शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर ...

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर घातली आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजातून हे वास्तव पुढे आले आहे. २०१९ इतकाच हा महापूरदेखील विध्वंसकारी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ४११ गावे व ५८ हजार हेक्टर शेती पूरबाधित आहेत. महापुरामुळे ४५ हजार २२० नागरिकांचे स्थलांतर झाले असून यातील १६ हजार ३९९ स्थलांतरित निवारा कक्षात आहेत. पुरामुळे आतापर्यंत ७ जण मृत्यू पावले आहेत. यात पाण्यात वाहून जाण्याबरोबरच घर कोसळल्यामुळेही झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

दोन तीन दिवसांच्या तुफानी पावसानेच जिल्ह्यात २०१९सारखी पूरस्थिती निर्माण केली. आता महापूर ओसरू लागला असलातरी त्याची गती कमी आहे. पाऊस कमी झाला आहे, ऊन पडले आहे, एवढाच काय तो या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा आहे. बाकी या महापुराने पुराने बाधित झालेल्याचा संसारच उघड्यावर आणला आहे. घर, व्यवसाय, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. आता पूर ओसरेल तसे नुकसानीचे मोजमाप सुरू होणार आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसा नुकसानीच्या आकड्यात भरच पडत जाणार आहे.

चौकट

१०४ पशुधन दगावले

या महापुरात १०४ पशुधन दगावले आहे. २०१९च्या पुराच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असलेतरी नागरिकांचा गाफीलपणा या मुक्या जनावरांना नडला आहे. या महापुरात ८ हजार ८०६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. त्यांना छावण्यांच्या माध्यमातून चारा व पशुखाद्याचा पुरवठा केला जात आहे.

चौकट

महावितरणचे २३ कोटींचे नुकसान

जोरदार वाऱ्यासह ढगफुटीसारख्या पडलेल्या पावसाचा सर्वात माेठा फटका महावितरणला बसल्याचे दिसत आहे. बरेच डीपी, टीसी पाण्यामध्ये आहेत. तारा तुटून पडल्या आहेत, तर विद्युत पोल पूर्णपणे मोडून पडले आहे. काही ठिकाणी तर गाळात पूर्णपणे रुतून बसले आहेत. यंत्रणाच तुटून पडल्याने महावितरणला २३ कोटी ११ लाख ३२ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहेत. अजूनही पूर ओसरलेला नसल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे हे मोठे दिव्य झाले आहे. तरीदेखील दोन लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून एक लाखावर ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

चौकट

ग्रामीण पाणीपुरवठा अजून ठप्पच

जॅकवेल, पाण्याच्या मोटारी, डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील ४८७ गावांतील पाणीपुरवठा बंद आहे. आतापर्यंत केवळ ३० गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे. १३७ गावातील पुरवठा सुरू होण्यास अजून दोन दिवस लागणार आहेत. तसेच पुढील पाच दिवसात उर्वरित ३२० गावातील पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे यंत्रणेचे प्रयत्न आहेत.