शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:55 IST

महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही.

कोल्हापूर : कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या प्रश्नावर आमच्याबरोबर सर्व पक्षाचे आमदार आले. त्यामुळे त्यांना तीन महिने वीज तोडणार नाही, असा निर्णय घ्यावा लागला.नवाब मलिकांची खाती गुपचूपपणे काढून घेतली. तसाच त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. ते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांनी किती दिवस संप करायचा सोमवारी याबाबत सरकारला जाब विचारणार आहे.

मराठा समाजाची फसवणूक सहन करणार नाही

ज्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकडे लक्ष द्या. असे मी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सोडल्यानंतर लगेचच म्हणालाे होतो. पुढे काहीही झालेले नाही. मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्यासुद्धा सुरू करण्यासाठी हे सरकार तयार नाही,  हे सहन करणार नाही. 

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवे

महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनाशी बोलताना केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी