शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:55 IST

महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही.

कोल्हापूर : कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या प्रश्नावर आमच्याबरोबर सर्व पक्षाचे आमदार आले. त्यामुळे त्यांना तीन महिने वीज तोडणार नाही, असा निर्णय घ्यावा लागला.नवाब मलिकांची खाती गुपचूपपणे काढून घेतली. तसाच त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. ते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांनी किती दिवस संप करायचा सोमवारी याबाबत सरकारला जाब विचारणार आहे.

मराठा समाजाची फसवणूक सहन करणार नाही

ज्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकडे लक्ष द्या. असे मी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सोडल्यानंतर लगेचच म्हणालाे होतो. पुढे काहीही झालेले नाही. मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्यासुद्धा सुरू करण्यासाठी हे सरकार तयार नाही,  हे सहन करणार नाही. 

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवे

महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनाशी बोलताना केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी