शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

लाईक, शेअर अन् कमेंटस्... -दृष्टीक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:08 IST

सध्याचे युग हे डिजिटलचे आहे. या युगात कधी कशाला प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, कोंबडीचे एक साधे अंडे इन्स्टाग्रामवर इतका धुमाकूळ घालतंय की, ते जगात सर्वाधिक लाईक झालेले अंडे म्हणून प्रसिद्ध पावलंय. हा एक जागतिक विक्रम आहे.

ठळक मुद्देखरे काय खोटे काय याची पडताळणी केल्याशिवाय अशा पोस्टवर लाईक, शेअर अन् कमेंटस् करू नये.

चंद्रकांत कित्तुरेसध्याचे युग हे डिजिटलचे आहे. या युगात कधी कशाला प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. आता हेच पहा ना, कोंबडीचे एक साधे अंडे इन्स्टाग्रामवर इतका धुमाकूळ घालतंय की, ते जगात सर्वाधिक लाईक झालेले अंडे म्हणून प्रसिद्ध पावलंय. हा एक जागतिक विक्रम आहे. सोशल मीडियाचे जे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, त्यामध्ये व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्राम, आदींचा समावेश आहे. १९ वर्षांचा व्हायरल मार्केटिंग गुरू ईशान गोयल याने अंड्याची ही पोस्ट शेअर केली आहे. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या अंड्यामध्ये असे काय वेगळे आहे, तर काहीच नाही. गंमत म्हणून त्याने ते पोस्ट केले आणि हे अंडे इतके व्हायरल करा की, त्याचा विक्रम झाला पाहिजे, अशा आशयाची एक ओळ खाली टाकली. झाले..नेटकऱ्यांमध्ये त्याला लाईक आणि कमेंटस् करत फॉरवर्ड करण्याची अहमहमिका लागली. बघता बघता ८४ लाख फॉलोअर्स, फक्त २ पोस्टस् आणि लाईक्स-कमेंटस मिळून अब्जावधीचा प्रतिसाद या अंड्याला मिळाला. प्रतिसाद देणाºयांना यातून काय मिळाले माहीत नाही; पण एखाद्याने ठरवून आपल्याला ‘मामा’ बनवायचे ठरविले तर त्याला नेटकरी कसे बळी पडतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.

सध्याच्या गतिमान आणि धावपळीच्या जगात माणसाकडे रिकामा वेळ नाही असे म्हटले जाते. सहज बोलता बोलता आपण अरे, हल्ली वेळच म्हणत नाही कशाला, असे बोलून जातो; पण त्याचवेळी आपण सोशल मीडियावर किती वेळ घालवतो याचा कधीही विचार करत नाही. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन नागरिक वर्षातील ६१ प्रकारे सोशल मीडियावर आपला वेळ घालवतात. याचाच अर्थ आपल्या आयुष्यातील खूप मोठा वेळ सोशल मीडिया, दूरचित्रवाणी आणि व्हिडीओ गेमवर खर्च करतात. भारतातही फारसे वेगळे चित्र असेल असे वाटत नाही. भारतात तर प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आला आहे आणि जिओने इंटरनेटच्या माध्यमातून जिवाला जगभर भटकंती करायला स्वस्तात मोकळीक दिली आहे. त्यामुळे युवा पिढी सोशल मीडियावर किती वेळ वाया घालवते याची मोजदादच करता येत नाही.

अगदी अंथरूणातही डोक्यावर पांघरूण घेऊन आत व्हॉटस्अ‍ॅप किंवा फेसबुक पाहणारे महाभाग कमी नाहीत. दोन वर्षांपूर्वी भारतातील नोकरदारांचा सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये नोकरदार मंडळी आपला कामाचा ३२ टक्के वेळ सोशल मीडियावर घालवितात. उर्वरित वेळेत ते कार्यालयीन कामकाज पहातात, असा या सर्व्हेचा निष्कर्ष होता. हाच वेळ त्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी वापरला तर कशाला कामे मागे राहतील. बॉसची बोलणी खावी लागणार नाहीत. तसेच शासकीय कार्यालयातील जनतेची कामेही अडणार नाहीत. युवा पिढीने सोशल मीडियावर सक्रिय राहू नये असा याचा अर्थ नाही; पण जीवनात लक्ष्य ठरवून कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ द्यावयाचा हे निश्चित केले पाहिजे.

सध्या शारीरिक व्यायाम, खेळ याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तरुण वयातच अनेक आजार जडत असल्याच्याही तक्रारी आहेत. या गोष्टीसाठी आपण वेळ राखून ठेवला तर का राहणार नाही प्रकृती तंदुरुस्त? त्याचप्रमाणे सोशल मीडियावर आपण काय पहावे, काय नको याची जाणीव असायला हवी. खरेतर याबाबत प्रबोधनाचीच गरज आहे. अनेकजण येणाºया पोस्ट फारसा विचार न करताच फॉरवर्ड करीत असतात. काही पोस्ट आक्षेपार्ह असतात. न वाचता ती आपल्याकडून फॉरवर्ड झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. प्रसंगी जेलची हवाही खावी लागते. सोशल मीडियामुळे वाचनाची सवय मोडली गेली आहे. तरुण पिढी वाचतच नाही, असे सर्रास म्हटले जाते; पण हे खरे नाही. सोशल मीडियावर ती वाचतच असते. फक्त काय वाचायचे याचे भान तिला नसते. ते आणून देण्याची, काय वाचावे, काय पहावे हे शिकविण्याची गरज आहे.

सध्या भारतात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. या निवडणुकीतील प्रचाराची पद्धत आता पार बदलून गेली आहे. सोशल मीडिया हेच प्रचाराचे प्रमुख अस्त्र बनू पहात आहे. यातूनच आपल्याला हव्या तशा बातम्या व्हायरल केल्या जातात आणि राजकीय नेत्यांचे भक्त त्या फॉरवर्ड करीत राहतात. अशा बातम्यांचा फेकन्यूजच्या रुपाने आता महापूर येईल. या महापूरात खरे काय, खोटे काय हे जाणून घेण्याची क्षमता मतदारांकडे असली पाहिजे. खरे काय खोटे काय याची पडताळणी केल्याशिवाय अशा पोस्टवर लाईक, शेअर अन् कमेंटस् करू नये.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSocial Mediaसोशल मीडिया