शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

अस्तरीकरण करूनही पाणी गळती थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड ...

बोरवडे : काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम निकृष्ट झाल्याने कालव्यातील पाणी झिरपून शेतात जात असल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. अस्तरीकरणातील गळती त्वरित रोखावी, अशी मागणी बोरवडे येथील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभागास दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेली ३० ते ३५ वर्षे विना प्लास्टर उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे जमिनी क्षारपड व नापिक झाल्या. सध्या संपूर्ण कालव्याचे अस्तरीकरण झाले असून निकृष्ट कामामुळे पूर्वीप्रमाणे शेतीमध्ये पाणी मिसळत असल्याने जमिनी खराब होत आहेत. अस्तरीकरणामुळे पाण्याची गळती थांबेल असे वाटत होते; पण शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. अस्तरीकरणानंतर एक महिन्याच्या आतच पूर्वीप्रमाणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी तुंबून शेती खराब होत आहे.

चौकट करणे :

‘काळम्मावाडी धरणाच्या उजव्या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम दर्जेदार झाले असून शेतकऱ्यांनी हे काम निकृष्ट झाल्याचा केलेला आरोप चुकीचा असून ज्या ठिकाणी जॉईंटमधून पाणी मुरते त्याची दुरुस्ती तत्काळ केली जाईल.’

- अजिंक्य पाटील,

डेप्युटी इंजिनिअर, कोल्हापूर. फोटो ओळी - बोरवडे (ता. कागल) येथील उजव्या कॅनॉलमधून पाणी झिरपत आहे.