शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी रद्द केल्यास बेमुदत आंदोलन

By admin | Updated: June 17, 2014 01:51 IST

मनपा कर्मचारी फेडरेशनचा इशारा : मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

कोल्हापूर : उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका कर्मचारी, कामगार बेमुदत आंदोलन करतील, असा इशारा काल, रविवारी महाराष्ट्र राज्य महानगरपालिका-नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटना फेडरेशनच्या बैठकीत देण्यात आला. जर व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एलबीटी रद्द केला तर येत्या विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील चाणक्य सभागृहात फेडरेशनचे शरद राव यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातील महानगरपालिका कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जकात व एलबीटीचा प्रश्न उच्च न्यायालयामार्फत सोडविल्यानंतरच राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावयास हवा. केवळ राजकीय व मतांचा विचार करून किंवा व्यापाऱ्यांच्या दबावाखाली येऊन सरकारने एलबीटी रद्द करण्याचा प्रयत्न करणे हे भारतीय घटनेची पायमल्ली असून, उच्च व सर्वाेच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखे होईल. म्हणूनच राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेतल्यास त्याला आमचा विरोध आहे, असे फेडरेशनने म्हटले आहे. बैठकीत सर्वांनुमते घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, पालिका व नगरपालिका क्षेत्रांतील सर्व कर्मचारी, लाखो फेरीवाले, आॅटोरिक्षा चालक-मालक, राज्य सरकारी कर्मचारी संघटनांनी कामगार व कर्मचाऱ्यांचे नुकसान करणाऱ्या राज्य सरकारमधील सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना येत्या निवडणुकीत मतदान करू नये, कामगार व श्रमिकांची ताकद सरकारला दाखवून द्यावी, असे आवाहन करण्यात आले. या काळात राज्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांचे बटीक बनून काम करू नये, असे आवाहनही करण्यात आले. राज्य सरकार वारंवार संपबंदीची धमकी देत असते. जर या सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रथम व्यापारी व व्यापाऱ्यांच्या संपावर बंदी आणावी. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्णयांची पाठराखण करून घटनेनुसार कायदेशीर पाऊल उचलावे, असे आव्हान देण्यात आले. एलबीटी रद्द झाल्यास अथवा व्यापाऱ्यांना सूट मिळेल असे काही केल्यास महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या आर्थिक बळावर चालत आलेल्या परिवहन सेवासुद्धा अडचणीत येतील, बंद पडतील, अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. बैठकीला रमेश देसाई, बबनराव झिंजुर्डे, सुभाष सरीन, प्रकाश जाधव, तुकाराम जगताप, सखाराम राव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)