शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर ...

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर घातली आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजातून हे वास्तव पुढे आले आहे. २०१९ इतकाच हा महापूरदेखील विध्वंसकारी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ४११ गावे व ५८ हजार हेक्टर शेती पूरबाधित आहेत. महापुरामुळे ४५ हजार २२० नागरिकांचे स्थलांतर झाले असून यातील १६ हजार ३९९ स्थलांतरित निवारा कक्षात आहेत. पुरामुळे आतापर्यंत ७ जण मृत्यू पावले आहेत. यात पाण्यात वाहून जाण्याबरोबरच घर कोसळल्यामुळेही झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

दोन तीन दिवसांच्या तुफानी पावसानेच जिल्ह्यात २०१९सारखी पूरस्थिती निर्माण केली. आता महापूर ओसरू लागला असलातरी त्याची गती कमी आहे. पाऊस कमी झाला आहे, ऊन पडले आहे, एवढाच काय तो या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा आहे. बाकी या महापुराने पुराने बाधित झालेल्याचा संसारच उघड्यावर आणला आहे. घर, व्यवसाय, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. आता पूर ओसरेल तसे नुकसानीचे मोजमाप सुरू होणार आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसा नुकसानीच्या आकड्यात भरच पडत जाणार आहे.

चौकट

१०४ पशुधन दगावले

या महापुरात १०४ पशुधन दगावले आहे. २०१९च्या पुराच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असलेतरी नागरिकांचा गाफीलपणा या मुक्या जनावरांना नडला आहे. या महापुरात ८ हजार ८०६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. त्यांना छावण्यांच्या माध्यमातून चारा व पशुखाद्याचा पुरवठा केला जात आहे.

चौकट

महावितरणचे २३ कोटींचे नुकसान

जोरदार वाऱ्यासह ढगफुटीसारख्या पडलेल्या पावसाचा सर्वात माेठा फटका महावितरणला बसल्याचे दिसत आहे. बरेच डीपी, टीसी पाण्यामध्ये आहेत. तारा तुटून पडल्या आहेत, तर विद्युत पोल पूर्णपणे मोडून पडले आहे. काही ठिकाणी तर गाळात पूर्णपणे रुतून बसले आहेत. यंत्रणाच तुटून पडल्याने महावितरणला २३ कोटी ११ लाख ३२ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहेत. अजूनही पूर ओसरलेला नसल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे हे मोठे दिव्य झाले आहे. तरीदेखील दोन लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून एक लाखावर ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

चौकट

ग्रामीण पाणीपुरवठा अजून ठप्पच

जॅकवेल, पाण्याच्या मोटारी, डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील ४८७ गावांतील पाणीपुरवठा बंद आहे. आतापर्यंत केवळ ३० गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे. १३७ गावातील पुरवठा सुरू होण्यास अजून दोन दिवस लागणार आहेत. तसेच पुढील पाच दिवसात उर्वरित ३२० गावातील पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे यंत्रणेचे प्रयत्न आहेत.