शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:21 IST

मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली. ​​​​​​​

ठळक मुद्देमांजात अडकलेल्या कावळ्याला तरुणांकडून जीवदानहुतात्मा पार्कातील घटना: आठवड्यातील दुसरा प्रकार

कोल्हापूर : मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या दोन कावळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.‘ढील ढील दे दे रे रे रे भैय्या, इस पतंग को ढील दे......’ असे गाणे गुणगुणत पतंग उडवणे सोपे असते. एकमेकांचा पतंग कापता यावा, म्हणून वापरल्या जाणाऱ्या या मांजा दोऱ्यामुळे मात्र अशा निरपराध जिवांचे दोरच कापले जात आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत.

चार, पाच दिवसांपूर्वी बिंदू चौकातील एका उंच झाडावर मांजा दोऱ्यामध्ये अडकलेल्या कावळ्याला जीवदान दिले होते. बुधवारी हुतात्मा पार्कात आणखी एक कावळा असा दोऱ्यात अडकल्याचा फोन तेथील व्यावसायिक शेखर वाघमारे यांंनी केला. क्षणाचाही विलंब न करता संदीप देवकुळे, आशुतोष सूर्यवंशी, अवधूत पाटील, देवेंद्र भोसले, अनिकेत खोत, अनिरुद्ध सावंत, ओमकार पाटील, अभिजित सूर्यवंशी हे मित्र धावले.झाड खूपच उंचीवर, ओढ्यालगत आणि खूप धोकादायक असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. झाडावरून काढत असताना कावळा खाली ओढ्यात पडला. ओढ्यातील सांडपाण्याला दुर्गंधी सुटलेली असतानाही आशितोष सूर्यवंशी व अवधूत पाटील हे दोघे त्या सांडपाण्यात उतरले.

माणुसकीवरून विश्वास उडाल्याने कदाचित तो कावळा दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. पण पंख आणि पाय हे मांजामध्ये अडकल्याने अखेर त्याने सहकार्य केले. मांजाची खूप गुंतागुंत झाली होती. कावळ्याला कसलाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्या सगळ्या त्रासातून त्याची मुक्तता केली.

कावळ्याच्या जिवाचा प्रश्न सुटला पण हे जर असंच चालत राहिलं तर आपण आपल्या हौसेखातर अशा निरपराध पशुपक्ष्यांचा बळी घेणार का? हा प्रश्न मात्र आ वासून उभा आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आपला छंद, आवड आपण जरूर बाळगावी पण त्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल तर तो छंद, ती आवड काय कामाची?- संदीप देवकुळे, सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठान

 

टॅग्स :environmentपर्यावरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यkolhapurकोल्हापूर