शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

मांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:21 IST

मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. ​​​​​​​

ठळक मुद्देमांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदानहुतात्मा पार्कातील घटना: आठवड्यातील दुसरा प्रकार

कोल्हापूर : मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.‘ढील ढील दे दे रे रे रे भैय्या, इस पतंग को ढील दे......’ असे गाणे गुणगुणत पतंग उडवणे सोपे असते. एकमेकांचा पतंग कापता यावा, म्हणून वापरल्या जाणाऱ्या या मांजा दोऱ्यामुळे मात्र अशा निरपराध जिवांचे दोरच कापले जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत.

चार, पाच दिवसांपूर्वी बिंदू चौकातील एका उंच झाडावर मांजा दोऱ्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला जीवदान दिले होते. बुधवारी हुतात्मा पार्कात आणखी एक कावळा असा दोऱ्यात अडकल्याचा फोन तेथील व्यावसायिक शेखर वाघमारे यांंनी केला. क्षणाचाही विलंब न करता संदीप देवकुळे, आशुतोष सूर्यवंशी, अवधूत पाटील, देवेंद्र भोसले, अनिकेत खोत, अनिरुद्ध सावंत, ओमकार पाटील, अभिजित सूर्यवंशी हे मित्र धावले.झाड खूपच उंचीवर, ओढ्यालगत आणि खूप धोकादायक असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. झाडावरून काढत असताना कावळा खाली ओढ्यात पडला. ओढ्यातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटलेली असतानाही आशितोष सूर्यवंशी व अवधूत पाटील हे दोघे त्या सांडपाण्यात उतरले.

माणुसकीवरून विश्वास उडाल्याने कदाचित तो कावळा दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पण पंख आणि पाय हे मांजामध्ये अडकल्याने अखेर त्याने सहकार्य केले. मांजाची खूप गुंतागुंत झाली होती. कावळ्याला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्या सगळ्या त्रासातून त्याची मुक्तता केली.

कावळ्याच्या जिवाचा प्रश्न सुटला पण हे जर असंच चालत राहिलं तर आपण आपल्या हौसेखातर अशा निरपराध पशुपक्ष्यांचा बळी घेणार का? हा प्रश्न मात्र आ वासून उभा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आपला छंद, आवड आपण जरूर बाळगावी पण त्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर तो छंद, ती आवड काय कामाची?- संदीप देवकुळे, सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान

 

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर