शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
3
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
4
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
5
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
6
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
7
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
8
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
9
टक्कल पडायची आता वाटणार नाही भीती; केसांच्या वाढीसाठी 'हे' आहे सुपरफूड, ठरेल वरदान
10
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
11
रशियाच्या शत्रू जमिनीवर गरजले भारताचे सुखोई ३० जेट; भारतीय पायलटनं उडवलं F15 विमान, चीन चिंतेत
12
Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
13
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
14
IPL स्टार खेळाडूवर अत्याचाराचा आरोप; तर तरुणी ब्लॅकमेल करत असल्याची क्रिकेटरची तक्रार
15
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
16
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
17
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
18
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
19
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
20
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालतीताई किर्लोस्कर यांचे निधन

By admin | Updated: March 14, 2017 00:16 IST

सांगलीत अखेरचा श्वास : व्रतस्थ लेखिका हरपल्याची मान्यवरांची भावना

सांगली : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्यरत राहून लेखनशैलीचा, अध्यापनाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या लेखिका प्रा. मालतीताई शंकरराव किर्लोस्कर (वय ९४) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साहित्य, सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी सायंकाळी विश्रामबाग येथील त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. ज्येष्ठ उद्योजक आणि किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक शंकरराव किर्लोस्कर यांच्या मालतीताई कन्या, तर ज्येष्ठ पत्रकार मुकुंद किर्लोस्कर यांच्या भगिनी होत. त्या अविवाहित होत्या. किर्लोस्करवाडी (ता. पलूस) येथे त्यांचा जन्म झाला. किर्लोस्करवाडी येथे प्राथमिक शिक्षण आणि पुण्याजवळील हिंगणे येथील आण्णासाहेब कर्वे यांच्या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले. सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी तेथेच ३८ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. वाचन आणि लेखन या आवडीच्या प्रांतात त्या रमल्या. वडिलांच्या लेखन साहित्याचा वारसा त्यांनी तितक्याच ताकदीने जपला आणि पुढे नेला. ललित लेखन हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. उत्कट संवेदनशीलता, उत्तम निरीक्षणशक्ती, मानवी संबंधांविषयीची आस्था, उत्फुल्ल विनोदबुद्धी, जाणती रसिकता अशा अनेक गुणधर्मांनी त्यांची लेखनशैली समृद्ध बनली होती. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर, वि. स. खांडेकर, रा. श्री. जोग, वामन मल्हार जोशी अशा अनेक दिग्गज साहित्यिकांचा सहवास त्यांना लाभला. निवृत्तीनंतर विश्रामबाग येथील ‘पसायदान’या निवासस्थानी त्या रहात होत्या. समकालीन साहित्यिकांची त्यांच्या घरी ये-जा असे. साहित्यिक चर्चांच्या मैफलीही त्यांच्या घरी रंगात. वाड़्मयीन नियतकालिके, मासिकांमध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले. ‘फुलांची ओंजळ’ आणि ‘भक्तिभाव’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अखंड लेखन आणि वाचनाचा त्यांचा व्यासंग सांगलीतील जुन्या-नव्या लेखकांवर प्रभाव पाडणारा ठरला. घरी जोपासलेला हजारो पुस्तकांचा संग्रह त्यांनी काही दिवसांपूर्वी विलिंग्डन महाविद्यालयास भेट म्हणून दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले. (प्रतिनिधी)रुग्णालयात गर्दीमालतीतार्इंच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरातील शिक्षण, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालय परिसरात तसेच निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.