शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:43 IST

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला ...

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.

दूध संघातील नोकरभरती, मल्टिस्टेट याबाबत आपली भूमिका काय? याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील दूध संस्थांचा हक्क अबाधित राहावा, कर्नाटकातील दीड-दोन हजार संस्था सभासद केल्या, तर येथील संस्थांचे महत्त्व कमी होईल. यासाठी माझा मल्टिस्टेटला विरोध आहे आणि कायद्याने जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करता येत नाही. एम. टी. सरनाईक यांनी संघाची स्थापना केली, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघ वाढविला. सरकारची अब्जावधीची मालमत्ता संघाला फुकटात मिळाली आहे. एनडीडीबी व शासकीय योजनांचे फायदे घेतल्याने बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया राबवायला हवी होती.

नोकरभरतीला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, शासनाची परवानगी घेऊन अशा प्रकारे सातारा, पुणे, अहमदनगरसह पाच जिल्हा बॅँकांनी केलेली नोकरभरती उच्च न्यायालयाने रद्द ठरविली होती. तुमचीच माणसे घ्या, पण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, परीक्षा, मुलाखती घेऊन बिंदूनामावलीप्रमाणेच भरती केली पाहिजे होती, असे मुश्रीफ यांनी सांगितले.‘गोकुळ’चा मी नेता, मग वाटा कोठे आहे?‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचा मी नेता असल्याने थोडा संयम बाळगण्याचा सल्ला महाडिक देतात. खरंच जर मी सत्तारूढ गटाचा नेता आहे, तर नोकरभरतीत माझा वाटा कोठे आहे, आतापर्यंत मला वाटणीही दिलेली नाही. असली वाटणी मला नकोच, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.शहाणी माणसे अशी भरती करणार नाहीत‘गोकुळ’च्या नेत्यांसह संचालकांनी केलेल्या नोकरभरतीने आश्चर्यचकित झालो. लोकसभा, विधानसभा तोंडावर असताना अशा प्रकारे भरती कशी केली. काहीजण स्वत:, काहींचे मुले, भाऊ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशावेळी भरती करणे धोक्याची घंटा आहे. त्याचा फटका बसू शकतो. कोणताही शहाणा माणूस अशा प्रकारची भरती करणार नाही, ते माझ्याशी बोलले असते तर सल्ला दिला असता, असा टोमणाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर