शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
3
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
4
Travel : पुतिन यांच्या रशियात फिरायला जायचा विचार करताय? किती खर्च येईल आणि कुठे कुठे फिराल? जाणून घ्या..
5
“महायुती सरकार बौद्धिक, आर्थिक दिवाळखोरीत; शेतकरी, लाडक्या बहिणींना फसवले”: हर्षवर्धन सपकाळ
6
30 दिवस, 14000 उड्डाणे रद्द, Indigo अडचणीत येण्याचे काय कारण? परिस्थिती कधी सुधारेल?
7
भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट नाकारला? जैन, मारवाडी, ब्राह्मण असाल तरच घर; बिल्डर लॉबीचा मनमानी कारभार
8
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
9
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
10
वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा
11
Video - "राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला..."; कंगना राणौतचा खोचक सल्ला
12
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
13
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
14
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
15
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
16
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
17
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
18
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
19
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
20
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
Daily Top 2Weekly Top 5

हिप्परगी बंधारा, अलमट्टीमधील पाणीसाठा निकषानुसार ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:26 IST

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

इंदुमती सूर्यवंशी ,लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी कर्नाटकमधील या दोन्ही महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यावर महाराष्ट्राचे संनियंत्रण असावेत, पावसाळ्यात सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने खुले करावेत, कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना करावी अशी मागणी सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जिल्हधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी केली.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, सुयोग हावळ, संजय कोरे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करावा, त्यानुसार पाणीसाठ्याचे नियोजन करावे, त्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाशी चर्चा करावी असा सूचना कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिल्या.

समितीने पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे, दारे तळातून पूर्ण क्षमतेने खुले करून नदीला मोकळे वाहू द्यावे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय असावा, कृष्णा खोरेचे भाग असलेल्या सर्व राज्यांची केंद्रीय प्रतिनिधित्व असलेलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना व्हावी. पाणीसाठ्यावर आंतरराज्यीय बैठका व्हाव्यात. राजापूर बंधाऱ्यावरून जाणारा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली सोडावा, कर्नाटककडून हे होत नसल्याने कृष्णा नदीच्या पूर वहन क्षमतेत मानवनिर्मित अडथळे येऊन पाण्याला फुगवटा येतो व महापुराची स्थिती होते असे मत नोंदवले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, महादेव काळे आदी उपस्थित होते.-

हिप्परगी बंधाऱ्याचा परिणामजमखंडी (ता. बागलकोट) येथील हिप्परगी जलसिंचन प्रकल्पात ६ टीएमसी जलसाठा होतो. त्याची पूर्ण क्षमतेची पातळी ५२४.२७ मीटर असून त्यात ५३१.४० मीटर पाणी साठा करू शकतात. महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा हिप्परगीपासून ९२ किलोमीटरवर असून त्याची उंची ५२३.५० मीटर व नदी पात्राची उंची ५१८.९७ मीटर आहे. हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी १ जुलै आल्यावरदेखील सोडले जात नाही, त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचा शिरोळ बंधारा भरून तेरवाड बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी थांबते त्यामुळे पंचगंगेच्या वरच्या भागात राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याला फुग येते.

--केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार अलमट्टी धरणातील अपेक्षित पाणीसाठा

१ जून ते १५ जून : ५०८.२२ मीटर१६ जून ते ३० जून : ५१३.६ मीटर

१ जुलै ते १५ जुलै : ५१७.११ मीटर१६ जुलै ते ३० जुलै : ५१३.६० मीटर

३० ऑगस्ट : ५१७ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर