शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

सिनेमा आनंदासाठी बनवते : सुमित्रा भावे, किफ्फमध्ये साधला रसिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:13 IST

माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. ​​​​​​​

ठळक मुद्देसिनेमे बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आनंद कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुमित्रा भावे यांनी साधला रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. मयूर कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

त्या म्हणाल्या, सिनेमा हे वास्तवातले स्वप्न दाखवताना त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, प्रामाणिकपणा, सहनशीलता, येणारे अडथळे याचे एकत्रित अनुभव देते. जीवन खोलात समजून घेण्यासाठी सिनेमा महत्वाचा असतो. एखादा चित्रपट बनवण्याआधी मी त्या विषयाचा सखोल अभ्यास करते. उगाच मनोरंजन करायचे म्हणून अनावश्यक गोष्टींना आणि प्रसंगांना त्यात थारा नाही. मला हवा तो संदेश आणि मांडणी यात तडजोड करत नाही, मग तो फार कमी लोकांनी पाहिला तरी मला चालतो. पैसा महत्वाचा असला तरी आनंद हा यामागचा मुख्य उद्देश आहे.त्या म्हणाल्या, प्रत्येक कलावंताकडे तिसरा डोळा असतो आणि तो नैतिकतेचा असतो. त्या नजरेतून तूम्ही सामान्य माणसांकडे पाहायला लागलात की त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव होते. आपण नव्याने माणूस समजायला लागतो. मी जगभर फिरले. तेथील जनजीवन, समस्या, चित्रपटांचे विषय जवळून पाहिले अनुभवले, तेथील तंत्रज्ञान शिकले पण त्या सगळ््या संचिताचा उयोग भारतीयत्वाचे चित्रपट बनवण्यासाठी करते. आपण ज्या मातीतून आलो त्या मातीचा आधी शोध घेतला पाहीजे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूकIFFIइफ्फी