शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

दहावी-बारावीकडे ‘नॉलेज लाईफ’च्या दृष्टीने पाहा

By admin | Updated: December 22, 2014 00:15 IST

भारत खराटे : लोकमत बाल विकास मंच, चाटे शिक्षण समूहातर्फे शैक्षणिक मार्गदर्शन

कोल्हापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे केवळ ‘कॉलेज लाईफ’पूर्वीचा एक टप्पा म्हणून न पाहता ‘नॉलेज लाईफ’मधील मूलभूत पायरी या दृष्टीने पाहा़ एकाच अभ्यासपद्धतीचा अवलंब करा. भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षेसाठी ही पद्धत उपयुक्त ठरेल़ सराव प्रश्नपत्रिकांवर भर द्या, असा कानमंत्र चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे यांनी विद्यार्थी व पालकांना दिला़ ‘लोकमत’ बाल विकास मंच आणि चाटे शिक्षण समूहातर्फे राजारामपुरी येथील आप्पाज कॉम्प्लेक्स येथे आज, रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते़ दहावी बोर्ड परीक्षेच्या अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षा आणि संधी हा मार्गदर्शनाचा विषय होता़ खराटे म्हणाले, दहावीच्या परीक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत़ ऐनवेळी अभ्यासपद्धती न बदलता सुरुवातीपासून ज्या पद्धतीचा अवलंब केला आहे, तीच पद्धत अंतिम टप्प्यातही वापरली पाहिजे़ प्रश्नपत्रिकांचा सराव हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे़ या सरावामुळे काळ, काम आणि वेग याचे अचूक आकलन होईल़ परीक्षेचे वेळापत्रक, आरोग्य, शिक्षकांकडून पाल्याच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, याबाबत पालकांनी आपला वेळ दिला पाहिजे़ चाटे शिक्षण समूहाच्या विविध उपक्रमांबाबत बोलताना खराटे म्हणाले, चाटे शिक्षणसमूहांतर्गत ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले गु्रप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबरच मेडिकल, जेईई मुख्य आणि आयआयटी - जेईई (अ‍ॅडव्हान्स), आदी परीक्षांची तयारीही करून घेतली जाते़ चाटे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्सचे प्राचार्य प्रशांत देसाई यांनी, दहावीमध्येच विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे कंटेंट क्लीअर करून घेतल्यास जेईई, एआयपीएमटी व आयआयटीसाठी फायदा होईल, असे मत व्यक्त केले़यावेळी चाटे शिक्षण समूहाच्या कोल्हापूर विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस़ जे़ पाटील, कोल्हापूर विभागाचे प्रमुख प्रा़ सर्जेराव राऊत, शाहूपुरी शाखा व्यवस्थापक प्रा़ एल़ डी़ थोरात, पालक प्रतिनिधी राजेश शिंदे, तसेच ‘लोकमत’चे इव्हेंट प्रमुख दीपक मनाठकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले़ दुसऱ्या सत्रात प्रा़ सर्जेराव राऊत यांनी ‘दहावीच्या शिक्षणाकडे झेपावताना’ या विषयावर मार्गदर्शन करताना, सातवी ते नववी ही शैक्षणिक वर्षे स्पर्धा परीक्षेचा पाया तयार करण्यासाठी उपयुक्त आहेत, असे मत व्यक्त केले़ यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सीमा कदम उपस्थित होत्या. प्रा. प्रज्ञा गिरी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)