शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दर्शनाची ओढ, मनामनात विठूनामाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:40 IST

Pandharpur Wari Kolhapur : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर-नंदवाळ दिंडीने सजवलेल्या केएमटी बसमधून नंदवाळला प्रस्थान केले.

ठळक मुद्देकोल्हापूर-नंदवाळ पालखी वाहनातून स्टेटसपासून डीपीपर्यंत माऊलीच

कोल्हापूर : टाळ-मृदंगाचा नादब्रह्म, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नामदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय..., विठ्ठल-विठ्ठल जयहरी विठ्ठलचा गजर करत मंगळवारी आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर-नंदवाळ दिंडीने सजवलेल्या केएमटी बसमधून नंदवाळला प्रस्थान केले.आषाढी एकादशी म्हणजे महाराष्ट्राला लाभलेल्या संत परंपरेचे प्रतीक. विठ्ठलाच्या ओढीने टाळ-मृदंग आणि हरी नामाचा गजर करत मैलोनमैल प्रवास करणारे वारकरी, बहुजनांना आपल्या मायेच्या कवेत सामावून घेणाऱ्या विठ्ठलाचा वर्षातील सर्वात मोठा सोहळा; पण सलग दुसऱ्यावर्षी कोरोनामुळे तिकडे पंढरीची वारी थांबली आणि इतके कोल्हापूर-नंदवाळ ही पायी दिंडीदेखील वाहनातून न्यावी लागली.सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिरात ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव देशमुख, महालक्ष्मी कॅलेन्डरचे रणवीर शिर्के, ऋतुराज क्षीरसागर यांच्याहस्ते आरती झाली. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे ॲड. रणजितसिंह घाटगे यांच्याहस्ते माऊलींच्या अश्वाचे पूजन झाले. दिंडीप्रमुख ह. भ. प आनंदराव लाड महाराज व बाळासाहेब पवार, ॲड. राजेंद्र किंकर, वासुदेव संभाजी पाटील यांनी मान्यवरांना श्रीफळ आणि तुळस हार देऊन सत्कार केला.वारीची परंपरा जपत टाळ-मृदंगाचा गजर, फुगड्या घालून, भजन, अभंग म्हणत काही पावले माऊलींची पालखी पायी नेण्यात आली. त्यानंतर पुढे फुलांनी सजवलेल्या केएमटीमध्ये पालखी ठेवण्यात आली आणि कोल्हापूर ते नंदवाळ वारीला सुरुवात झाली. वाटेवर बिनखांबी गणेश मंदिर, उभा मारुती चौक आणि खंडोबा देवालय येथे भाविकांनी पालखी असलेल्या केएमटीवर फुलांची उधळण केली.

उभा मारुती चौकात सायबा ग्रुपच्यावतीने वारकरी बंधूंना चहा व फराळ देण्यात आला. या सोहळ्यासाठी संस्थापक-संचालक दीपक गौड, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास, ह.भ.प एम. पी. पाटील, संतोष रांगोळे तसेच श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा, भक्त मंडळ व जयशिवराय फुटबॉल प्लेयर तरुण मंडळ, राध्येय ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .विठ्ठल मंदिरात धार्मिक विधीकोरोनामुळे सगळी विठ्ठल मंदिरे बंद असल्याने सलग दुसऱ्यावर्षी कोल्हापूरकरांना घरातूनच विठ्ठलाला नमस्कार करावा लागला. मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिराच्या बाह्य परिसरात विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विठ्ठल रूपात पूजा बांधण्यात आली होती, तर परिसरातील विठ्ठल मंदिरांतदेखील सकाळी अभिषेक, आरती असे धार्मिक विधी करण्यात आले.

मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात विशेष पूजा बांधण्यात आली होती. मंगळवारी पावसाने उघडीपच दिली नाही, त्यामुळे भाविकांना मंदिराबाहेरूनही देवाचे दर्शन घेता आले नाही. दरम्यान, घराघरात वरीचा भात, खिचडी, फळे, शेंगदाणा, राजगिऱ्याचे लाडू अशा उपवासाच्या पदार्थांची रेलचेल होती. 

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीkolhapurकोल्हापूर