शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

सकस पिढीसाठी दुर्गभ्रमंती आवश्यक : अमर आडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 01:28 IST

उत्तम आरोग्य, निश्चय दृढ होण्यासाठी, भूगोल समजण्यासाठी, शिवाजी महाराज समजण्यासाठी दुर्गभ्रमंती आवश्यक आहे. - डॉ. अमर आडके

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद -४५४ किल्ल्यांची माहिती

समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापुरातील आयुर्वेदाचे डॉक्टर म्हणून अमर आडके यांची ओळख; पण त्यापेक्षाही त्यांची जास्त ओळख आहे ती ‘दुर्गभ्रमंती’ करणारा एक भटक्या म्हणून. देशातील ४५४ हून अधिक किल्ले पालथे घालणाऱ्या डॉ. आडके यांचे ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरांवरून’ हे पुस्तक ४ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद.

प्रश्न- किल्ले फिरण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली?उत्तर- अनंत आडके माझे वडील. शेतकरी. त्यांना फिरण्याची खूप आवड होती. त्यांच्यासमवेत मी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या माझ्या मूळ गावातून दंडोबाचा डोंगर, नृसिंहवाडी येथे चालत येत असे. त्यांच्याकडून मला दुर्गभ्रमंतीची प्रेरणा मिळाली.

प्रश्न- हे किल्ले फिरताना हेतू काय ठेवला?उत्तर- वडिलांनी महाभारतातील एक श्लोक मला सांगितला होता.चक्षु: पश्यति रूपाणीमनसा न च चक्षुषा ।।जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीशी एकरूप होणार नाही, तोपर्यंत तुम्हांला डोळे असले तरी तुम्हांला दिसणार नाही. कान असले तरी ऐकू येणार नाही. तुम्ही त्या-त्या गोष्टीशी एकात्म पावण्याची गरज आहे, असा याचा भावार्थ आहे. मी हेच सूत्र लक्षात ठेवले आणि प्रत्येक किल्ल्याशी तादात्म्य पावत तो किल्ला पाहिला. सुरुवातीला धाडसाने, मग कुतूहलाने भ्रमंती केली. अभ्यास करण्यासाठी आणि आता एका ध्यासाने दुर्गभ्रमंती करत आहे.

प्रश्न- सुरुवात कशी केली?उत्तर- १९८१ ला ठरवून मी पहिल्यांदा राजगड पाहिला. शिवाजी महाराजांच्या प्रभावामुळेच मी तो पाहायला गेलो. त्यानंतर सातत्याने मी दुर्गभ्रमंती करीत गेलो. १९८८ साली मी शिक्षण संपवून कोल्हापुरात वैद्यकीय सेवा सुरू केली. मी एकही रविवार दुर्गभ्रमंती चुकू दिली नाही. बृहन्महाराष्ट्रातील ४५४ किल्ल्यांच्या नोंदी आणि टिपणे माझ्याकडे आहेत.

प्रश्न- पन्हाळा पावनखिंडीची सुरुवात कशी झाली ?उत्तर- १९९३ पासून पन्हाळा पावनखिंड पहिली मोहीम आमच्या ‘मैत्रेय’ संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. गेली ३७ वर्षे ही मोहीम सुरू आहे. पहिली रात्रमोहीमही सुरू केली. एकदिवसीय आणि दोनदिवसीय मोहिमा आहेत.

 

  • दुर्गभ्रमंतीचा वाटाड्या

केवळ किल्ल्यांची माहिती न देता तुम्ही हे पुस्तक वाचताना त्या किल्ल्यावर फिरत असल्याचा भास तुम्हांला झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे लेखन केले आहे. किल्ल्यांबरोबरच घाटमाथा ते कोकणाकडे जाणाऱ्या ४९ घाटवाटांचीही माहिती यामध्ये आहे. कोकण, घाटमाथ्यावरची मंडळी याच घाटरस्त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ये-जा करीत होती. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाणही होत असे. या घाटवाटा सांस्कृतिक सेतू आहेत. त्यांचेही दर्शन या गं्रथामध्ये होते.

  • हे सर्व नव्या पिढीसाठी

सकस पिढ्या तयार व्हाव्यात यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स'ाद्रीचा उत्तम उपयोग करून घेऊन साधनांची कमतरता असताना स्वराज्याचा खेळ मांडला आणि तो यशस्वीही केला. महाराष्ट्र किल्ल्यांच्या माध्यमातून सुरक्षित केला. हे सगळं नव्या पिढीनं डोळसपणे पाहावं, वाचावं आणि यातून सकस अशी ही नवी पिढी तयार व्हावी. तीच उद्याच्या भारताचे आशास्थान आहे. एवढाच हेतू या सर्व धडपडीमागे आहे.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर