शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

दूध व्यवसाय कोलमडणार नाही, याची काळजी घेऊ : गोयल यांची शेट्टी यांना ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 10:42 IST

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेमुळे देशातील दूध उत्पादक व एकूणच दूध व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली.

ठळक मुद्देदूध व्यवसाय कोलमडणार नाही, याची काळजी घेऊ : गोयल यांची शेट्टी यांना ग्वाही‘आरसीईपी’ योजनेने दूध उत्पादक येणार अडचणीत

कोल्हापूर : प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) योजनेमुळे देशातील दूध उत्पादक व एकूणच दूध व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी केंद्र सरकार घेणार आहे, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना दिली.‘आरसीईपी’या योजनेमुळे देशातील दूध व्यवसाय अडचणीत येणार आहे, याबाबत शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गोयल यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहून या योजनेतील धोके स्पष्ट केले.केंद्र सरकारने देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांशी आयात-निर्यातीबाबतचे अनेक करार करण्यात येणार आहेत.

दूध व्यवसायाबाबत न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया या देशांशी उपपदार्थांबाबत करार केला जाणार आहेत. सध्या भारत हा दूध व दुग्धजन्य पदार्थ उत्पादन करण्यात आघाडीवर आहे. न्यूझीलंड व आॅस्ट्रेलिया येथून उपपदार्थ आयात होऊ लागले, तर देशांतर्गत बाजारपेठ पूर्णपणे कोलमडून जाईल.

परिणामी, देशात १० कोटी असणारा दूध उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे दूध अथवा शेतीबाबत निर्णय घेत असताना देशातील सर्व शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे केली.यावर देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्याबरोबरच रोजगार वाढवून महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शुन्य टक्के आयात शुल्क आकारून दुग्धजन्य पदार्थ आयात केले तरी येथील व्यवसाय कोलमडणार नाही याची काळजी घेऊ, अशी ग्वाही गोयल यांनी दिली.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाpiyush goyalपीयुष गोयलRaju Shettyराजू शेट्टीmilkदूधkolhapurकोल्हापूर