शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:50 IST

politics, elecation, ajara, sugerfactory, chandrakantpatil, hasanmusrif, kolhapurnews राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

ठळक मुद्देसत्ता गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढासळलेले - हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील सत्ता गेल्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे संतुलन ढासळल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.आजरा येथे पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार हे अभ्यास नसलेले छोटे नेते असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी (दि. २१) पुण्यात केली होती, तिला मंत्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, बहुजनांचे नेतृत्व म्हणून शरद पवार यांनी नवा महाराष्ट्र घडविला. त्यांनी दहा ते बारा लोकसभेच्या व तेवढ्याच वेळा विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या.

देशाचे कृषिमंत्री, संरक्षणमंत्री या पदांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दिलेले योगदान निश्चितच मोठे आहे. राज्यात आणि केंद्रातही विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी काम केले. याचे भान त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी ठेवावे. चंद्रकांत पाटील यांना पाच वर्षे चांगली संधी मिळाली होती; मात्र त्यांनी काहीही केले नाही. राज्याला सोडाच; कोल्हापूरलाही त्यांचा काहीही उपयोग झाला नाही.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे, जयवंतराव शिंपी, वसंतराव धुरे, दिलीप लाड, मुकुंद देसाई, तानाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी तांबेकर यांनी स्वागत केले. आजराचे माजी सभापती अल्बर्ट डिसोझा यांनी प्रास्ताविक केले.पैसे घेऊन जाणारे आमचे उमेदवार नव्हेत.मेळाव्यापूर्वी मंत्री मुश्रीफ हे जनता बँकेत बसले असता, एका शेतकऱ्याने हातात पैसे भरल्याची पावती घेऊन विचारले,हिंदुस्तान शुगरच्या नावाखाली पैसे घेऊन गेलेले उमेदवार आलेत का? यावर ते आमचे उमेदवार नव्हेत, असे मुश्रीफ यांनी सांगितले. त्या उमेदवाराची मात्र तालुक्यात जोरदार चर्चा झाली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूकHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील