शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर ...

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर घातली आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजातून हे वास्तव पुढे आले आहे. २०१९ इतकाच हा महापूरदेखील विध्वंसकारी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ४११ गावे व ५८ हजार हेक्टर शेती पूरबाधित आहेत. महापुरामुळे ४५ हजार २२० नागरिकांचे स्थलांतर झाले असून यातील १६ हजार ३९९ स्थलांतरित निवारा कक्षात आहेत. पुरामुळे आतापर्यंत ७ जण मृत्यू पावले आहेत. यात पाण्यात वाहून जाण्याबरोबरच घर कोसळल्यामुळेही झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

दोन तीन दिवसांच्या तुफानी पावसानेच जिल्ह्यात २०१९सारखी पूरस्थिती निर्माण केली. आता महापूर ओसरू लागला असलातरी त्याची गती कमी आहे. पाऊस कमी झाला आहे, ऊन पडले आहे, एवढाच काय तो या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा आहे. बाकी या महापुराने पुराने बाधित झालेल्याचा संसारच उघड्यावर आणला आहे. घर, व्यवसाय, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. आता पूर ओसरेल तसे नुकसानीचे मोजमाप सुरू होणार आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसा नुकसानीच्या आकड्यात भरच पडत जाणार आहे.

चौकट

१०४ पशुधन दगावले

या महापुरात १०४ पशुधन दगावले आहे. २०१९च्या पुराच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असलेतरी नागरिकांचा गाफीलपणा या मुक्या जनावरांना नडला आहे. या महापुरात ८ हजार ८०६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. त्यांना छावण्यांच्या माध्यमातून चारा व पशुखाद्याचा पुरवठा केला जात आहे.

चौकट

महावितरणचे २३ कोटींचे नुकसान

जोरदार वाऱ्यासह ढगफुटीसारख्या पडलेल्या पावसाचा सर्वात माेठा फटका महावितरणला बसल्याचे दिसत आहे. बरेच डीपी, टीसी पाण्यामध्ये आहेत. तारा तुटून पडल्या आहेत, तर विद्युत पोल पूर्णपणे मोडून पडले आहे. काही ठिकाणी तर गाळात पूर्णपणे रुतून बसले आहेत. यंत्रणाच तुटून पडल्याने महावितरणला २३ कोटी ११ लाख ३२ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहेत. अजूनही पूर ओसरलेला नसल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे हे मोठे दिव्य झाले आहे. तरीदेखील दोन लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून एक लाखावर ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

चौकट

ग्रामीण पाणीपुरवठा अजून ठप्पच

जॅकवेल, पाण्याच्या मोटारी, डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील ४८७ गावांतील पाणीपुरवठा बंद आहे. आतापर्यंत केवळ ३० गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे. १३७ गावातील पुरवठा सुरू होण्यास अजून दोन दिवस लागणार आहेत. तसेच पुढील पाच दिवसात उर्वरित ३२० गावातील पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे यंत्रणेचे प्रयत्न आहेत.