शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:38 IST

दत्तात्रय पाटील म्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेकागल तालुक्यातील चित्र : जगायचं कसं? हीच विवंचना

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग पिके उद्ध्वस्त झालीच; पण महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाढविलेले ऊस पीक अक्षरश: जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे. सहा महिने राबून हातातोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने जगायचं कसं? या विवंचनेत शेतकरी आहेत.परतीच्या पावसाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. साधारणत: तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमुगांसह कडधान्य घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिल्याने भात, सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

भात आणि सोयाबीन पाण्यात गेल्याने खराब होऊन अस्वे (कोंब) फुटले आहेत. सोयाबीनच्या शेंगा कुजल्या तर ज्या पाण्याच्या वर राहिल्या त्याचे दाणे काळे पडले आहेत. जमिनीची प्रत चांगली असल्याने भात गुंठ्याला क्विंटल उत्पादन मिळत होते. यंदा मात्र त्यात मोठी घट झाली आहे. भात, सोयाबीनचे बियाणे खरेदी, मशागत आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.रब्बीचे वेळापत्रक कोलमडलेपरतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे राहिले आहे. त्यातून भातासह इतर पिके काढली तरी रब्बीची पेरणी करणे अवघड बनले आहे. आता पाऊस थांबला तर जमिनीला वापसा येण्यासाठी किमान १५ ते २0 दिवस लागणार आहेत. त्यानंतरच रब्बीच्या पेरण्या होऊ शकतात. जरी रब्बीचा हंगाम नोव्हेंबरअखेर असला तरी उसाच्या नवीन लागणी मात्र खोळंबल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गेल्यावर्षी २० गुंठ्यात भाताचे १९ क्विंटलचे उत्पादन मिळाले; पण यंदा सहा क्विंटलही पदरात पडले नाही. यातून आतापर्यंत केलेला खर्चही निघालेला नाही, मग सांगा आम्ही जगायचं कसं?- तेजस पाटील,शेतकरी, मळगे

महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून कशीबशी वाढविलेली पिके परतीच्या पावसाने घालवली. सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या, पाण्याने कुजल्या तर राहिलेल्या शेंगांचे दाणे काळे पडल्याने त्याला कोणी घेण्यास तयार नाही.- अमर पाटील, शेतकरी, बानगे

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkagal-acकागलkolhapurकोल्हापूर