शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

निवडणुकीसाठी आश्वासनांचा महापूर, किती वर्षे नुसतीच चर्चा अन् कोल्हापूरकरांची बोळवण करणार?

By भारत चव्हाण | Updated: November 7, 2024 15:28 IST

एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही

भारत चव्हाणकोल्हापूर : अनेक वर्षे सत्तेत राहिलेले तसेच सत्तेबाहेर राहिलेले सर्वपक्षीय नेते प्रत्येक निवडणुकीत पंचगंगा प्रदूषण, अंबाबाई मंदिर विकास आराखडा, कोल्हापूर शहराची हद्दवाढ, शाहू मिलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक, कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु यातील एकही प्रश्न गेल्या पंचवीस वर्षात सुटलेला नाही. तरीही यंदाच्या निवडणुकीत नेतेमंडळी या प्रश्नावर चर्चा करताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे नुसती वाफाळ चर्चा आणि बोळवण करण्याचे काम सुरू आहे.महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कोल्हापुरात झाला. तेंव्हा निवडणुकीच्या व्यासपीठावर नेते मंडळींनी कोल्हापूरच्या प्रश्नांना हात घातला. प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत जो अनुभव येतो तोच अनुभव याही वेळेला येऊ लागला आहे. अगदी परवाच्या लोकसभेला निवडणुकीत जी आश्वासने दिली होती तीच पुन्हा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मोठ्या आवाजात दिली आणि आपणच कसे कोल्हापूरचे हितकर्ते आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न केला.

पंचगंगा प्रदूषण तसेच महापुराचे पाणी वळवण्यासाठीच्या ३२०० कोटींच्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी कोल्हापूरच्या महापुरावर उपाययोजना म्हणूनच नाही तर दुष्काळी भागाला पाणी नेण्याचा हा महत्वाकांक्षी प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जातून हा प्रयोग होत आहे. याची गेल्या दहा वर्षापासून नुसती चर्चाच सुरू आहे. ३२०० कोटींचा निधी प्रत्यक्षात येणार कधी..? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या बाबतीत तर अनेक सरकारनी अनेक वेळा आश्वासने दिली, परंतु या आराखड्यातील मंजूर निधीतील नऊ कोटी रुपये मिळाले आहेत, बाकीचा निधी अद्यापही कागदावरच आहे. पहिल्या टप्प्यातील कामापैकी केवळ बहुमजली वाहनतळाचे काम रडतखडत पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे दर्शनरांग, भक्तनिवास याची कामे रखडलेली आहेत. नागरिकांना आजही उन्हात उभे राहून दर्शन घ्यावे लागते. स्वच्छ मुतारीची शोधाशोध करावी लागते. काही काही वेळेला राहण्यासाठी जागा न मिळाल्याने भाविक, पर्यटकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.

शाहूमिल स्मारकाबद्दल उदासीनताशाहूमिलच्या जागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकावर देखील वारंवार चर्चा होत असते. परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नाही. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून ही जागा राज्य सरकारकडे वर्ग करून घ्यायलाही राज्यकर्त्यांना जमलेले नाही. इतकी उदासीनता या स्मारकाच्या बाबतीत आहे.

हद्दवाढीची बोळवणकोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा विषय गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा कोल्हापूरकरांना आश्वासित केले. मोठ्या जोषपूर्ण भाषणात नेते मंडळीनी आश्वासने दिली, पण केले काहीच नाही, उलट कोल्हापूरकरांनीच एकमत करावे, अशी सूचना करून या प्रश्नावर अक्षरश: बोळवण करण्यात आली.

रस्त्यांची स्थिती दयनीय..कोल्हापूरातील अनेक रस्त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. याच शासनाने त्यासाठी १०० कोटींची निधी दिला. परंतु त्यातील रस्ते अजून झालेले नाहीत. आजपर्यंत निधी नाही म्हणून रस्ते होत नाहीत असे सांगितले जाई आता निधी असूनही लोकांची खड्ड्यांनी कंबर मोडत आहे परंतु त्याचे उत्तर कोणत्याच नेत्याने दिले नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरpollutionप्रदूषणPoliticsराजकारणwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024