शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सकस पिढीसाठी दुर्गभ्रमंती आवश्यक : अमर आडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 01:28 IST

उत्तम आरोग्य, निश्चय दृढ होण्यासाठी, भूगोल समजण्यासाठी, शिवाजी महाराज समजण्यासाठी दुर्गभ्रमंती आवश्यक आहे. - डॉ. अमर आडके

ठळक मुद्दे चर्चेतील व्यक्तिशी थेट संवाद -४५४ किल्ल्यांची माहिती

समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापुरातील आयुर्वेदाचे डॉक्टर म्हणून अमर आडके यांची ओळख; पण त्यापेक्षाही त्यांची जास्त ओळख आहे ती ‘दुर्गभ्रमंती’ करणारा एक भटक्या म्हणून. देशातील ४५४ हून अधिक किल्ले पालथे घालणाऱ्या डॉ. आडके यांचे ‘सह्याद्रीच्या गिरिशिखरांवरून’ हे पुस्तक ४ जानेवारी २०२० रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने साधलेला हा संवाद.

प्रश्न- किल्ले फिरण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली?उत्तर- अनंत आडके माझे वडील. शेतकरी. त्यांना फिरण्याची खूप आवड होती. त्यांच्यासमवेत मी चिक्कोडी तालुक्यातील सदलगा या माझ्या मूळ गावातून दंडोबाचा डोंगर, नृसिंहवाडी येथे चालत येत असे. त्यांच्याकडून मला दुर्गभ्रमंतीची प्रेरणा मिळाली.

प्रश्न- हे किल्ले फिरताना हेतू काय ठेवला?उत्तर- वडिलांनी महाभारतातील एक श्लोक मला सांगितला होता.चक्षु: पश्यति रूपाणीमनसा न च चक्षुषा ।।जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीशी एकरूप होणार नाही, तोपर्यंत तुम्हांला डोळे असले तरी तुम्हांला दिसणार नाही. कान असले तरी ऐकू येणार नाही. तुम्ही त्या-त्या गोष्टीशी एकात्म पावण्याची गरज आहे, असा याचा भावार्थ आहे. मी हेच सूत्र लक्षात ठेवले आणि प्रत्येक किल्ल्याशी तादात्म्य पावत तो किल्ला पाहिला. सुरुवातीला धाडसाने, मग कुतूहलाने भ्रमंती केली. अभ्यास करण्यासाठी आणि आता एका ध्यासाने दुर्गभ्रमंती करत आहे.

प्रश्न- सुरुवात कशी केली?उत्तर- १९८१ ला ठरवून मी पहिल्यांदा राजगड पाहिला. शिवाजी महाराजांच्या प्रभावामुळेच मी तो पाहायला गेलो. त्यानंतर सातत्याने मी दुर्गभ्रमंती करीत गेलो. १९८८ साली मी शिक्षण संपवून कोल्हापुरात वैद्यकीय सेवा सुरू केली. मी एकही रविवार दुर्गभ्रमंती चुकू दिली नाही. बृहन्महाराष्ट्रातील ४५४ किल्ल्यांच्या नोंदी आणि टिपणे माझ्याकडे आहेत.

प्रश्न- पन्हाळा पावनखिंडीची सुरुवात कशी झाली ?उत्तर- १९९३ पासून पन्हाळा पावनखिंड पहिली मोहीम आमच्या ‘मैत्रेय’ संस्थेच्या माध्यमातून सुरू केली. गेली ३७ वर्षे ही मोहीम सुरू आहे. पहिली रात्रमोहीमही सुरू केली. एकदिवसीय आणि दोनदिवसीय मोहिमा आहेत.

 

  • दुर्गभ्रमंतीचा वाटाड्या

केवळ किल्ल्यांची माहिती न देता तुम्ही हे पुस्तक वाचताना त्या किल्ल्यावर फिरत असल्याचा भास तुम्हांला झाला पाहिजे, अशा पद्धतीने हे लेखन केले आहे. किल्ल्यांबरोबरच घाटमाथा ते कोकणाकडे जाणाऱ्या ४९ घाटवाटांचीही माहिती यामध्ये आहे. कोकण, घाटमाथ्यावरची मंडळी याच घाटरस्त्यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ये-जा करीत होती. त्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाणही होत असे. या घाटवाटा सांस्कृतिक सेतू आहेत. त्यांचेही दर्शन या गं्रथामध्ये होते.

  • हे सर्व नव्या पिढीसाठी

सकस पिढ्या तयार व्हाव्यात यासाठीच हा सगळा प्रपंच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स'ाद्रीचा उत्तम उपयोग करून घेऊन साधनांची कमतरता असताना स्वराज्याचा खेळ मांडला आणि तो यशस्वीही केला. महाराष्ट्र किल्ल्यांच्या माध्यमातून सुरक्षित केला. हे सगळं नव्या पिढीनं डोळसपणे पाहावं, वाचावं आणि यातून सकस अशी ही नवी पिढी तयार व्हावी. तीच उद्याच्या भारताचे आशास्थान आहे. एवढाच हेतू या सर्व धडपडीमागे आहे.

टॅग्स :Fortगडkolhapurकोल्हापूरdocterडॉक्टर