शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

पश्चिम बंगालच्या निकालात महाराष्ट्राचे प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब पडल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचा वारू असाच वेगाने वाहिला होता. त्याला रोखण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा करून दाखविले. त्यामुळे ममतादीदींच्या विजयानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांची आठवण अनेकांना झाली.

या दोन्ही निकालांमध्ये काही गोष्टी साम्य असलेल्या आहेत. मुळात या दोन्ही प्रदेशांमध्येही साम्य आहे. सामाजिक प्रबोधनच्या चळवळी या भूमिमध्ये जास्त झाल्या. स्वातंत्र्य चळवळीतील या दोन्ही प्रदेशांचा सहभागही जास्त राहिला. या चळवळीत महाराष्ट्रासारख्याच किंबहुना जास्तच पश्चिम बंगालमध्ये सशस्त्र उठावाच्या चळवळी झाल्या आहेत. दोन्ही प्रांतातील वैचारिक साहित्य अव्वल दर्जाचे मानले जाते. संगीत-चित्रकला याबाबतही या राज्यांची वेगळी छाप आहे. दोन्ही प्रदेशामध्ये लोकांना स्वत:च्या मातीबद्दलचा प्रचंड अभिमान आहे. महाराष्ट्र १९६० च्या दशकानंतर औद्योगिक विकासात पुढारलेले राज्य बनले व बंगाल मात्र मागासलेला राहिला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सगळी यंत्रणा शरद पवार यांच्याविरोधात लावली. इडीपासून विविध चौकशी प्रकरणे मागे लावून त्यांना हैराण करून सोडले. राष्ट्रवादीतील अनेक नेते त्यांनी भाजपमध्ये घेतले. पवार यांची चोहोबाजूनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. अगदी तसेच ममता बॅनर्जी यांच्याबाबतही घडले आहे. रोज एक नेता त्यांच्या पक्षातून फुटून भाजपमध्ये गेल्याचे चित्र दिसत होते. त्या एकट्याच पक्षात राहतात की काय, अशीही हेटाळणी त्यावेळी केली गेली. परंतु पवार असोत की ममतादीदी, त्यांनी या सगळ्याला तोंड दिले. सत्तेचा वापर करून एखाद्याची चोहोबाजूंनी कोंडी केली जाते, तेव्हा सामान्यत: सामान्य माणूस त्या व्यक्तीच्या मागे उभा राहतो. राष्ट्रवादीला टार्गेट केले नसते, त्यांच्या पक्षातील नेते फोडून घेतले नसते आणि ही निवडणूक झाली असती, तर लोकांनी राष्ट्रवादीला एवढे यश दिले नसते. भाजप सगळ्या ताकदीसह त्यांच्यामागे लागला असताना, हा ८० वर्षांचा म्हातारा त्याला तोंड देऊन लढतोय, असे चित्र वातावरण बदलून गेले. तसेच कांहीसे वातावरण पश्चिम बंगालमध्येही बनल्याचे निकालावरून दिसते. तिथे तर एका महिलेबद्दल प्रचारात ज्या पध्दतीची भाषा वापरली गेली, ते तेथील मतदारांना आवडले नसल्याचे दिसते. लढणाऱ्या नेतृत्वाला सामान्य माणूस नेहमीच बळ देत आला आहे, याचेही प्रत्यंतर या निकालाने आणून दिले. मतांचे धुव्रीकरण जरूर झाले, परंतु ते ममता बॅनर्जी ताकदीने उभ्या राहिल्या म्हणून.