शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
2
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
3
हर्षित राणाला गौतम गंभीर इतक्या वेळा संधी का देतो? व्हायरल VIDEO मध्ये सापडलं उत्तर
4
सोन्यापेक्षा चांदीची किंमत दुप्पट! चांदीने दिला ८५% रिटर्न, लवकरच २ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणार?
5
केंद्राचा मोठा निर्णय; पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलले, ‘सेवा तीर्थ’ नावाने ओळखले जाणार
6
न्यूयॉर्कमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे बालपणीचे घर विक्रीला निघाले;  २०१६ मध्ये ट्रम्प यांना आठवण झालेली...
7
कमाल झाली! चाहता मैदानात घुसला; सामना थांबला आणि हार्दिक पांड्यानं हसत सेल्फीसाठी दिली पोझ
8
स्कूटी घेऊन जाताना कोसळला, २७ वर्षीय विनीतचा हार्ट अटॅकने मृत्यू; धडकी भरवणारा Video
9
पाकिस्तानमध्ये 'एचआयव्ही'चा कहर! १५ वर्षांत रुग्णसंख्या तिपटीने वाढली; लहान मुलांनाही संसर्ग! 
10
भाडे देणे म्हणजे खर्च नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य! घर खरेदीच्या मोहात पडण्यापूर्वी 'हे' गणित समजून घ्या!
11
Video: विराट - गंभीरमधील वाद ताणला गेला का? एअरपोर्टवर सिलेक्टरशी किंग कोहलीशी गंभीर चर्चा
12
कर्जमुक्त असलेल्या कंपनीच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या, २०% चं अपर सर्किट; ₹३३ वर आली किंमत
13
"प्रत्येक नागरिकाच्या फोनमध्ये प्रवेश कशाला?"; 'संचार साथी' ॲपवरुन प्रियांका गांधींचा केंद्राला थेट सवाल
14
कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण? 
15
१५ डिसेंबरपूर्वी करा 'हे' महत्त्वाचं काम; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
16
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
17
अरेरे! "५ लाख वाया गेले, माझी सर्व अब्रू गेली..."; नवरदेवाची व्यथा, नवरीने २० मिनिटांत मोडलं लग्न
18
पती की राक्षस? हुंड्यासाठी पत्नीचा छळ; नवऱ्याने इंजेक्शनं टोचली, तर नणंदबाईने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या!
19
Gold Silver Price Today: मोठ्या तेजीनंतर आज सोन्या-चांदीचे दर घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची किंमत
20
Prajakta Gaikwad Wedding: खुटवड कुटुंबाची सून झाली प्राजक्ता गायकवाड, खऱ्या आयुष्यातही शंभुराजांशी बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांनी लेखनीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी घातली साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 12:25 IST

कोल्हापुरात पार पडले पहिले नांगरट साहित्य संमेलन

कोल्हापूर : स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कोणत्याच राज्यकर्त्यांनी देशातील गावखेड्यांतील हातांना रोजगार उपलब्ध केला नाही, त्यामुळे गावे ओस पडत आहेत. या भूमीची, मातीची, बळीराजाची राज्यकर्त्यांनी कधीच कदर केली नाही. मात्र, साहित्यिकांनी तरी लेखणीची माध्यमातून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडावी, अशी साद ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी साहित्यिकांना घातली.स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवार सामाजिक विकास व संशोधन संस्था यांच्या वतीने कोल्हापुरात रविवारी (दि.४) आयोजित केलेल्या राज्यातील पहिल्या नांगरट साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून वाघ बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवनातील वि. स. खांडेकर सभागृहात आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते नांगराचा फाळ व खिलार बैलजोडीचे पूजन करून करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप व पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. माजी खासदार व संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.ज्ञानेश्वरांनी कित्येक शतकांपूर्वी येथील शेतकऱ्यांची व्यथा, त्यांचे योगदान ओवीतून मांडले. पण, कोणत्याच सत्ताधाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही. पाणी हेच येथील शेतकरी आत्महत्येचे मूळ कारण आहे. त्यामुळे हा प्रश्न पहिल्यांदा सोडविणे गरजेचे आहे. देशातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाटा कृषी क्षेत्राचा असूनही तो घटकच का बेदखल केला जात आहे, असा सवाल वाघ यांनी उपस्थित केला.स्वातंत्र्यानंतर खेड्यात रोजगार,सुविधा देण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळेच गावाकडची मुले शहराची वाट धरत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या अनेक कवितांच्या पंक्तीतून त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना सरकारच्या धाेरणांचेही वाभाढे काढले.रामदास फुटाणे म्हणाले, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर जात-पात-धर्म याच्या पलीकडे जाऊन भूमिका घ्यावी लागेल. साहित्यिकांनी आता लेखणीचा नांगर करून शेतकऱ्यांचे प्रश्न साहित्यातून मांडायला हवेत. इंडिया आणि भारत यांची तुलना करत त्यांनी भारत सरपटत सरपटत आपले अस्तित्व शोधत असल्याची खंत व्यक्त केली. दुधाचे दर, शेतीमालाला हमीभाव यावरील वात्रटिकेतून त्यांनी सरकारी धोरणांवर आसूड ओढले.डॉ. जाधव म्हणाले, सहकारामुळे ग्रामीण भागाचा चेहरा बदलला, मात्र, यात स्वाहाकार घुसल्यानेच येथील अर्थव्यवस्था ढासळली. दरम्यान, ओडिशा येथील रेल्वे अपघात, किसान आंदोलन व शेतकरी आत्महत्येमधील मृतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी स्वागत केले. किरण पाटील व स्वाती शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जयकुमार कोले यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी