शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 18:09 IST

literature Kolhapur- मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे मराठीचा गौरव घराघरांतून केला जावा :डॉ. डी.टी. शिर्के दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे ग्रंथ पुरस्कार वितरण

कोल्हापूर : मराठी ही केवळ भाषा नाही, तर आपले साहित्य आणि संस्कृती आहे, तिला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचे असेल, तिचा गौरव करायचा असेल, तर त्याची सुरुवात घराघरांतून व्हायला हवी. भलेही विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिकत असेल; पण त्याची या साहित्यातील विपुल संपदेशी असलेली नाळ तुटता कामा नये, यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने शनिवारी झालेल्या ग्रंथ पुरस्कार प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सभेचे अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे, वि.द. कदम, भीमराव धुळुबुळू, गौरी भोगले, दि.बा. पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी ज्येष्ठ कवी अशोक भोईटे, साहित्यिक माधव कामत, विजय तेंडुलकर राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त अनुप जत्राटकर, महात्मा ज्योतीराव फुले राज्य वाङ्‌मय पुरस्कारप्राप्त डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.शिर्के म्हणाले, वाचन संस्कृती कमी होत चालल्याची टीका होत असली तरी मला असे वाटत नाही. आजची नवी पिढी मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती करत असून झपाटून लेखन करत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ग्रंथालयात कोणत्या प्रकारचे साहित्य असावे, याची शिफारस अभ्यास मंडळाने करावी, असे झाल्यास विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार साहित्य पोहोचवता येईल.यावेळी अशोक भोईटे यांनी कविता सादर केली.

कार्यक्रमात डॉ. सतीश कुमार पाटील, बजरंग देशमुख, वासंती मेरू, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे, वर्षा चौगुले यांना दक्षिण महाराष्ट्र साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब पाटील, स्वाती शिंदे-पवार, जगजित महावंश, मंगेश मंत्री, विठ्ठल सदामते, लवकुमार मुळे, सुनील देसाई, गौतम कांबळे, उमेश सूर्यवंशी, विश्वास सुतार यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. विनोद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह गोविंद पाटील यांनी आभार मानले. 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर