शहरं
Join us  
Trending Stories
1
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
2
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
3
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
4
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
5
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
6
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
7
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
8
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
9
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
10
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
11
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
12
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
13
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
14
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!
15
Shaheen Afridi Pakistan New ODI Captain : रिझवानची 'उचलबांगडी'; आफ्रिदीच्या डोईवर 'कॅप्टन्सीचा ताज'
16
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
17
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
18
असरानी यांच्या निधनानंतर अक्षय कुमार भावुक; म्हणाला, "दोन आठवड्यांपूर्वीच..."
19
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
20
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या

पावसाची नुसतीच भुरभुर, मात्र पाणलोट क्षेत्रात जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:32 IST

अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

ठळक मुद्देपावसाची नुसतीच भुरभुर, मात्र पाणलोट क्षेत्रात जोरचित्री धरण ओसंडून: धरणातील पाणीसाठा वाढला

कोल्हापूर : अतिवृष्टीचा इशारा दिलेल्या हवामान खात्याला गुरुवारीही पावसाने हुलकावणी दिली. धुवाधार पावसाच्या अंदाजाच्या जागी दिवसभर नुसतीच भुरभुर सुरू राहिली. आश्लेषा नक्षत्राचे शेवटचे दोन दिवस उरले आहेत.

रविवारी मघा (सासूचा पाऊस) नक्षत्र निघत आहे. पाऊस जोर धरेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभर पावसाची भुरभुर राहिली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र जोर वाढल्याने पाणीसाठा वाढत चालला आहे.जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत १५.९५ च्या सरासरीने १९१ मिलिमीटर पाऊस पर्जन्यमापकावर नोंदवला गेला आहे. गगनबावड्यापेक्षा एक मि.मी.ने राधानगरीत जास्त पाऊस झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात असे प्रथमच घडले आहे.

राधानगरीत ३१, गगनबावड्यात ३०, शाहूवाडी २५, चंदगड २३, भुदरगड २०, पन्हाळा १९, आजरा १८, गडहिग्लज ८, करवीर ७, कागल ४, हातकणंगले २, शिरोळ १ मि.मी. असा पाऊस झाला आहे.पाऊस कमी झाल्याने पूरही ओसरला असून नद्यांचे पाणी पात्रात आले आहे. मात्र नदीकाठ अजून गाळाने भरलेला आहे. अजूनही २५ बंधारे पाण्याखाली आहेत. तथापि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. गुरुवारी २७ ते ९४ मि.मी. असा पाऊस झाला आहे.

पाऊस असल्याने धरणे एकापाठोपाठ एक ओसंडून वाहत आहेत. गुरुवारी दुपारी आजऱ्यातील चित्री धरण १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले. याआधीच राधानगरी, जांबरे, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे, ही धरणे १०० टक्के भरली असल्याने ही संख्या आता सहावर पोहोचली आहे. काळम्मावाडी धरण ९० टक्के भरले आहे. वारणा ८४ टक्के, तर तुळशी ८६ टक्के भरले आहे.तुळशी, चिकोत्रा वगळता सर्व धरणांतून विसर्गतुळशी, चिकोत्रा वगळता जिल्ह्यातील सर्व १२ प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राधानगरीचा तीन क्रमांकाचा एक दरवाजा खुला असून २८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणेतून ७२११, काळम्मावाडीतून ४४००, कासारीतून १७५०, जांबरेतून १२५६, घटप्रभातून १०६९ असा सर्वाधिक विसर्ग सुरू आहे. अन्य प्रकल्पांतून १०० ते ४०० क्युसेक असा किरकोळ विसर्ग होत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर