शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

हिप्परगी बंधारा, अलमट्टीमधील पाणीसाठा निकषानुसार ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:26 IST

कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक

इंदुमती सूर्यवंशी ,लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो. हे टाळण्यासाठी कर्नाटकमधील या दोन्ही महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठ्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जावे, त्यावर महाराष्ट्राचे संनियंत्रण असावेत, पावसाळ्यात सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने खुले करावेत, कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना करावी अशी मागणी सांगलीतील कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने जिल्हधिकारी अमोल येडगे यांच्याकडे शुक्रवारी केली.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, निवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, सुयोग हावळ, संजय कोरे यांच्या शिष्टमंडळाने याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करावा, त्यानुसार पाणीसाठ्याचे नियोजन करावे, त्यासाठी कर्नाटक पाटबंधारे विभागाशी चर्चा करावी असा सूचना कोल्हापूर पाटबंधारे विभागाला दिल्या.

समितीने पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील बरगे, दारे तळातून पूर्ण क्षमतेने खुले करून नदीला मोकळे वाहू द्यावे. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये समन्वय असावा, कृष्णा खोरेचे भाग असलेल्या सर्व राज्यांची केंद्रीय प्रतिनिधित्व असलेलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची स्थापना व्हावी. पाणीसाठ्यावर आंतरराज्यीय बैठका व्हाव्यात. राजापूर बंधाऱ्यावरून जाणारा विसर्ग अलमट्टी धरणातून खाली सोडावा, कर्नाटककडून हे होत नसल्याने कृष्णा नदीच्या पूर वहन क्षमतेत मानवनिर्मित अडथळे येऊन पाण्याला फुगवटा येतो व महापुराची स्थिती होते असे मत नोंदवले. यावेळी धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, महेश जाधव, एकनाथ माने, महादेव काळे आदी उपस्थित होते.-

हिप्परगी बंधाऱ्याचा परिणामजमखंडी (ता. बागलकोट) येथील हिप्परगी जलसिंचन प्रकल्पात ६ टीएमसी जलसाठा होतो. त्याची पूर्ण क्षमतेची पातळी ५२४.२७ मीटर असून त्यात ५३१.४० मीटर पाणी साठा करू शकतात. महाराष्ट्रातील शेवटचा राजापूर बंधारा हिप्परगीपासून ९२ किलोमीटरवर असून त्याची उंची ५२३.५० मीटर व नदी पात्राची उंची ५१८.९७ मीटर आहे. हिप्परगी बंधाऱ्यातील पाणी १ जुलै आल्यावरदेखील सोडले जात नाही, त्यामुळे कोल्हापूर पद्धतीचा शिरोळ बंधारा भरून तेरवाड बंधाऱ्याच्या खालील बाजूस पाणी थांबते त्यामुळे पंचगंगेच्या वरच्या भागात राजाराम बंधाऱ्यापर्यंत पाण्याला फुग येते.

--केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार अलमट्टी धरणातील अपेक्षित पाणीसाठा

१ जून ते १५ जून : ५०८.२२ मीटर१६ जून ते ३० जून : ५१३.६ मीटर

१ जुलै ते १५ जुलै : ५१७.११ मीटर१६ जुलै ते ३० जुलै : ५१३.६० मीटर

३० ऑगस्ट : ५१७ मीटर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर