शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:25 IST

कोल्हापुरात पार पडले पहिले नांगरट साहित्य संमेलन

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कोणत्याच राज्यकर्त्यांनी देशातील गावखेड्यांतील हातांना रोजगार उपलब्ध केला नाही, त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या भूमीची, मातीची, बळीराजाची राज्यकर्त्यांनी कधीच कदर केली नाही. मात्र, साहित्यिकांनी तरी लेखणीची माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अशी साद ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्यिकांना घातली.स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने कोल्हापुरात रविवारी (दि.४) आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून वाघ बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनातील वि. स. खांडेकर सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते नांगराचा फाळ व खिलार बैलजोडीचे पूजन करून करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप व पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी खासदार व संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.ज्ञानेश्वरांनी कित्येक शतकांपूर्वी येथील शेतकऱ्यांची व्यथा, त्यांचे योगदान ओवीतून मांडले. पण, कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. पाणी हेच येथील शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे. त्यामुळे हा प्रश्न पहिल्यांदा सोडविणे गरजेचे आहे. देशातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा असूनही तो घटकच का बेदखल केला जात आहे, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.स्वातंत्र्यानंतर खेड्यात रोजगार,सुविधा देण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळेच गावाकडची मुले शहराची वाट धरत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या अनेक कवितांच्या पंक्तीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सरकारच्या धाेरणांचेही वाभाढे काढले.रामदास फुटाणे म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर जात-पात-धर्म याच्या पलीकडे जाऊन भूमिका घ्यावी लागेल. साहित्यिकांनी आता लेखणीचा नांगर करून शेतकऱ्यांचे प्रश्न साहित्यातून मांडायला हवेत. इंडिया आणि भारत यांची तुलना करत त्यांनी भारत सरपटत सरपटत आपले अस्तित्व शोधत असल्याची खंत व्यक्त केली. दुधाचे दर, शेतीमालाला हमीभाव यावरील वात्रटिकेतून त्यांनी सरकारी धोरणांवर आसूड ओढले.डॉ. जाधव म्हणाले, सहकारामुळे ग्रामीण भागाचा चेहरा बदलला, मात्र, यात स्वाहाकार घुसल्यानेच येथील अर्थव्यवस्था ढासळली. दरम्यान, ओडिशा येथील रेल्वे अपघात, किसान आंदोलन व शेतकरी आत्महत्येमधील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वागत केले. किरण पाटील व स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जयकुमार कोले यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी