शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा गरज पडल्यास मोर्चा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 18:27 IST

Maratha Reservation :मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भावना समजून सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा गरज पडल्यास सरकार विरोधात मोर्चा काढण्याची तयारी आहे. असा सूर सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत उमटला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा; अन्यथा गरज पडल्यास मोर्चा काढूशिवाजी पेठेतील सकल मराठा समाजाच्या बैठकीतील सूर

कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची भावना समजून सर्व आमदार, खासदार, आजी-माजी मंत्री,लोकप्रतिनिधी आणि सकल मराठा समाजाचे समन्वयक व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घ्यावा. अन्यथा गरज पडल्यास सरकार विरोधात मोर्चा काढण्याची तयारी आहे. असा सूर सकल मराठा समाजाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत उमटला.आरक्षणासंबंधी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरातील केंद्रीय कार्यालयात राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.खासदार संभाजीराजे यांनी रविवारी (दि.६) रोजी अभिषेक दिनाचे औचित्य साधून रायगडावरून आरक्षणाच्या लढाईची घोषणा केली. त्यानुसार समाजाने ही तयारी केली आहे. जिल्ह्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, उद्योजकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांसोबत अंतिम बैठक घ्यावी, असे मत शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी बैठकीच्या सुरुवातीला मांडले.यावेळी रवींद्र साळुंखे, संजय पडवळे, सुहास साळुंखे, शिवाजीराव चव्हाण, हर्षल सुर्वे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, महेंद्र चव्हाण, वीरेंद्र मंडलिक, शिवाजीराव जाधव, लालासाहेब गायकवाड, राजू जाधव, दिलीप पाटील, हिंदूराव घाडगे, अर्जुन नलवडे, युवराज उलपे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर