शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:30 IST

राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न मराठा आरक्षण प्रश्न तातडीने निकाल काढावा

कोल्हापूर : राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.ऐतिहासिक दसरा चौकात गेले सात दिवस मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, भगवान काटे, काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस अ‍ॅड. सुषमा रोटे, आदींनीही आपल्या भाषणात शासनाला टिकेचे लक्ष बनवले.खासदार शेट्टी म्हणाले, मी फक्त मराठा समाजाच्याच नव्हे तर इतरही समाजाचे प्रश्न संसदेत मांडले. हे प्रश्न शेतकऱ्याचे कुणबी पोरं म्हणून मी मांडले आहेत. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने मोर्चे काढल्यानंतरही शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे युवकांचा संयम सुटणारच.

राज्यात सर्व पक्ष व संघटनांचा पाठिंबा असताना हा प्रश्न का सुटत नाही? असाही प्रश्न उपस्थित करून मराठा समाजातील युवकांनी हा प्रश्न संयमाने हाताळावा व शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ पुढे न्यावी, असेही आवाहन केले.

समाजाला शासनाने फसविले : जयवंतराव आवळेमाजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग करणाऱ्या या भाजप सरकारला जागे करणे अवघड झाले आहे; त्यामुळे हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या आयोगांची नावे सांगून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून शासनाकडून मराठा समाजाची फसवणूक सुरू आहे. मराठा समाजाची होत निघालेली दुरवस्था पाहता या समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे, असेही ते म्हणाले.

शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा : संजय घाटगेमराठा समाजाला आरक्षणाबाबत आंदोलने करावी लागतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सांगून माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन ही सामूहिक एकी व ताकद आहे, त्यासमोर कोणाचेही चालणार नाही. समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे; त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

दहा वर्षे काय केले : आंदोलकाचा शेट्टींना प्रश्नदसरा चौकातील आंदोलनाच्या व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी बोलण्यास प्रारंभ करतानाच व्यासपीठासमोर उभारलेल्या एका दऱ्याचे वडगाव येथील आंदोलकाने खडा सवाल करून त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हीही दहा वर्षांत लोकसभेत मराठा आरक्षणाबाबत किती आवाज उठवला’ असा प्रश्न करताच एकच गोंधळ उडाला, तातडीने पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्या आंदोलकास बाजूला नेले; पण त्यामुळे काहीवेळ वातावरण तंग बनले होते.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी