शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

अस्तरीकरण करूनही पाणी गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड ...

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणातील गळती त्वरित रोखावी, अशी मागणी बोरवडे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागास दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली ३० ते ३५ वर्षे विना प्लास्टर उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे जमिनी क्षारपड व नापिक झाल्या. सध्या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाले असून निकृष्ट कामामुळे पूर्वीप्रमाणे शेतीमध्ये पाणी मिसळत असल्याने जमिनी खराब होत आहेत. अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती थांबेल असे वाटत होते; पण शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अस्तरीकरणानंतर एक महिन्याच्या आतच पूर्वीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी तुंबून शेती खराब होत आहे.

चौकट करणे :

‘काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम दर्जेदार झाले असून शेतकऱ्यांनी हे काम निकृष्ट झाल्याचा केलेला आरोप चुकीचा असून ज्या ठिकाणी जॉईंटमधून पाणी मुरते त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल.’

- अजिंक्य पाटील,

डेप्युटी इंजिनिअर, कोल्हापूर. फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथील उजव्या कॅनॉलमधून पाणी झिरपत आहे.