शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:55 IST

महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही.

कोल्हापूर : कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या प्रश्नावर आमच्याबरोबर सर्व पक्षाचे आमदार आले. त्यामुळे त्यांना तीन महिने वीज तोडणार नाही, असा निर्णय घ्यावा लागला.नवाब मलिकांची खाती गुपचूपपणे काढून घेतली. तसाच त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. ते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांनी किती दिवस संप करायचा सोमवारी याबाबत सरकारला जाब विचारणार आहे.

मराठा समाजाची फसवणूक सहन करणार नाही

ज्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकडे लक्ष द्या. असे मी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सोडल्यानंतर लगेचच म्हणालाे होतो. पुढे काहीही झालेले नाही. मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्यासुद्धा सुरू करण्यासाठी हे सरकार तयार नाही,  हे सहन करणार नाही. 

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवे

महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनाशी बोलताना केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी