शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

यंदा भरपूर आमरस: पायरी ८० रुपये बॉक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या लाॅकडाऊनच्या निर्णयाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यापेक्षा हापूस आंब्याच्या पेटीचा दर ५०० रुपयांनी घसरला आहे. आमरसासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘पायरी’ही दर ८० ते १०५ रुपये डझन झाला आहे. अक्षयतृतीयेच्या अगोदर यावर्षी पहिल्यांदाच आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.

कोरोनामुळे हापूस आंब्याच्या सलग दुसऱ्या हंगामावर परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी ऐन हंगामात कडक लॉकडाऊन झाले. यावर्षी हंगाम सुरळीत होईल, असे शेतकऱ्यांना वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने निर्बंध घातले. सकाळी सात ते अकरा या वेळेत खरेदी विक्री करावी लागते. त्याचा परिणामही आंब्याच्या उलाढालीवर झाला आहे. अक्षयतृतीयेच्या तोंडावर हापूसची मागणी वाढते, आणि दर उसळी खातो, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. यंदा मात्र आवक वाढली. मात्र खरेदीदार नसल्याने दरात मोठी घट झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पेटीमागे ५०० तर बॉक्स मागे २०० रुपयांची घसरण झाली आहे.

हापूस आंब्याचा दर प्रति बॉक्स

हापूस (रत्नागिरी) - २०० ते ४०० रुपये

हापूस (कर्नाटक) - १०० ते २५० रुपये

इतर आंब्याचे दर असे प्रति बॉक्स (१२ नग)

आंबा किरकोळ घाऊक

केशर - २२५ १७५ रुपये

पायरी - २५० २०० रुपये

गावरान - १३० ७५ रुपये

आवक वाढली, ग्राहक रोडावले

कोल्हापूरात कर्नाटक, रत्नागिरी, देवगड येथून आंबा मोठ्या प्रमाणात येत आहे. हंगाम अंतिम टप्यात असल्याने आवक वाढली असली तरी कोरोनाच्या निर्बंधांमुळे ग्राहक रोडावले आहेत.

तुलनात्मक आवक व दर

तारीख हापूस आवक दर

३ मे ११ हजार ६५१ बॉक्स २०० ते ६०० रुपये

११ मे १५ हजार ७९० बॉक्स १५० ते ४०० रुपये

कोट -

साधारणत: मे महिन्यात आंबा खरेदीसाठी बाजारात जत्रा भरत होती. मात्र, यंदा निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. आवक चांगली असली तरी दर घसरले आहेत.

- सलीम बागवान (आंबा व्यापारी, बाजार समिती)

गेली दोन वर्षे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरली आहेत. अगोदरच कर्नाटक आवकेचा परिणाम झाला असताना कोरोना निर्बंधामुळे चार तासात मालाचा उठाव होत नाही. त्यामुळे पेटीमागे ७०० रुपयांचा फटका बसत आहे.

- स्वप्नील नाकरेकर (शेतकरी, पाटीलवाडी, रत्नागिरी)