शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

रस्त्यावरचं जगणं आलं नशिबी

By admin | Updated: March 18, 2015 00:08 IST

दोनशे अभयारण्यग्रस्तांचा ठिय्या : १५ वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसाठी सुरू आहे लढा

कोल्हापूर : सरकारचा कायदा आणि अधिकाऱ्यांच्या कामकाजातील उदासीनता यामुळे सर्वसामान्यांना कसा चटका बसतो, याचा अनुभव सध्या चांदोली अभयारण्यग्रस्त घेत आहेत. गेली १५ वर्षे हक्काच्या जमिनी मागण्यांसाठी संघर्ष करूनही पदरी निराशाच पडल्यामुळे जगण्याची अंतिम लढाई करण्यास नव्याने सज्ज झालेल्या दोनशेहून अधिक अभयारण्यग्रस्तांनी आता मागे हटायचं नाही, या इराद्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशीही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. १५ वर्षे सातत्याने मागणी, विनंत्या करून तसेच आंदोलने करून कंटाळलेल्या अभयारण्यग्रस्तांनी जमिनीचे आदेश व सातबारा घेऊनच गावाकडे परत जायचं, असा निर्धार केला आहे. थकलेले हात-पाय, सुकलेले चेहरे आणि मदतीची आस लागलेल्या या धरणग्रस्तांच्या मनात आजही कोणीतरी धावून येईल आणि आपल्याला हक्काच्या जमीन देईल, अशी अपेक्षा आहे; परंतु ही प्रतीक्षा आणखी किती दिवसांची आहे, याची मात्र त्यांना कल्पना नाही. परंतु, त्यांचा इरादा पक्का आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून हलायचे नाही, असा निर्धार ठाम आहे. त्यामुळे सोबत येताना सोमवारी धान्य, आवश्यक कपडे जीवनावश्यक वस्तू, आदी सोबत आणल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्ता व फुटपाथ हेच त्यांच्या जगण्याचा आधार बनला आहे. कडाक्याच्या उन्हात, झाडांच्या सावलीत मग रात्रीच्यावेळी डास व दुर्गंधीचा सामना करत दिवस काढावे लागणार आहेत. या आंदोलनात साधारणपणे ५० ते ६० वयोगटांतील महिला व पुरुष सहभागी झाले आहेत. मंगळवारी संतोष देवजी गोटल या व्यक्तीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. सोमवारपासून हे अभयारण्यग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले आहेत; परंतु प्रशासनातर्फे त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगळवारी अभयारण्यग्रस्तांचे पाण्यावाचून हाल झाले. फिरते शौचालय मात्र आंदोलनाच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. चर्चेतून मार्ग काढण्यास अपयशसोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, पुनर्वसन अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांशी अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी डॉ. भारत पाटणकर, संपत देसाई, मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, शंकर पाटील, आदी उपस्थित होते. १९ मार्चपर्यंत जर बैठक घेऊन अभयारण्यग्रस्तांच्या प्रश्नात मार्ग काढला नाही, तर वन्यजीव विभाग कार्यालयात घुसण्याचा इशारा देण्यात आला. दफनभूमी, स्मशानभूमीची जागा देणारअतिरिक्त जिल्हाधिकारी पवार यांनी ढाकाळे वसाहत पारगाव येथे दफनभूमीला जमिनीचा ताबा देण्याचे, तसेच सोनार्ली वसाहत भेंडवडे स्मशानभूमीला जागा देण्याबाबतचे आदेश काढतो, असे आश्वासन दिले. संकलन याद्या २६ मार्चपर्यंत गावचावडीवर लावण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. घरबांधणी अनुदानाची यादी कार्यकारी अभियंता इस्लामपूर यांच्याकडे पाठविण्याचेही बैठकीत ठरले. अंबाईवाडी उकळूपैकी (ता. शाहूवाडी) या वाडीचा पुनर्वसनाचा प्रस्ताव वन्यजीव विभागाने तयार करण्याचे मान्य केले. ‘महसूल’च्या वन्यजीव विभागाला सूचना अभयारण्यग्रस्तांच्या मागणीप्रमाणे ३५५ हेक्टर जमीन संपादनासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, २४० हेक्टर ६१ आर. जमीन तातडीने निर्वाणीकरण करून द्यावी, तालिघरे व संपादनातून चुकलेल्या जमिनींचे वाटप करावे, आदी सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी पवार यांनी वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. विनंती केली अमान्य अभयारण्यग्रस्तांनी आपल्या मागण्यांबाबत वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करावे, अशी पवार यांनी केलेली सूचना आंदोलकांनी अमान्य केली. त्यामुळे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सुरू राहणार आहे.