शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:38 IST

दत्तात्रय पाटील म्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेकागल तालुक्यातील चित्र : जगायचं कसं? हीच विवंचना

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग पिके उद्ध्वस्त झालीच; पण महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाढविलेले ऊस पीक अक्षरश: जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे. सहा महिने राबून हातातोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने जगायचं कसं? या विवंचनेत शेतकरी आहेत.परतीच्या पावसाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. साधारणत: तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमुगांसह कडधान्य घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिल्याने भात, सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

भात आणि सोयाबीन पाण्यात गेल्याने खराब होऊन अस्वे (कोंब) फुटले आहेत. सोयाबीनच्या शेंगा कुजल्या तर ज्या पाण्याच्या वर राहिल्या त्याचे दाणे काळे पडले आहेत. जमिनीची प्रत चांगली असल्याने भात गुंठ्याला क्विंटल उत्पादन मिळत होते. यंदा मात्र त्यात मोठी घट झाली आहे. भात, सोयाबीनचे बियाणे खरेदी, मशागत आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.रब्बीचे वेळापत्रक कोलमडलेपरतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे राहिले आहे. त्यातून भातासह इतर पिके काढली तरी रब्बीची पेरणी करणे अवघड बनले आहे. आता पाऊस थांबला तर जमिनीला वापसा येण्यासाठी किमान १५ ते २0 दिवस लागणार आहेत. त्यानंतरच रब्बीच्या पेरण्या होऊ शकतात. जरी रब्बीचा हंगाम नोव्हेंबरअखेर असला तरी उसाच्या नवीन लागणी मात्र खोळंबल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गेल्यावर्षी २० गुंठ्यात भाताचे १९ क्विंटलचे उत्पादन मिळाले; पण यंदा सहा क्विंटलही पदरात पडले नाही. यातून आतापर्यंत केलेला खर्चही निघालेला नाही, मग सांगा आम्ही जगायचं कसं?- तेजस पाटील,शेतकरी, मळगे

महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून कशीबशी वाढविलेली पिके परतीच्या पावसाने घालवली. सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या, पाण्याने कुजल्या तर राहिलेल्या शेंगांचे दाणे काळे पडल्याने त्याला कोणी घेण्यास तयार नाही.- अमर पाटील, शेतकरी, बानगे

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkagal-acकागलkolhapurकोल्हापूर