शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंब्याने ‘आंबा’ पाडण्याचा डाव उधळला

By admin | Updated: April 29, 2015 00:25 IST

बाजार समितीतील प्रकार : तपासणीवेळी अधिकाऱ्याने स्वत:च पेटीत टाकली कार्बाइड पावडर--आंबा, गुळावरच लक्ष का?

कोल्हापूर : आंबा पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बेकायदेशीर पावडरीचा शोध घेण्यास गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने स्वत:च आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडरची पुडी टाकून विक्रेत्यावर कारवाईचा दंडुका उगारला; पण अधिकाऱ्याचा हा कारनामा दुसऱ्या व्यापाऱ्याने मोबाईलमध्ये टिपल्याने अधिकाऱ्याचे बिंग फुटले आणि हे प्रकरण व्यापाऱ्यांनी धसास लावल्यानंतर अधिकाऱ्याचे धाबे दणाणले.भेसळीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कडक कारवाई करीत नसल्याने भेसळीचे काम बिनबोभाट सुरू आहे. जशी अन्नधान्यात भेसळ होते, तशी फळांमध्येही भेसळ करण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे. आंबा लवकर पिकविण्यासाठी व त्याला गडद पिवळा रंग यावा, यासाठी आंब्याच्या पेटीत कार्बाईड पावडर टाकली जाते. ही पावडर पेटीत उष्णता निर्माण करते व आंब्याला चांगला रंग देते. त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी या पावडरचा वापर करीत असल्याची तक्रार अन्न व भेसळ विभागाकडे येते. त्यानुसार हा विभाग आंबा विक्रेत्यांवर धाडी टाकून चौकशी करतो. मंगळवारी सकाळी नऊ वाजता या विभागाचे दहा -बारा अधिकारी व कर्मचारी बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये आले. त्यांनी सर्व दुकानांतील पेट्यांची तपासणी सुरू केली; पण कोठेच कार्बाईड पावडर सापडली नाही. शेवटच्या दुकानात एका पेटीत कार्बाईड पावडरची पुडी असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत अधिकारी संबंधित व्यापाऱ्याला जाब विचारत होते; पण हा व्यापारी पुरता गोंधळून गेला. कार्बाईड आपण वापरत नसताना ही पुडी आली कोठून, असा प्रश्न त्याला पडला. तरीही कारवाईची सर्व अस्त्रे अधिकाऱ्यांनी बाहेर काढल्यानंतर व्यापाऱ्याला अधिकाऱ्यांवरच संशय आला. अधिकाऱ्यांच्या या करामतीचे एक व्यापारी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत होता. त्याने हे चित्रीकरण दाखविल्यानंतर सर्वच व्यापारी आक्रमक झाले. त्या अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाऊन खास शैलीत समाचार घेतला. अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला; पण आक्रमक व्यापाऱ्यांनी हे प्रकरण ताणून धरले; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कानांवर हा प्रकार घालणार, असा पवित्रा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर यावर पडदा पडला. आमच्या अधिकाऱ्यांनेच आंब्यांच्या पेटीत कार्बाईड पुडी टाकली, असे म्हणून व्यापाऱ्यांनी गोंधळ घातला. गेले आठ दिवस आम्ही बाजार समितीत कार्बाईडचा आंबा येणार नाही, यासाठी कंबर कसली आहे. त्या रागातून व्यापारी खालच्या पातळीवर जाऊन आरोप करीत आहेत, हे चुकीचे आहे. काहीही केले तरी कार्बाईडचा आंबा कोल्हापुरात येणार नाही, यासाठी प्रयत्न करणार आहे. - संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनअन्न व धान्यात राजरोसपणे भेसळ सुरू आहे; पण याकडे हे अधिकारी दुर्लक्ष करतात. कोणीतरी तक्रार केल्याचे पुढे करीत मध्यंतरी गुळाची तपासणी केली. आता आंब्याकडे वळले आहेत. यामागे मोठे अर्थकारण दडल्याची उघड चर्चा आहे.