शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 10:55 IST

महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही.

कोल्हापूर : कोणालाही राज्यात मध्यावधी निवडणुका नको आहेत. त्यामुळेच मध्यावधीच्या भीतीने अनेक आमदार भाजपमध्ये येऊ शकतात, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या प्रश्नावर आमच्याबरोबर सर्व पक्षाचे आमदार आले. त्यामुळे त्यांना तीन महिने वीज तोडणार नाही, असा निर्णय घ्यावा लागला.नवाब मलिकांची खाती गुपचूपपणे काढून घेतली. तसाच त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सोडणार नाही. संजय राऊत यांच्याबद्दल काहीही बोलणार नाही. दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो, तशी त्यांची अवस्था झाली आहे. ते म्हणाले, एस. टी. कर्मचाऱ्यांनी किती दिवस संप करायचा सोमवारी याबाबत सरकारला जाब विचारणार आहे.

मराठा समाजाची फसवणूक सहन करणार नाही

ज्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत त्या पूर्ण करून घेण्याकडे लक्ष द्या. असे मी खासदार संभाजीराजे यांनी उपोषण सोडल्यानंतर लगेचच म्हणालाे होतो. पुढे काहीही झालेले नाही. मराठा समाजाची फसवणूक आम्ही सहन करणार नाही. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या, त्यासुद्धा सुरू करण्यासाठी हे सरकार तयार नाही,  हे सहन करणार नाही. 

महाविकास आघाडीचे २५ आमदार संपर्कात : दानवे

महाविकास आघाडीचे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, परंतु ते सावरले आणि बहिष्कार टाकला नाही. जशा निवडणुका लागतील, तसे ते सर्वजण भाजपात येतील आणि ते आमच्या संपर्कात असा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनाशी बोलताना केला. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी