शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

महादेवराव महाडिक दुसरे ‘मुक्त’ विद्यापीठ मुश्रीफ : ‘गोकुळ’ मल्टिस्टेटला विरोधच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:43 IST

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला ...

कोल्हापूर : सहकारी साखर कारखान्यांना परवानगी नसल्यानेच महादेवराव महाडिक यांच्या ‘बेडकीहाळ’ येथील कारखान्याप्रमाणे मी संताजी घोरपडे कारखाना उभारला. गोकुळ दूध संघ दूध संस्थांच्या मालकीचा राहावा, याच हेतूने मी बहुराज्य नोंदणीला विरोध केला; पण चंद्रकांत पाटील यांच्यानंतरचे महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्तविद्यापीठ आहे. त्यांच्यासमोर मी छोटा माणूस आहे, असा उपरोधिक टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत लगावला.

दूध संघातील नोकरभरती, मल्टिस्टेट याबाबत आपली भूमिका काय? याबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील दूध संस्थांचा हक्क अबाधित राहावा, कर्नाटकातील दीड-दोन हजार संस्था सभासद केल्या, तर येथील संस्थांचे महत्त्व कमी होईल. यासाठी माझा मल्टिस्टेटला विरोध आहे आणि कायद्याने जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करता येत नाही. एम. टी. सरनाईक यांनी संघाची स्थापना केली, आनंदराव पाटील-चुयेकर यांनी संघ वाढविला. सरकारची अब्जावधीची मालमत्ता संघाला फुकटात मिळाली आहे. एनडीडीबी व शासकीय योजनांचे फायदे घेतल्याने बिंदूनामावलीनुसार भरती प्रक्रिया राबवायला हवी होती.

नोकरभरतीला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुश्रीफ म्हणाले, शासनाची परवानगी घेऊन अशा प्रकारे सातारा, पुणे, अहमदनगरसह पाच जिल्हा बॅँकांनी केलेली नोकरभरती उच्च न्यायालयाने रद्द ठरविली होती. तुमचीच माणसे घ्या, पण वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, परीक्षा, मुलाखती घेऊन बिंदूनामावलीप्रमाणेच भरती केली पाहिजे होती, असे मुश्रीफ यांनी सांगितले.‘गोकुळ’चा मी नेता, मग वाटा कोठे आहे?‘गोकुळ’च्या सत्तारूढ गटाचा मी नेता असल्याने थोडा संयम बाळगण्याचा सल्ला महाडिक देतात. खरंच जर मी सत्तारूढ गटाचा नेता आहे, तर नोकरभरतीत माझा वाटा कोठे आहे, आतापर्यंत मला वाटणीही दिलेली नाही. असली वाटणी मला नकोच, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.शहाणी माणसे अशी भरती करणार नाहीत‘गोकुळ’च्या नेत्यांसह संचालकांनी केलेल्या नोकरभरतीने आश्चर्यचकित झालो. लोकसभा, विधानसभा तोंडावर असताना अशा प्रकारे भरती कशी केली. काहीजण स्वत:, काहींचे मुले, भाऊ, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, अशावेळी भरती करणे धोक्याची घंटा आहे. त्याचा फटका बसू शकतो. कोणताही शहाणा माणूस अशा प्रकारची भरती करणार नाही, ते माझ्याशी बोलले असते तर सल्ला दिला असता, असा टोमणाही मुश्रीफ यांनी यावेळी लगावला.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर