शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Kolhapur: संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होत नाही - विशुद्ध सागर महाराज; नांदणी येथे महामस्तकाभिषेक सोहळ्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 13:07 IST

उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ ...

उदगाव : खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे. बनावटगिरी जास्त काळ चालत नाही. परिवर्तन करणे सरळ आहे, मात्र त्याग करणे कठीण आहे. संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होऊ शकत नाही. परिग्रह सोडणे हा आत्म्याचा सन्मान आहे, असे प्रतिपादन आचार्य विशुद्धसागर महाराज यांनी केले.नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठा महोत्सव व महास्तकाभिषेक सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी आचार्य विशुद्धसागर महाराज बोलत होते. यावेळी आचार्य धर्मसेन महाराज, आचार्य विद्यानंद महाराज, सौम्यसागर महाराज, आदींचे प्रवचन झाले. आचार्य धर्मसेन महाराजांनी परिग्रह परिवार, परिणाम, कर्म याबाबत आशीर्वाचन दिले. आचार्य विद्यानंद महाराजांनी भगवंतांच्या पंचकल्यानिकाची माहिती दिली. हा सोहळा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामी यांच्या आज्ञेवरून होत आहे.नांदणी येथे बुधवार (दि. १) पासून नऊ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यास अत्यंत उत्साहात प्रारंभ झाला. ५१ मुनी,१६ माताजी, त्यागी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मंडप उद्घाटनाने झाली. बुधवारी दिवसभर इंद्रप्रतिष्ठा, व्रतबंधन, मंगल प्रवचन, मंगल कलश स्थापना, नवग्रह होम, मंडप वेदी प्रतिष्ठा, शांतीविधान हे कार्यक्रम पार पडले. तसेच गर्भकल्याण पूर्व, सौधर्म इंद्र व इंद्रग्रणांचे आगमन इंद्रसभा, नगररचना, संगीत आरती, भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले.यावेळी उपस्थित आचार्यांना शास्त्रभेट देण्यात आले. कार्यक्रमास आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी, आदींनी हजेरी लावली. यावेळी प्रफुल मेहता, किशोर पहाडिया, प्रकाश झांझरिया यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी रेंदाळ व समडोळी येथून चालत आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर