शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

मुद्रा योजनेतील १४५ कोटींचे कर्ज बुडणार, कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षी ११३२ कोटींचे वाटप 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 10, 2024 16:33 IST

राजकीय दबावापोटी सरकारी यंत्रणा हतबल

इंदुमती गणेशकोल्हापूर : लहान व्यावसायिकांसाठी वरदान ठरलेल्या मुद्रा योजनेंतर्गत आजवर दिल्या गेलेल्या कर्जापैकी १८ हजार ३११ खातेदारांचे विविध बँकांचे जवळपास १४५ कोटी रुपये बुडण्याच्या मार्गावर आहेत. ही योजना २०१५ मध्ये साली सुरू झाली असून मागील आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ११३२ कोटींचे कर्ज वाटप झाले. यामध्ये सर्वाधिक कर्ज तरुण उद्योजकांना वाटप झाले आहे. परंतु सरकारी योजनांतून कर्ज प्रकरणे मंजूर करून घ्यायची आणि त्याचे हप्ते फेडले नाहीत तरी चालतात, किंवा निवडणुका आल्यावर सरकारच माफ करते अशी लोकांची मानसिकता बनली आहे. त्यामुळे नियमित हप्ते भरण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारी यंत्रणांचेही राजकीय दबावापोटी हात बांधलेले असतात, परिणामी वसुलीवर मर्यादा येत असल्याचे अनुभव आहेत.स्वत:चा व्यवसाय सुरू करणे म्हणजे येरागबाळ्याचे काम त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते, ज्यांना शून्यातून आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी मुद्रा याेजनेसारखी योजना नाही. या योजनेअंतर्गत लहान व्यावसायिकांना कोणत्याही तारणाशिवाय १० लाखांचे कर्ज मिळते. पण या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. अग्रणी बँकेकडील आकडेवारीनुसार योजना सुरू झाल्यापासून आजवर १८ हजार ३११ खातेदारांची १४५ कोटींची रक्कम थकित आहे. हे प्रमाण ८ टक्के इतके आहे.

‘मुद्रा’चे तीन प्रकारचे कर्ज

  • शिशू कर्ज : या श्रेणीत ५० हजारांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
  • किशोर कर्ज : किशोर श्रेणीत ५० हजार ते ५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • तरुण कर्ज : या श्रेणीत ५ ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

वर्ष : कर्जाची एकूण रक्कम

  • २०२१-२२ : ४९४.९७ कोटी
  • २०२२-२३ : ९६४.१५ कोटी
  • २०२३-२४ : ११३१.७७ कोटी
  • एकूण : २ हजार ५९०.८९ कोटी

कर्ज थकीत राहण्याची कारणे

  • ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतलेे आहे, त्या व्यवसायात अपयश.
  • व्यवसायाऐवजी अन्य कारणासाठी रकमेचा वापर.
  • कर्ज घेण्यापुरता व्यवसाय दाखवणे.

राज्यात ४ हजार कोटीकोल्हापूरच नव्हे तर राज्यातही मुद्रा अंतर्गत दिलेल्या कर्जापैकी एकूण ४ हजार कोटींच्या कर्जाची थकबाकी आहे. यात सर्वाधिक एनपीएचे प्रमाण किशोर गटात आहे. यामध्ये २७ हजार ४२२ खातेदारांचे १३४२ कोटी रुपये थकीत आहेत.

मुद्रा योजनेचा लाभ घेत अनेक लाेकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहे. त्यांच्याकडून कर्जाची नियमित परतफेड सुरू आहे. योजनांचा लाभ घेताना नागरिकांनीदेखील आर्थिक शिस्त बाळगणे गरजेचे आहे. कर्जाचा उपयोग व्यवसायासाठी करत स्वत:ची, जिल्ह्याच्या व राज्याच्या आर्थिक सुबत्तेत हातभार लावावा. -गणेश गोडसे, जिल्हा समन्वयक. अग्रणी बँक कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँक