शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

डीबीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोट

By admin | Updated: January 28, 2015 01:00 IST

तिन्ही पोलीस ठाण्यांचा सहभाग : इचलकरंजीत गुन्हे रोखण्यासाठी एस. चैतन्य यांची नवीन संकल्पना

अतुल आंबी-इचलकरंजी -शहर व परिसरात सुरू असलेल्या घरफोड्या, वाटमारी, चोऱ्या, धूमस्टाईलने दागिने लंपास, अशा घटनांचा तपास करण्यासाठी एक नवीन संकल्पना सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी निर्माण केली आहे. यामध्ये शहरातील तिन्ही पोलीस ठाण्यातील गुन्हे शोधपथक (डीबी) व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची एकत्रित मोट बांधली आहे. हद्दीचा वाद विसरून या पथकांमधील पोलीस चोरांना पकडण्यासाठी एकत्रित यंत्रणा राबविणार आहेत.गत आठ महिन्यांपासून इचलकरंजी शहरासह परिसरातही चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये चोऱ्या झाल्याने अनेकांचे सर्वस्व चोरीला गेले आहे. अशा कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणीही चोरट्यांनी बिनधास्तपणे चोऱ्या केल्या. शहरातील शिवाजीनगर, गावभाग व शहापूर या तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लागोपाठ चोऱ्या, घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर धूमस्टाईलने दिवसाढवळ्या भरचौकातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने, गंठण हिसडा मारून भरधाव वेगाने निघून जाण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. त्यामुळे महिला वर्गाला असुरक्षितता जाणवत आहे. भरीस भर म्हणून गंभीर स्वरूपाच्या वाटमारींचे प्रकारही शहरात सुरू झाले आहेत. शहापूर हद्दीत सोनाराला अडवून लुटण्याचा प्रकार, तसेच जुन्या बसस्थानक चौकात मोटारगाडी अडवून, कोयत्याचा धाक दाखवून साडेचार लाख रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार, यासह कामगारांना पगारादिवशी अडवून रोख रक्कम, मोबाईल काढून घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्याचबरोबर किरकोळ स्वरूपाच्या खंडण्या, हप्ता वसुली, बसस्थानक परिसरात प्रवाशांचे पाकीट मारणे, महिलांचे दागिने चोरणे, अशा किरकोळ चोऱ्याही वरचेवर घडतात. यामधील कित्येक प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत येतच नाहीत. काही घटना नोंद होतात, तर काही नाहीत. यामुळे इचलकरंजीच्या पोलीस यंत्रणेला जिल्ह्यात बदनामीच्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी आपापल्या गुन्हेशोध पथकासहित गतिमान चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. जंग-जंग पछाडले, तरी भुरट्या चोरट्यांशिवाय पोलीस ठाण्यातील या पथकांना ठोस अशी कामगिरी बजावता आली नाही. त्याचबरोबर अन्य गस्ती पोलिसांना चोऱ्या रोखण्यामध्येही यश आले नाही. त्यामुळे सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यासंदर्भात बैठक घेतली. यामध्ये तिन्ही पोलीस ठाण्यांतील ‘डीबी’च्या पोलिसांना हद्दीचा बांध काढून टाकून संपूर्ण शहर व परिसरात तपास यंत्रणा राबविण्याची मुभा दिली आहे. त्यांच्याबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकालाही संलग्न केले आहे. त्यामुळे धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यासाठी ही योजना कितपत यशस्वी होते, याकडे लक्ष लागले आहे.