शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 14:38 IST

दत्तात्रय पाटील म्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग ...

ठळक मुद्दे‘लोकमत’ बांधावर : उद्ध्वस्त पिके पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेकागल तालुक्यातील चित्र : जगायचं कसं? हीच विवंचना

दत्तात्रय पाटीलम्हाकवे : कागल तालुक्यात यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली आहे. काढणीस आलेले भात, सोयाबीन, भुईमूग पिके उद्ध्वस्त झालीच; पण महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाढविलेले ऊस पीक अक्षरश: जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे. सहा महिने राबून हातातोंडाला आलेले पीक पाण्यात गेल्याने जगायचं कसं? या विवंचनेत शेतकरी आहेत.परतीच्या पावसाने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून, ‘लोकमत’च्या प्रस्तूत प्रतिनिधींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. साधारणत: तालुक्यात भात, सोयाबीन, भुईमुगांसह कडधान्य घेतले जाते. यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिल्याने भात, सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

भात आणि सोयाबीन पाण्यात गेल्याने खराब होऊन अस्वे (कोंब) फुटले आहेत. सोयाबीनच्या शेंगा कुजल्या तर ज्या पाण्याच्या वर राहिल्या त्याचे दाणे काळे पडले आहेत. जमिनीची प्रत चांगली असल्याने भात गुंठ्याला क्विंटल उत्पादन मिळत होते. यंदा मात्र त्यात मोठी घट झाली आहे. भात, सोयाबीनचे बियाणे खरेदी, मशागत आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.रब्बीचे वेळापत्रक कोलमडलेपरतीच्या पावसाने शिवारात पाणी उभे राहिले आहे. त्यातून भातासह इतर पिके काढली तरी रब्बीची पेरणी करणे अवघड बनले आहे. आता पाऊस थांबला तर जमिनीला वापसा येण्यासाठी किमान १५ ते २0 दिवस लागणार आहेत. त्यानंतरच रब्बीच्या पेरण्या होऊ शकतात. जरी रब्बीचा हंगाम नोव्हेंबरअखेर असला तरी उसाच्या नवीन लागणी मात्र खोळंबल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

गेल्यावर्षी २० गुंठ्यात भाताचे १९ क्विंटलचे उत्पादन मिळाले; पण यंदा सहा क्विंटलही पदरात पडले नाही. यातून आतापर्यंत केलेला खर्चही निघालेला नाही, मग सांगा आम्ही जगायचं कसं?- तेजस पाटील,शेतकरी, मळगे

महापूर आणि अतिवृष्टीच्या तडाख्यातून कशीबशी वाढविलेली पिके परतीच्या पावसाने घालवली. सोयाबीनच्या शेंगा गळून पडल्या, पाण्याने कुजल्या तर राहिलेल्या शेंगांचे दाणे काळे पडल्याने त्याला कोणी घेण्यास तयार नाही.- अमर पाटील, शेतकरी, बानगे

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkagal-acकागलkolhapurकोल्हापूर