शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

महाराष्ट्र हा सीमाबांधवाच्या पाठिशी ठामपणे उभा; उदय सामंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 18:14 IST

अर्जुननगर येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन

म्हाकवे - सीमाभागातील सर्वच युवक-युवतींना रोजगार मिळून ते स्वावलंबी झाले पाहिजेत.तसेच येथील प्रत्येक नागरिक  ताठ मानेने जगला पाहिजे.यासाठी संघर्षाची भुमी असणारा महाराष्ट्र हा सीमाभागातील मराठी भाषिकांच्याही पाठिशी ठामपणे उभा राहिल.अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. आता प्रत्येक वर्षी शिवजयंती दिनी याच ठिकाणी रोजगार मेळावा घेण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

   अर्जुननगर (ता. कागल)येथील देवचंद महाविद्यालयाच्या पटांगणात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि देवचंद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी होते.    खासदार धैर्यशील माने, देवचंद महाविद्यालयाचे अध्यक्ष आशिष शाह, दिपक दळवी, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनीही मनोगते व्यक्त केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार, रवींद्र माने, जयराम मिरजकर, लक्ष्मण पाटील यासह सीमाभागातील प्रमुख उपस्थितीत होते.      उद्योजकांना अनुदान... युवकांना समाधानकारक पगाराचीही ग्वाही    खाजगी कंपनीत युवक युवतींना नोकरी देताना समाधानकारक पगारही देण्याच्या सूचना करत सामंत यांनी महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील उद्योजकांना अनुदान व इतर सुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले.

सीमाभागात लवकरच सीमाप्रश्नी मेळाव्याची घोषणामहाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दळवी यांनी रोजगार मेळाव्याबाबत समाधान व्यक्त करत सीमाप्रश्नाबाबतही मेळावा घेण्याचे आवाहन केले.या संदर्भ घेत सीमाप्रश्नाचे समन्वयक शुभंराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थित लवकरच सीमाप्रश्नी मेळावा घेण्याची घोषणाही सामंत यांनी केली. 

सामंत यांची अशीही समयसूचकता...     व्यासपीठावर एका बाजूला बसलेल्या दळवी यांना आपल्या नजीकच बसविले.तसेच, संयोजकांनी प्रमुख पाहुणे असणार्या सामंत यांच्या सत्काराची सर्वप्रथम घोषणा केली.माञ, तात्काळ त्यांनी जेष्ठ असणार्या दळवी यांचा सत्कार करण्याच्या संयोजकांना सुचना केल्या.सामंत यांच्या या समयसूचकतेबाबत उपस्थितांनी कौतुक केले.   तुमच्या घोषणा... आमच्या हृदयात...    कारवार,बिदर,भालकीसह बेळगावसह ८६५गावे महाराष्ट्रात दाखल झालीच पाहिजेत... बेळगांव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या.या संदर्भ घेत तुमच्या घोषणा आमच्या हृदयातील आहेत.तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंत