शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

सिनेमा आनंदासाठी बनवते : सुमित्रा भावे, किफ्फमध्ये साधला रसिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 13:13 IST

माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या. ​​​​​​​

ठळक मुद्देसिनेमे बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आनंद कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत सुमित्रा भावे यांनी साधला रसिकांशी मुक्त संवाद

कोल्हापूर : माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ते बघून प्रेक्षकांच्या आयुष्यात बदल होतो हा आनंद माझ्यासाठी पैश्याहून महत्वाचा आहे अशा भावना ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शक सुमित्रा भावे यांनी शुक्रवारी व्यक्त केल्या.कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत त्यांनी रसिकांशी मुक्त संवाद साधला. मयूर कुलकर्णी यांनी त्यांची मुलाखत घेतली.

त्या म्हणाल्या, सिनेमा हे वास्तवातले स्वप्न दाखवताना त्यासाठी करावा लागणारा संघर्ष, प्रामाणिकपणा, सहनशीलता, येणारे अडथळे याचे एकत्रित अनुभव देते. जीवन खोलात समजून घेण्यासाठी सिनेमा महत्वाचा असतो. एखादा चित्रपट बनवण्याआधी मी त्या विषयाचा सखोल अभ्यास करते. उगाच मनोरंजन करायचे म्हणून अनावश्यक गोष्टींना आणि प्रसंगांना त्यात थारा नाही. मला हवा तो संदेश आणि मांडणी यात तडजोड करत नाही, मग तो फार कमी लोकांनी पाहिला तरी मला चालतो. पैसा महत्वाचा असला तरी आनंद हा यामागचा मुख्य उद्देश आहे.त्या म्हणाल्या, प्रत्येक कलावंताकडे तिसरा डोळा असतो आणि तो नैतिकतेचा असतो. त्या नजरेतून तूम्ही सामान्य माणसांकडे पाहायला लागलात की त्यांच्यातील असामान्यत्वाची जाणीव होते. आपण नव्याने माणूस समजायला लागतो. मी जगभर फिरले. तेथील जनजीवन, समस्या, चित्रपटांचे विषय जवळून पाहिले अनुभवले, तेथील तंत्रज्ञान शिकले पण त्या सगळ््या संचिताचा उयोग भारतीयत्वाचे चित्रपट बनवण्यासाठी करते. आपण ज्या मातीतून आलो त्या मातीचा आधी शोध घेतला पाहीजे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरentertainmentकरमणूकIFFIइफ्फी