शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:14 IST

अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन

म्हाकवे - सीमाभागातील सर्वच युवक-युवतींना रोजगार मिळून ते स्वावलंबी झाले पाहिजेत.तसेच येथील प्रत्येक नागरिक  ताठ मानेने जगला पाहिजे.यासाठी संघर्षाची भुमी असणारा महाराष्ट्र हा सीमाभागातील मराठी भाषिकांच्याही पाठिशी ठामपणे उभा राहिल.अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आता प्रत्येक वर्षी शिवजयंती दिनी याच ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

   अर्जुननगर (ता. कागल)येथील देवचंद महाविद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी होते.    खासदार धैर्यशील माने, देवचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष आशिष शाह, दिपक दळवी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, रवींद्र माने, जयराम मिरजकर, लक्ष्मण पाटील यासह सीमाभागातील प्रमुख उपस्थितीत होते.      उद्योजकांना अनुदान... युवकांना समाधानकारक पगाराचीही ग्वाही    खाजगी कंपनीत युवक युवतींना नोकरी देताना समाधानकारक पगारही देण्याच्या सूचना करत सामंत यांनी महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील उद्योजकांना अनुदान व इतर सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सीमाभागात लवकरच सीमाप्रश्नी मेळाव्याची घोषणामहाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दळवी यांनी रोजगार मेळाव्याबाबत समाधान व्यक्त करत सीमाप्रश्नाबाबतही मेळावा घेण्याचे आवाहन केले.या संदर्भ घेत सीमाप्रश्नाचे समन्वयक शुभंराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित लवकरच सीमाप्रश्नी मेळावा घेण्याची घोषणाही सामंत यांनी केली. 

सामंत यांची अशीही समयसूचकता...     व्यासपीठावर एका बाजूला बसलेल्या दळवी यांना आपल्या नजीकच बसविले.तसेच, संयोजकांनी प्रमुख पाहुणे असणार्या सामंत यांच्या सत्काराची सर्वप्रथम घोषणा केली.माञ, तात्काळ त्यांनी जेष्ठ असणार्या दळवी यांचा सत्कार करण्याच्या संयोजकांना सुचना केल्या.सामंत यांच्या या समयसूचकतेबाबत उपस्थितांनी कौतुक केले.   तुमच्या घोषणा... आमच्या हृदयात...    कारवार,बिदर,भालकीसह बेळगावसह ८६५गावे महाराष्ट्रात दाखल झालीच पाहिजेत... बेळगांव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या.या संदर्भ घेत तुमच्या घोषणा आमच्या हृदयातील आहेत.तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत