शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरीत पुराच्या पाण्यात अडकलेल्या गोव्यातील प्रवाशांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:16 IST

फेजिवडे येथील स्मशानशेड जवळ अडकलेल्या दोन ट्रॅव्हल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढल्या आहेत व त्या सध्या फेजीवडे गावात लावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर : पुणे-मुंबईहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या २५ ट्रॅव्हल तसेच अन्य छोटया- मोठया अशी जवळपास १५० वाहने व त्यातील ६०० प्रवाशी फेजीवडे येथे अडकले होते. त्यांची राधानगरी, फेजीवडे ग्रामस्थांनी सुखरूप सुटका केली आहे. या २५ गाड्यांमधील अंदाजे ६०० प्रवासी गोव्यातील आहेत, त्यातील अनेक प्रवासी हे परदेशी आहेत. या सर्व प्रवाशाची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे.

फेजीवडे गावचे सरपंच , उपसरपंच, सर्कल, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, या अधिकारी तसेच राधानगरी भाजप तालुका अध्यक्ष दीपक शिरगावकर, माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेट्ये आदी पदाधिकाऱ्यांनी योग्य ती मदत करत त्यांना राधानगरीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आहे. त्यांनी राधानगरी आगारात आश्रय घेतला असून एस टी प्रशासनाने मुक्कमाची जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच येथील अंबाबाई मंदिरात काहीजनांची तर महिला व मुलांच्या मुक्कामाची काही घरांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

     

दरम्यान या सर्व प्रवाशांना येथील मुस्लीम बांधव रफीक नावळेकर यांनी मानवता व दातृत्वाच्या भावनेतुन स्वखर्चातून चहा, नाष्टा , व लहान मुलांच्या भोजनाची सोय करून दिली. या सर्व प्रवाशांनी नावळेकर कुटुंबीयांचे विशेष आभार मानले .    फेजिवडे येथील स्मशानशेड जवळ अडकलेल्या दोन ट्रॅव्हल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढल्या आहेत व त्या सध्या फेजीवडे गावात लावण्यात आल्या आहेत.

 दरम्यान, कोल्हापूरहून कणकवली -गोव्याकडे जाणाऱ्या कांही गाडया फेजीवडे येथे पाणी आल्याचा कारणास्तव राधानगरी आगारात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. यातील सर्व प्रवाशी सुखरूप आहेत .

पुणे येथून कोल्हापूर मार्गे गोव्यात येणाऱ्या बारा बसेस आणि सुमारे दिडशेहुन अधीक गोव्याचे प्रवाशी कोल्हापूर महामार्ग आणि देवगड येथील अंतर्गत रस्ता पुरात बुडाल्याने कोल्हापूर नजीक राधानगरी येथे अडकून पडले होते. दरम्यान राधानगरीपासून एक किलोमीटर अंतरावर फेजीवडे येथे बस पाण्यात अडकली होती. त्यातील तीस प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. 

फेजीवडे व राधानगरी ग्रामस्थांनी या सर्व लोकांना बचाव पथकाच्या मदतीने सुरक्षित जागी हलवले आहे. अडकून पडलेल्या वृद्ध,महिला आणि मुलांना कालपासून काहीच खायला मिळालेले नाही. पाण्याची पातळी वाढत चालल्याने या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

मंगळवारी पहाटेपासून हे पर्यटक राधानगरीत अडकून पडले आहेत. यामध्ये काही विदेशी पर्यटकांचा पण समावेश आहे. 

तुफान पावसामुळे राधानगरीतील बहुतांशी हॉटेल, दुकाने बंद असल्यामुळे या सर्व प्रवाशी, लहान मुले, वृद्ध यांची खाण्या पिण्याचे खूप हाल होत होते, याची माहिती मिळताच राधानगरीचे माजी शिक्षण सभापती अभिजित तायशेटे व स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांनी एस टी स्टॅन्ड येथे त्यांच्या जेवणाची व अल्पोपहाराची सोय केलेली आहे. स्थानिक एस टी प्रशासनाने यासाठी सहकार्य केले असून, आता सर्व पूर ओसरण्याची वाट पाहत आहेत. यामधील महिला प्रवाशांना गावातील घरामध्ये आज निवासाची पण सोय करणार असलेची अभिजित तायशेटे यांनी सांगितले.

संपर्काचे आवाहन

 सध्या राधानगरी मध्ये वीज व फोन रेंज नसले मुले या प्रवाशांच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना संपर्क करायचा असल्यास 02321-234024 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूर