शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुद्रा योजनेतील १४५ कोटींचे कर्ज बुडणार, कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ११३२ कोटींचे वाटप 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 10, 2024 16:33 IST

राजकीय दबावापोटी सरकारी यंत्रणा हतबल

इंदुमती गणेशकोल्हापूर : लहान व्यावसायिकांसाठी वरदान ठरलेल्या मुद्रा योजनेंतर्गत आजवर दिल्या गेलेल्या कर्जापैकी १८ हजार ३११ खातेदारांचे विविध बँकांचे जवळपास १४५ कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. ही योजना २०१५ मध्ये साली सुरू झाली असून मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ११३२ कोटींचे कर्ज वाटप झाले. यामध्ये सर्वाधिक कर्ज तरुण उद्योजकांना वाटप झाले आहे. परंतु सरकारी योजनांतून कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्यायची आणि त्याचे हप्ते फेडले नाहीत तरी चालतात, किंवा निवडणुका आल्यावर सरकारच माफ करते अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे नियमित हप्ते भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारी यंत्रणांचेही राजकीय दबावापोटी हात बांधलेले असतात, परिणामी वसुलीवर मर्यादा येत असल्याचे अनुभव आहेत.स्वत:चा व्यवसाय सुरू करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते, ज्यांना शून्यातून आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी मुद्रा याेजनेसारखी योजना नाही. या योजनेअंतर्गत लहान व्यावसायिकांना कोणत्याही तारणाशिवाय १० लाखांचे कर्ज मिळते. पण या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अग्रणी बँकेकडील आकडेवारीनुसार योजना सुरू झाल्यापासून आजवर १८ हजार ३११ खातेदारांची १४५ कोटींची रक्कम थकित आहे. हे प्रमाण ८ टक्के इतके आहे.

‘मुद्रा’चे तीन प्रकारचे कर्ज

  • शिशू कर्ज : या श्रेणीत ५० हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • किशोर कर्ज : किशोर श्रेणीत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • तरुण कर्ज : या श्रेणीत ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

वर्ष : कर्जाची एकूण रक्कम

  • २०२१-२२ : ४९४.९७ कोटी
  • २०२२-२३ : ९६४.१५ कोटी
  • २०२३-२४ : ११३१.७७ कोटी
  • एकूण : २ हजार ५९०.८९ कोटी

कर्ज थकीत राहण्याची कारणे

  • ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेे आहे, त्या व्यवसायात अपयश.
  • व्यवसायाऐवजी अन्य कारणासाठी रकमेचा वापर.
  • कर्ज घेण्यापुरता व्यवसाय दाखवणे.

राज्यात ४ हजार कोटीकोल्हापूरच नव्हे तर राज्यातही मुद्रा अंतर्गत दिलेल्या कर्जापैकी एकूण ४ हजार कोटींच्या कर्जाची थकबाकी आहे. यात सर्वाधिक एनपीएचे प्रमाण किशोर गटात आहे. यामध्ये २७ हजार ४२२ खातेदारांचे १३४२ कोटी रुपये थकीत आहेत.

मुद्रा योजनेचा लाभ घेत अनेक लाेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहे. त्यांच्याकडून कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे. योजनांचा लाभ घेताना नागरिकांनीदेखील आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करत स्वत:ची, जिल्ह्याच्या व राज्याच्या आर्थिक सुबत्तेत हातभार लावावा. -गणेश गोडसे, जिल्हा समन्वयक. अग्रणी बँक कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक