शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Vidhan Sabha Election 2024: शब्दांचा संपला, आकड्यांचा खेळ सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 12:10 IST

पथकांची नजर हालचालींवर

कोल्हापूर : गेले महिनाभर सुरू असलेला शब्दांचा जाहीर खेळ सोमवारी संध्याकाळी संपला आणि लगोलग आकड्यांचा खेळ सुरू झाला. कुठल्या भागात किती मते पडतील, अशा आकड्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. दरम्यान, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख उमेदवारांनी दुचाकी रॅली आणि पदयात्रेने जाहीर प्रचाराची सांगता केली. जाहीर सभांच्या माध्यमातून एकमेकांचा पंचनामा करणाऱ्या नेत्यांची राखीव फौज आता छुप्या प्रचारात उतरली असून, ज्या भागात कमी मतांची शंका आहे, तेथील खड्डा भरण्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे.कोल्हापूर उत्तरमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी एक हजार दुचाकीधारकांसोबत रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. तर कसबा बावडा येथे रॅलीचा समारोप केला. विरोधी उमेदवार राजेश लाटकर यांनी भागात पदयात्रा काढल्या. कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांनी सांगता सभा घेतल्या. मुश्रीफ यांच्या सभेसाठी खासदार धैर्यशील माने आणि अंबरीश घाटगे यांची उपस्थिती होती. तर घाटगे यांच्या सभेत शरद पवार यांच्या भगिनी आणि एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी चौफेर टीका केली.आमदार विनय कोरे यांनी जोतिबा येथे सभा घेत प्रचाराची सांगता केली. सत्यजित पाटील यांनी मलकापुरात पदयात्रा काढली. राजेंद्र पाटील यड्रावकर यांची आलास येथे सांगता सभा झाली तर गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूरमध्ये पदयात्रा काढली. स्वाभिमानीनेही जयसिंगपूरमध्ये जाहीर सभा घेतली. प्रकाश आबिटकर यांनी आजऱ्यात दुचाकी रॅली काढली तर के. पी. पाटील यांनी राशिवडेमध्ये पदयात्रा काढली. अन्य चंदगड, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर मतदारसंघातील उमेदवारांनी मोठ्या गावांमध्ये पदयात्रा आणि दुचाकी रॅली काढून प्रचाराची सांगता केली.

कार्यकर्त्यांना मदतजाहीर प्रचार संपताच उमेदवार व त्यांच्या प्रमुख कारभाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांतील प्रचाराचा आढावा घेतला, कोठे कमी आहोत, कोणाला संपर्क करावा लागणार आहे याचा अंदाज घेऊन सोमवारी रात्रीनंतर जोडण्या सुरू झाल्या. मतदान केंद्रनिहाय लावल्या जाणाऱ्या बूथवरील कार्यकर्त्यांना साहित्य पाठविण्याचे नियोजन सुरू झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही कार्यकर्ते मतदारसंघात रात्री अपरात्री फिरत असून उमेदवारांचे निरोप पोहोचवीत आहेत.

पास वाटपनिवडणुकीच्या धावपळीत प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांचे श्रमपरिहार होत आहेत. काही मतदारांपर्यंत जेवणाचे पास वाटले जात आहेत. त्यामुळे हॉटेल्स, धाबे, कार्यालयातील जेवणावळीची गर्दी झालेले चित्र आहे. हॉटेल, धाब्यावरील गर्दी दिसत असली तरी ते कोणाकडून आले आहेत हे स्पष्ट होत नसल्याने यंत्रणेचाही नाइलाज होत आहे. परंतु रात्री साडेदहा वाजता सर्व व्यवहार बंद केले जात आहेत.पथकांची नजर हालचालींवरनिवडणुकीसाठी नेमलेली सरकारी यंत्रणा आता सज्ज झाली आहे. गस्ती पथकांची करडी नजर रात्रीच्या हालचालीवर आहे. ही पथके सोमवारपासून अधिक दक्ष झाली आहेत. या पथकांना काही फोन येत असल्याने त्यांचीही धावपळ होत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024