शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मानधन पंचवीस रूपये...

By admin | Updated: July 24, 2015 00:40 IST

प्रतिष्ठेसाठी लाखोंची उधळपट्टी

सरदार चौगुले - पोर्ले तर्फ ठाणे -लाखो रुपये खर्चून निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्याला मानधनापोटी दरमहा मिळतात अवघे पंचवीस रुपये, तरी सुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य होण्यासाठी चढाओढी काही कमी नाहीत. निवडणुकीच्या चुरशीत विकासकामांच्या चर्चेला तिलांजली मिळते. त्यामुळे गावभागातील महत्त्वाचे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच कायम राहिलेले आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणाचा ‘श्री गणेशा’ करणारा कार्यकर्ता स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी किती मोजेल याचा काही नेम नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक विकासकामांसाठी लढविली जाते की प्रतिष्ठेसाठी, असा प्रश्न ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून पुढे येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील आणि गटातील ताकद दाखविणाऱ्या असतात. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्वच नेत्यांचे या निवडणुकीत बारकाईने लक्ष असते. अलीकडील काही वर्षांत कोणत्याही निवडणुकीत बऱ्यापैकी पैसा असेल, तर जिंकणे सोपे होते, असा समज रुळला आहे. वारेमाप खर्चामुळे निवडणूूक म्हटले की, सामान्य कार्यकर्त्याला धडकी भरते. त्यामुळे गटाला उमेदवार मिळविताना गटनेत्यांची दमछाक होते. गावभागात विभागलेल्या पाचशे हजारांच्या प्रभागात लाखोंची उधळपट्टी करावी लागते. गावच्या विकासाचा कणा असणाऱ्या ग्रामपंचायतीवर आपली सत्ता असावी, असे गावातील गट नेत्यांना वाटत असते. त्यासाठी गटनेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. ग्रामपंचायतीच्या सदस्याने दरमहा सभेला उपस्थिती दर्शविली, तरच पंचवीस रुपये मानधन मिळते. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या मर्जीने विकास निधी मिळाला, तरच गावातील प्रभागाचा विकास, अन्यथा सारा गाव भकास. सरकारच्या पातळीवर मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा गटनेत्यांच्या मर्जीतील सदस्याला मिळतात. त्यामध्ये सदस्यांची चढाओढ असते. अनेक सदस्य ग्रामपंचायतीच्या मासिक उपस्थितीचे सोडाचं, ग्रामसभेला बोलतच नाहीत. सदस्य म्हणून निवडून आलो आहे, गावात ‘पुढारी’पणाचा बाज ठेवत मिरविण्यात पुढे असतात. सत्तेत सहभागी नसणाऱ्या सदस्यांची अवस्था म्हणजे ‘असून घोटाळा, नसून खोळंबा’ अशीच असते. म्हणून ती मिळविण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याची प्रवृत्ती अलीकडच्या निवडणुकीत बळावली आहे. गावातील सत्ता जरूर मिळवा; परंतु ती मिळविण्यासाठी जेवढी ताकद लावता त्यांच्या निम्मी ताकद जर आपल्या प्रभागातील प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी लावली, तर प्रभागाचा विकास तर होईलच शिवाय निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वारेमाप खर्चाला लगाम मिळेल. पंचवीस रुपयांच्या मानधनासाठी की स्वत:च्या प्रतिष्ठेसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या उमेदवारांपुढे समाजसेवा करून निवडणूक लढविणारा सामान्य कार्यकर्ता अर्थिक कोंडमाऱ्यामुळे हताश होऊन प्रचार करीत आहे.