शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

मतदान यंत्रे कुलूपबंद: कडेकोट पहारा, स्ट्राँगरूममध्ये जमा: ‘सीपीएफ’चा खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 11:55 IST

१७ व्या लोकसभेत कोल्हापूर व हातकणंगलेचे खासदार कोण असणार, हे ठरविणारी मतदान यंत्रे बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात दाखल झाली. रात्रभर मशीन सील करून बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती रमणमळा व राजाराम तलाव येथील शासकीय गोदामांत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये कुलूपबंद करण्यात आली.

ठळक मुद्देमतदान यंत्रे कुलूपबंद: कडेकोट पहारायंत्रे स्ट्राँगरूममध्ये जमा: ‘सीपीएफ’चा खडा पहारा

कोल्हापूर : १७ व्या लोकसभेत कोल्हापूर व हातकणंगलेचे खासदार कोण असणार, हे ठरविणारी मतदान यंत्रे बुधवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत कोल्हापुरात दाखल झाली. रात्रभर मशीन सील करून बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ती रमणमळा व राजाराम तलाव येथील शासकीय गोदामांत तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये कुलूपबंद करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक निरीक्षक व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सील करून या स्ट्राँगरूम सेंट्रल पोलीस फोर्सच्या ताब्यात देण्यात आल्या. आता महिनाभर यावर या यंत्रणेचा खडा पहारा राहणार आहे.मंगळवारी (दि. २३) मतदान झाल्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानयंत्राच्या पेट्या मंगळवारी रात्रीच १२ ते एक या वेळेत सहायक निवडणूक कक्षात जमा झाल्या. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता करवीर मतदारसंघातील पेट्या सर्वप्रथम जमा झाल्या.

हे काम दिवसभर सुरू होते. पेट्या घेऊन येणारा शेवटचा ट्रक हातकणंगले मतदारसंघातील शिराळा विधानसभा मतदारसंघातून दुपारी साडेतीनच्या सुमारास आला. ही यंत्रे घेऊन येणाऱ्या ट्रकना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली होती. त्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्तही देण्यात आला होता.या पेट्या एकत्र आल्यानंतर हातकणंगले मतदारसंघासाठी राजाराम तलाव येथे तयार केलेल्या स्ट्राँगरूममध्ये, तर कोल्हापूरच्या पेट्या रमणमळा येथील शासकीय गोदामातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्याची प्रक्रिया चार वाजल्यापासून सुरू झाली. साडेसहाच्या सुमारास या सर्व पेट्या ठेवल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही स्ट्राँगरूम सील करण्यात आली.

कडेकोट पहारास्ट्राँगरूमवर आजपासून २३ मेपर्यंत महिनाभर सुरक्षेचा कडकोट पहारा राहणार आहे. ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या रूमच्या आत व बाहेर अहोरात्र असणार आहे. या रूमची सर्व सुरक्षा सेंट्रल पोलीस फोर्स व राज्य राखीव दलाकडे असणार आहे. नायब तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असणारे पथक यासाठी तैनात करण्यात आले असून ते आठ तासांप्रमाणे तीन शिफ्टमध्ये तेथे उपस्थित असणार आहेत.

सहायक निवडणूक अधिकारी, तहसीलदार हे महिनाभर रोज सकाळी व संध्याकाळी असे दोन टप्प्यांत जाऊन सुरक्षेची पाहणी करून भेट पुस्तिकेत नोंद करणार आहेत. जिल्हाधिकारी या सर्व सीसीटीव्हीचे रोजचे फुटेज पाहून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय रात्रभर जागेजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रभर या पेट्या सील करण्याचे काम सुरू होते. बुधवारी सकाळी सहा वाजता हे काम संपवूनच जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी आपापल्या घरी परतले. तासाभराच्या विश्रांतीनंतर ते परत जिल्हाधिकारी कार्यालयात आले. रात्रभर कार्यालय जागेच राहिले. तब्बल ३६ तासांहून अधिक काळ हे अधिकारी व कर्मचारी हे काम अविरतपणे करत होते.

राजकीय पक्षांना तंबू लावता येणारईव्हीएमच्या सुरक्षेवरून तक्रारी येत असल्याने निवडणूक आयोगाने स्ट्राँगरूमच्या परिसरात जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने स्वत:चा तंबू घालण्याची मुभा राजकीय पक्षांना देण्यात आली आहे. मात्र पक्षांनी स्वखर्चाने हे तंबू उभारायचे आहेत.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर