शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:09 IST

literature Kolhapur- मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे ग्रंथ पुरस्कार वितरण

कोल्हापूर : मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने शनिवारी झालेल्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे, वि.द. कदम, भीमराव धुळुबुळू, गौरी भोगले, दि.बा. पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ कवी अशोक भोईटे, साहित्यिक माधव कामत, विजय तेंडुलकर राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त अनुप जत्राटकर, महात्मा ज्योतीराव फुले राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.शिर्के म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत चालल्याची टीका होत असली तरी मला असे वाटत नाही. आजची नवी पिढी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करत असून झपाटून लेखन करत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारचे साहित्य असावे, याची शिफारस अभ्यास मंडळाने करावी, असे झाल्यास विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवता येईल.यावेळी अशोक भोईटे यांनी कविता सादर केली.

कार्यक्रमात डॉ. सतीश कुमार पाटील, बजरंग देशमुख, वासंती मेरू, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे, वर्षा चौगुले यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब पाटील, स्वाती शिंदे-पवार, जगजित महावंश, मंगेश मंत्री, विठ्ठल सदामते, लवकुमार मुळे, सुनील देसाई, गौतम कांबळे, उमेश सूर्यवंशी, विश्वास सुतार यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह गोविंद पाटील यांनी आभार मानले. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर