शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता - : चाईल्डलाईन संस्थेचे अनमोल कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 01:11 IST

बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआठ वर्षांतील आकडेवारी: जागतिक बालकामगारविरोधी दिन आज

इंदूमती गणेश ।कोल्हापूर : बालहक्क संरक्षणासाठी काम करणाऱ्या चाईल्डलाईन संस्थेने गेल्या आठ वर्षांत कोल्हापूर शहरात विविध ठिकाणी काम करणाºया अडीचशेहून अधिक बालकामगारांची मुक्तता केली आहे. यात यावर्षी मुक्त केलेल्या ३० बालकामगारांचा समावेश आहे. मात्र, अशा मुक्त केलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे नियोजित कृती आराखडा नसल्याने या बालकांचे पुढे काय होते, हा प्रश्न अधांतरीच राहतो. आज, बुधवारी जागतिक बाल कामगारविरोधी दिन आहे. त्यानिमित्ताने.

कायद्याने वय वर्षे १८ च्या आतील मुलांकडून काम करवून घेणे अथवा त्यांना भिकेला लावणे हा गुन्हा आहे. २०१२ च्या कायद्यानुसार गॅरेज, विडी कारखाने, कापड कारखाने, काचेचे कारखाने, खाण अथवा हॉटेल, विविध आस्थापना, कार्यालयांमध्ये काम करणारी, रस्त्यांवर खेळणी विकणे, भीक मागणारी मुले ही बालकामगार म्हणून ओळखली जातात. कोल्हापूर शहरात भवानी मंडप, महाद्वार रोड, बिंदू चौक, चप्पल लाईन, स्टॅँड, रेल्वे स्टेशन अशा भागांत हे बालकामगार आढळतात. गरिबी, अनाथपण, शिक्षणाचा अभाव, कौटुंबिक कलह, पालकांचे आजारपण यामागची कारणे आहेत.

आॅगस्ट २०११ पासून आतापर्यंत चाईल्डलाईन संस्थेने अडीचशेहून अधिक बालकामगारांना मुक्त केले आहे. या बालकांच्या पालकांना समज देऊन सोडले जाते. बालकामगारांचा शोध घेण्यासाठी धाडी टाकल्या जातात. मात्र पूर्वकल्पना आधीच मिळाल्याने यात पथकाच्या हाती फार काही लागत नाही.पुनर्वसनाचा प्रश्न अधांतरीच : मुक्त झालेले बालकामगार अनाथ असतील तर त्यांना बालकल्याण संकुलासारख्या संस्थांमध्ये पाठविले जाते. पालक असतील तर त्यांना समज दिली जाते. मालकावर गुन्हा दाखल झालेल्या केसेस नसल्यात जमा आहेत. या बालकांना व्यसनाधीनता, पैशांची चटक लागल्याने गुन्हेगारीसारखे वळण लागते. संस्थेत रवानगी झालेल्या बालकांना बंदिस्तपणे जगण्याची सवय नसते. शाळा मध्येच सुटल्याने शिक्षणातही रस नसतो. अशा मुलांच्या पुनर्वसनाचा फार मोठा प्रश्न आहे. या बालकांना पु्न्हा शिक्षण, समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ठोस यंत्रणा नसल्याने हा विषय अधांतरीच आहे.परप्रांतीयांचे प्रमाण अधिकगेल्या काही वर्षांत बालकामगारांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सध्या जे काही रस्त्यांवर विविध साहित्याची विक्री करणारे बालकामगार आढळतात, ते मुख्यत्वे बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील आहेत. यातील बहुतांश मुले आई किंवा वडिलांसोबत कोल्हापुरात येऊन चरितार्थ चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे; तर काहीजण पैसे मिळविण्यासाठी मालकांकडे काम करतात. याशिवाय हुपरी, रुकडी तसेच झोपडपट्टीच्या परिसरातील शाळाबाह्य मुले मोलमजुरी करतात. 

बालकामगारांना मुक्त करून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी ‘चाईल्डलाईन’ संस्था काम करते; पण बालमजुरी आणि बालभिकारी या दोन्ही विषयांमध्ये त्या-त्या क्षणी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असते. काम करून पोट भरताहेत ना, असा विचार न करता त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. - अनुजा खुरंदळ, समन्वयक, चाईल्डलाईन

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन