शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

विधान परिषद निवडणूक : अर्ज माघारीनंतर अमल महाडिक म्हणाले..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 17:15 IST

अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.

कोल्हापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागेसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला होता. यासाठी १० डिसेंबरला मतदान होणार होते. महाविकास आघाडीतील सर्वच पक्षानी तसेच विरोधी भाजपनेही या निवडणुकीसाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. यातच गेल्या दोन दिवसापासून ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेला ऊत आला. त्यातच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत गेल्याने या चर्चेला आणखी जोर चढला होता. या सर्व चर्चा आज खऱ्या ठरल्या.काँग्रेस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. यात कोल्हापूरच्या जागेचाही समावेश होता. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने सर्वाच्या नजरा अर्ज माघारीकडे लागून राहिल्या होत्या. अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना फोन करुन अमल व शौमिका महाडिक यांचा अर्ज माघारी घेण्याची सूचना केली. यानंतर लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जात अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यामुळे महाविकास आघाडीचे व काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांची आमदारपदी बिनविरोध निवड झाली.अर्ज माघारीनंतर अमल महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपले मत मांडले आहे. पक्षाआदेशावरून निवडणूक लढवत होतो आणि पक्षाच्या आदेशावरून थांबतोय असे त्यांनी या पत्रकातून म्हटले आहे.या पत्रात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षं महाडिक साहेबांनी या जागेवर विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण आज अचानक दिल्लीतुन वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.. आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार मी आज माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाल्यापासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे मोठे बंधू धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे, आमदार विनय कोरे, जयंत पाटील सर तसेच सर्व ज्ञात-अज्ञात नेते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माझ्या पक्षातील सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य व जीवापाड प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो.कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAmal Mahadikअमल महाडिकVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक