शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Maratha Reservation : मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 11:30 IST

राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.

ठळक मुद्दे मग प्रश्न का सुटत नाही? राजू शेट्टी यांचा प्रश्न मराठा आरक्षण प्रश्न तातडीने निकाल काढावा

कोल्हापूर : राज्यातील सर्व पक्ष, संघटनांचा पाठिंबा मराठा आरक्षणाला असताना मग प्रश्न का सुटत नाही, असा प्रतिप्रश्न करत खासदार राजू शेट्टी यांनी आता मराठा समाजातील युवकांचा संयम सुटला आहे, त्यासाठी तातडीने सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन केले.ऐतिहासिक दसरा चौकात गेले सात दिवस मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नावर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या आंदोलनास पाठिंबा दिला.

यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे, करवीर पंचायत समितीचे सभापती राजू सूर्यवंशी, भगवान काटे, काँग्रेसच्या प्रदेश महिला सरचिटणीस अ‍ॅड. सुषमा रोटे, आदींनीही आपल्या भाषणात शासनाला टिकेचे लक्ष बनवले.खासदार शेट्टी म्हणाले, मी फक्त मराठा समाजाच्याच नव्हे तर इतरही समाजाचे प्रश्न संसदेत मांडले. हे प्रश्न शेतकऱ्याचे कुणबी पोरं म्हणून मी मांडले आहेत. संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात शांततेने मोर्चे काढल्यानंतरही शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे; त्यामुळे युवकांचा संयम सुटणारच.

राज्यात सर्व पक्ष व संघटनांचा पाठिंबा असताना हा प्रश्न का सुटत नाही? असाही प्रश्न उपस्थित करून मराठा समाजातील युवकांनी हा प्रश्न संयमाने हाताळावा व शाहू, फुले, आंबेडकर यांची चळवळ पुढे न्यावी, असेही आवाहन केले.

समाजाला शासनाने फसविले : जयवंतराव आवळेमाजी मंत्री जयवंतराव आवळे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत झोपेचे सोंग करणाऱ्या या भाजप सरकारला जागे करणे अवघड झाले आहे; त्यामुळे हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. वेगवेगळ्या आयोगांची नावे सांगून मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित ठेवून शासनाकडून मराठा समाजाची फसवणूक सुरू आहे. मराठा समाजाची होत निघालेली दुरवस्था पाहता या समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे, असेही ते म्हणाले.

शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा : संजय घाटगेमराठा समाजाला आरक्षणाबाबत आंदोलने करावी लागतात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे सांगून माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन ही सामूहिक एकी व ताकद आहे, त्यासमोर कोणाचेही चालणार नाही. समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे; त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा.

दहा वर्षे काय केले : आंदोलकाचा शेट्टींना प्रश्नदसरा चौकातील आंदोलनाच्या व्यासपीठावर खासदार राजू शेट्टी बोलण्यास प्रारंभ करतानाच व्यासपीठासमोर उभारलेल्या एका दऱ्याचे वडगाव येथील आंदोलकाने खडा सवाल करून त्यांच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हीही दहा वर्षांत लोकसभेत मराठा आरक्षणाबाबत किती आवाज उठवला’ असा प्रश्न करताच एकच गोंधळ उडाला, तातडीने पोलीस व इतर कार्यकर्त्यांनी त्या आंदोलकास बाजूला नेले; पण त्यामुळे काहीवेळ वातावरण तंग बनले होते.

 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी