शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

पक्ष निष्ठाच गुंडाळण्याचा ट्रेड; कपडे बदलण्याइतक्या सहजपणे नेते, कार्यकर्त्यांचे पक्षांतर

By भीमगोंड देसाई | Updated: November 1, 2024 15:44 IST

कायम सत्ता, लाभाचा अतीव मोह, खोबरे मिळेल तिकडे चांगभले

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीनंतर आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात कपडे बदलावे इतक्या सहजपणे राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते पक्षांतर करीत आहेत. कायम सत्तेत आणि लाभ मिळत राहण्याच्या अतीव मोहामुळे ते खाेबरे मिळेल तिकडे चांगभले करीत आहेत. पक्षनिष्ठाच गुंडाळून ठेवून संधिसाधूपणा फोफावला आहे. नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्यांची यामध्ये चंगळ होत असल्याने वर्षानुवर्षे निष्ठेने पक्षात काम करणाऱ्यांच्या वाट्याला खळ, पोस्टर, जाझम, खुर्च्या उचलणेच येत आहे. यामुळे नव्याने राजकारणात येण्याचा विचार करीत असलेले तरूण, तरूणींमध्ये नकारात्मकता अधिक गडद होताना दिसत आहे.शिवसेना, राष्ट्रवादी पक्षफुटीनंतर आमदार उघडपणे फुटून गेले. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत फुटून जाण्याच्या प्रवृत्तीला मतदारांनी चांगलाच धडा शिकवला. तरीही आताच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय करिअर स्थिरस्थावर असलेलेही तिकीट मिळाले नाही, खोके पोहोच झाले, भविष्यात लाभाचे आश्वासन मिळाल्यानंतर मूळ पक्ष सोडून जात आहेत. विशेष म्हणजे विरूध्द आणि टोकाची भिन्नता असलेल्या विचारसरणीच्या पक्षात जाऊन निवडणूक रिंगणात आहेत. यावरून मी म्हणजेच पक्ष, मतदारांनी माझ्या मागेच फरपटत आले पाहिजे, मी सांगेल त्याप्रमाणेच करावे, अशी त्यांची छुपी भूमिकाही यानिमित्ताने उघड झाली आहे.

दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पोवार, शेकापचे बाबुराव कदम यासह काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे उभे आयुष्य गेले. वर्षानुवर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न करता ते काम करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत विविध आलेल्या ऑफर्स धुडकावून ते पक्षनिष्ठेशी एकनिष्ठ राहणे पसंत केले. सध्याचे चित्र याउलट आहे. उमेदवारी देताना निवडून येण्यासाठी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करण्यात ताकदवान असणाऱ्यांचा विचार प्राधान्याने होत आहे. यामुळेच निष्ठेचाच सौदा सुरू आहे.

राजकारणात धंदेवाईकांचा भरणाधंदेवाईकांचा राजकारणात अधिक भरणा झाल्याने राजकारणाचा धंदा आणि व्यवसाय झाला आहे. केवळ मते मिळण्यासाठी मी समाजसेवक आहे, अशा फुशारक्या मारल्या जातात. प्रत्यक्षात व्यवहार उलटा असतो. विचारांचा व्यवहार सोडून व्यवहारांचा विचार वाढल्याने ज्या पक्षाने आमदार, खासदार, मंत्री केले तेही सहजपणे संधिसाधू भूमिका घेत आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Politicsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024