शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

महापुराचा जिल्ह्याला २४३ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:26 IST

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर ...

कोल्हापूर: २०१९ चा प्रलंयकारी महापूर आणि त्यापाठोपाठ आलेल्या कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीत आता या महापुराने आणखी २४३ कोटींची भर घातली आहे. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अंदाजातून हे वास्तव पुढे आले आहे. २०१९ इतकाच हा महापूरदेखील विध्वंसकारी ठरल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात ४११ गावे व ५८ हजार हेक्टर शेती पूरबाधित आहेत. महापुरामुळे ४५ हजार २२० नागरिकांचे स्थलांतर झाले असून यातील १६ हजार ३९९ स्थलांतरित निवारा कक्षात आहेत. पुरामुळे आतापर्यंत ७ जण मृत्यू पावले आहेत. यात पाण्यात वाहून जाण्याबरोबरच घर कोसळल्यामुळेही झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

दोन तीन दिवसांच्या तुफानी पावसानेच जिल्ह्यात २०१९सारखी पूरस्थिती निर्माण केली. आता महापूर ओसरू लागला असलातरी त्याची गती कमी आहे. पाऊस कमी झाला आहे, ऊन पडले आहे, एवढाच काय तो या संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा आहे. बाकी या महापुराने पुराने बाधित झालेल्याचा संसारच उघड्यावर आणला आहे. घर, व्यवसाय, शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान केले आहे. आता पूर ओसरेल तसे नुकसानीचे मोजमाप सुरू होणार आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसा नुकसानीच्या आकड्यात भरच पडत जाणार आहे.

चौकट

१०४ पशुधन दगावले

या महापुरात १०४ पशुधन दगावले आहे. २०१९च्या पुराच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्के असलेतरी नागरिकांचा गाफीलपणा या मुक्या जनावरांना नडला आहे. या महापुरात ८ हजार ८०६ जनावरे स्थलांतरित केली आहेत. त्यांना छावण्यांच्या माध्यमातून चारा व पशुखाद्याचा पुरवठा केला जात आहे.

चौकट

महावितरणचे २३ कोटींचे नुकसान

जोरदार वाऱ्यासह ढगफुटीसारख्या पडलेल्या पावसाचा सर्वात माेठा फटका महावितरणला बसल्याचे दिसत आहे. बरेच डीपी, टीसी पाण्यामध्ये आहेत. तारा तुटून पडल्या आहेत, तर विद्युत पोल पूर्णपणे मोडून पडले आहे. काही ठिकाणी तर गाळात पूर्णपणे रुतून बसले आहेत. यंत्रणाच तुटून पडल्याने महावितरणला २३ कोटी ११ लाख ३२ हजारांचे नुकसान सोसावे लागले आहेत. अजूनही पूर ओसरलेला नसल्याने खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करणे हे मोठे दिव्य झाले आहे. तरीदेखील दोन लाखावर ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला असून एक लाखावर ग्राहक अजूनही अंधारात आहेत.

चौकट

ग्रामीण पाणीपुरवठा अजून ठप्पच

जॅकवेल, पाण्याच्या मोटारी, डीपी पाण्यात बुडाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जिल्ह्यातील ४८७ गावांतील पाणीपुरवठा बंद आहे. आतापर्यंत केवळ ३० गावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आले आहे. १३७ गावातील पुरवठा सुरू होण्यास अजून दोन दिवस लागणार आहेत. तसेच पुढील पाच दिवसात उर्वरित ३२० गावातील पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे यंत्रणेचे प्रयत्न आहेत.