शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

Lok Sabha Election 2019 : युतीच्या सभेला प्रत्युत्तर देण्याची ‘राष्ट्रवादी’ची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 11:25 IST

शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मित्रपक्षांनी केली आहे. मतदानाला अजून जवळपास महिना असल्याने साधारणत: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व ‘रिपाइं’ नेत्यांच्या उपस्थितीत जंगी सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तपोवन मैदानातूनच प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

ठळक मुद्देयुतीच्या सभेला प्रत्युत्तर देण्याची ‘राष्ट्रवादी’ची तयारीतपोवन मैदानावरूनच उत्तर देणार : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शक्य

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीच्या प्रचारसभेला त्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मित्रपक्षांनी केली आहे. मतदानाला अजून जवळपास महिना असल्याने साधारणत: उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व ‘रिपाइं’ नेत्यांच्या उपस्थितीत जंगी सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तपोवन मैदानातूनच प्रत्युत्तर दिले जाणार आहे.राज्यात युतीचा प्रचार सुरू झाला असताना दोन्ही कॉँग्रेसच्या पातळीवर एकदमच शांतता दिसत आहे. त्या-त्या मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले असले तरी कऱ्हाड वगळता एकत्रित मोठ्या सभा कोठे झालेल्या दिसत नाहीत. परिणामी दोन्ही कॉँग्रेसचे कार्यकर्ते प्रचारात एकदिलाने सक्रिय दिसत नाहीत. त्यात युतीच्या प्रचाराचा नारळ जोरदार शक्तिप्रदर्शन करीत कोल्हापुरातून फोडल्याने शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाल्याचे दिसतात.

या सभेत मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी दोन्ही कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला होता. विशेषत: पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. या टीकेला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. गांधी मैदानात सभा घ्यावी, असा काहींचा मतप्रवाह आहे; पण तपोवन मैदानातच सभा घेऊन युतीला प्रत्युत्तर द्यावे, असा प्रयत्नही सुरू आहे.राष्ट्रवादीने २० ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. त्या ठिकाणी कॉँग्रेससह मित्रपक्षांसोबत चर्चा करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर दिली आहे. त्यानुसार पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या असून, कोणत्या मतदारसंघात अडचणी आहेत, त्यांचा अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे. त्यानंतर कॉँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्या माध्यमातून जिथे दुरुस्त्या करता येतील, तिथे त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही जंगी सभा घेण्याचे नियोजन आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी प्रयत्नमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवसेना-भाजपविरोधातील सभा महाराष्ट्रात होणार आहेत. त्यांतील एक सभा कोल्हापुरात घ्यावी का? त्याचे बरे-वाईट परिणाम काय होऊ शकतात, याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा अभ्यास सुरू आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस