शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

मूळ कोल्हापूरकरांचा राज्यातही डंका, 'या' पाच जणांनी अन्य जिल्ह्यातून निवडून येत मारली बाजी

By समीर देशपांडे | Updated: November 12, 2024 14:47 IST

पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील चौघेजण यशस्वी

समीर देशपांडेकोल्हापूर : मूळ कोल्हापूरचे असलेले; परंतु अन्य जिल्ह्यातून निवडून येण्याची कामगिरी जिल्ह्यातील पाच जणांनी आतापर्यंत करून दाखवली आहे. यातील चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत हंडोरे यांनी तरी मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. त्यांच्यासह रमेश लटके, ऋतुजा लटके आणि अशोक जाधव यांनीही विधानसभा जिंकून ही किमया करून दाखवली आहे; मात्र यातील महत्त्वाचा फरक म्हणजे चंद्रकांत पाटील हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असताना पुण्यात लढून जिंकले, तर उर्वरित सर्वजणांची राजकीय कारकीर्दच मुंबईत सुरू झाली.गेली ३० वर्षे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात जाऊन विधानसभा जिंकण्याची कामगिरी वर्ष २०१९ मध्ये केली. यंदा ते दुसऱ्यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून या लढतीकडे कोल्हापूरवासीयांचे आणि विशेषत: भाजप नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. पाटील २००८ आणि २०१४ अशा दोन वेळा १२ वर्षांसाठी विधानपरिषदेवर निवडून आले. २०१४ मध्ये त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि एकापेक्षा एक मातब्बर खाती त्यांच्याकडे देण्यात आली;परंतु २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास सांगितली. त्यावेळी २५ हजारांच्या मताधिक्याने विरोधी प्रमुख उमेदवाराचा पराभव केला. आधीच कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापल्याने निर्माण झालेल्या वादळात पाटील यांना हा विजयाचा दिवा लावला. आता ते याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील चौघेजण यशस्वीकोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मूळचे मसूद मालेगावचे चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसकडून मुंबईतून आमदार होऊन सामाजिक न्यायमंत्रीही झाले होते. गेली अनेक वर्षे मुंबईत एकनिष्ठपणे त्यांनी काँग्रेसचे काम केले. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली.पन्हाळा तालुक्यातील कोलोलीचे अशोक जाधव हे देखील मुंबईतून दोन वेळा काँग्रेसकडून आमदार झाले. आताही ते पुन्हा काँग्रेसकडून मुंबईतून निवडणूक रिंगणात आहेत.शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथील रमेश लटके हे देखील मुंबईतून शिवसेनेकडून आमदार झाले होते. त्यांनी शाहूवाडीतूनही निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या देखील आमदार झाल्या. रोजगारासाठी मुंबईत गेलेल्या या सर्वांनी आपला राजकीय झेंडा फडकवला. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील अनेकांनी मुंबई आणि परिसरातील महापालिकांमध्ये नगरसेवक आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर बाजी मारली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरchandrakant patilचंद्रकांत पाटीलwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024