शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:43 IST

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला ...

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.

दूध संघातील नोकरभरती, मल्टिस्टेट याबाबत आपली भूमिका काय? याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील दूध संस्थांचा हक्क अबाधित राहावा, कर्नाटकातील दीड-दोन हजार संस्था सभासद केल्या, तर येथील संस्थांचे महत्त्व कमी होईल. यासाठी माझा मल्टिस्टेटला विरोध आहे आणि कायद्याने जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करता येत नाही. एम. टी. सरनाईक यांनी संघाची स्थापना केली, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघ वाढविला. सरकारची अब्जावधीची मालमत्ता संघाला फुकटात मिळाली आहे. एनडीडीबी व शासकीय योजनांचे फायदे घेतल्याने बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया राबवायला हवी होती.

नोकरभरतीला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, शासनाची परवानगी घेऊन अशा प्रकारे सातारा, पुणे, अहमदनगरसह पाच जिल्हा बॅँकांनी केलेली नोकरभरती उच्च न्यायालयाने रद्द ठरविली होती. तुमचीच माणसे घ्या, पण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, परीक्षा, मुलाखती घेऊन बिंदूनामावलीप्रमाणेच भरती केली पाहिजे होती, असे मुश्रीफ यांनी सांगितले.‘गोकुळ’चा मी नेता, मग वाटा कोठे आहे?‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचा मी नेता असल्याने थोडा संयम बाळगण्याचा सल्ला महाडिक देतात. खरंच जर मी सत्तारूढ गटाचा नेता आहे, तर नोकरभरतीत माझा वाटा कोठे आहे, आतापर्यंत मला वाटणीही दिलेली नाही. असली वाटणी मला नकोच, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.शहाणी माणसे अशी भरती करणार नाहीत‘गोकुळ’च्या नेत्यांसह संचालकांनी केलेल्या नोकरभरतीने आश्चर्यचकित झालो. लोकसभा, विधानसभा तोंडावर असताना अशा प्रकारे भरती कशी केली. काहीजण स्वत:, काहींचे मुले, भाऊ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशावेळी भरती करणे धोक्याची घंटा आहे. त्याचा फटका बसू शकतो. कोणताही शहाणा माणूस अशा प्रकारची भरती करणार नाही, ते माझ्याशी बोलले असते तर सल्ला दिला असता, असा टोमणाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर