शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

रुकडी माणगाव : आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार असून, आरक्षणाशिवाय मराठा समाजातील सामान्य व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ...

रुकडी माणगाव

: आरक्षणासाठी मराठा समाज हक्कदार असून, आरक्षणाशिवाय मराठा समाजातील सामान्य व्यक्तीची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले ते माणगाव, ता. हातकणंगले येथे वैयक्तिक भेटीकरिता आले असता ही प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मराठा समाज प्रामुख्याने शेती व्यवसाय करतो. वर्षानुवर्षे हा व्यवसाय तोट्याचा असल्याने समाजाची सांपत्तिक स्थिती वाईट झाली आहे.

यामुळे तरुणांची प्रगती होणार नसून, पर्यायाने समाजाची प्रगती होणार नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता २0११ साली मी लोकसभेत हा मुद्दा मांडला होता. त्यानंतर हळूहळू या विषयाला वाचा फुटत गेली. महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिले असताना सुप्रीम कोर्ट हे आरक्षण का नाकारत आहे, हे कळत नाही. एकीकडे तामिळनाडूसारख्या राज्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले असताना हा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यास निकाल लागण्यास पंधरा-वीस वर्षे लागतात आणि महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंबधी कोणीतरी याचिका दाखल करतो, त्याला तत्काळ स्टे लागतो, याचे गौडबंगाल कळत नाही. मग सुप्रीम कोर्टही दुजाभाव का करते. केंद्र सरकारचा हा छुपा डाव कळत नसून, मोदी सरकारने या विषयावर उघडपणे चर्चा केली पाहिजे. घटनेत आवश्यक ती दुरुस्ती करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केले पाहिजे.

चौकट

दरम्यान, माजी खासदार राजू शेट्टी हे माणगाव येथे वैयक्तिक भेटीकरिता आल्याची बातमी गावात पसरताच योगायोगाने त्यांचा वाढदिवस देखील उत्साही कार्यकर्त्यांनी साजरा केला. शेट्टी हे सहसा वाढदिवस साजरा करत नाहीत; पण आज तरुण कार्यकर्त्यांच्या हट्टापायी वाढदिवस केक कापून साजरा केला.