीच्या समस्या, चौकात उभे राहून टिंगलटवाळी करणाऱ्या टोळ्या, ओपन बार, हातगाड्यांचा त्रास, अशा विविध समस्यांचा पाढाच नागरिकांनी मांडला.इचलकरंजी पोलिस दलाच्यावतीने सोमवारी आयोजित विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी हे प्रश्न मांडले. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख महादेव तांबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जात नांगरे-पाटील यांनी नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या अडचणी मार्च एंडपर्यंत निर्गत कराव्यात, असे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले; अन्यथा गय केली जाणार नाही, असा दमही भरला. पोलिस खात्यांतर्गत पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीसाठी नांगरे-पाटील इचलकरंजीत आले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील पोलिस खाते ‘स्मार्ट’ बनावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगत ‘स्मार्ट’ या शब्दाची व्याख्या सांगितली. त्यामध्ये पोलिस जागरूक असणे, समाजाप्रती संवेदनशील, खात्यासाठी आवश्यक नवनवीन सोयी-सुविधा घेणे. यामध्ये मोबाईल, वाय-फाय, संगणक प्रणाली, सीसीटीव्ही, असे आवश्यक बदल करून घेत पोलिसांनी त्याचा वापर शिकून घ्यावा, अशा सूचना दिल्या असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनी कडक वडिलांच्या भूमिकेत असावे. सावत्र आईच्या भूमिकेत असू नये. सर्व सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेणे आवश्यक असल्याची नांगरे-पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली.जिल्हा पोलिसप्रमुख तांबडे यांनी लोकसंख्या, वाहनसंख्या वाढल्याने वाहतुकीच्या समस्या वाढल्याचे सांगितले. समस्यांना आळा घालण्यासाठी घरातूनही प्रबोधन होण्याची गरज व्यक्त केली. तर महिला अत्याचाराबाबत बोलताना स्त्रीचे नाते बदलले की ती बदलते, असे न करता सासूने आई व सुनेने मुलगी बनावे. त्यामुळे बरेचसे घरगुती अत्याचाराचे प्रश्न संपुष्टात येतील.स्वागत व प्रास्ताविक अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी केले. नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे, सर्व पोलिस न्$ि$िारीक्षक, पोलिस अधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)नागरिकांनी या समस्या मांडल्याशहरात ओपन बारचा प्रश्न गंभीर, हातगाड्यांवर खाण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या पार्किंगचा प्रश्न, चिकन-मटनचा कचरा ओढ्यात टाकला जातो, ओव्हरलोड वाहतूक, असे विविध प्रश्न नागरिकांतून मांडण्यात आले. नांगरे-पाटील यांनी हे प्रश्न आय. जी. स्तरावरील नसल्याचे सांगत स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या.