शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

विधानसभेला ‘एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही’

By admin | Updated: July 21, 2014 00:41 IST

रमाकांत खलप : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीत मोदींच्या वादळाने कॉँग्रेसला धक्का दिला. मात्र, वादळ पुन्हा-पुन्हा येत नसते. आगामी विधानसभा निवडणूक ही एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही, असा लढा आहे. हा लढा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धाराने प्रचार यंत्रणा राबवावी, असे आवाहन अखिल भारतीय कॉँग्रेस समितीचे समन्वयक रमाकांत खलप यांनी केले.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील कॉँग्रेस समितीत आज, रविवारी कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते.खलप म्हणाले, आपल्यातील अंतर्गत गटबाजी, रस्सीखेच बाजूला ठेवून वज्रमूठ करावी आणि एकजूटता कशी असावी, हे दाखवून द्यावे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून कॉँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटावे, असे ते म्हणाले. माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, जनमाणसांत निर्माण झालेल्या वातावरणाचा फटका गत लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसला बसला आहे. भाजपचा भपकेपणाचा फुगा आता फुटला आहे. ‘अच्छे दिन’पेक्षा होते तेच दिवस चांगले होते, अशी म्हणायची वेळ आली आहे. त्यामुळे मरगळ झटकून कामाला लागावे. कॉँग्रेस पक्षानेही उमेदवारीची घोषणा सत्वर करण्याची गरज आहे.माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी, आम्हीच आमचे शत्रू बनल्याने पराभवाला तोंड द्यावे लागले. मात्र, इथून पुढच्या काळात हातात हात घालून पक्षाला नव्याने उभारी देणार असल्याचे सांगितले. जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ जागांवर उमेदवारांची नावे जवळजवळ निश्चित झाली आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत कॉँग्रेसमध्ये कोणताही तंटा नाही, असे स्पष्ट केले.यावेळी प्रसाद खोबरे, शहर कॉँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, आदींची भाषणे झाली. आपल्या भाषणामध्ये अनेक नेत्यांनी प्रकाश आवाडेंना उमेदवारी द्यावी, या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्या. नगरसेवक शशांक बावचकर यांनी प्रास्ताविकात कॉँग्रेसच्या माध्यमातून केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शिक्षण सभापती तौफिक मुजावर यांनी केले. कार्यक्रमास नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश सातपुते, अशोक आरगे, सांगली जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, शहर महिला कॉँग्रेस अध्यक्षा अंजली बावणे, किशोरी आवाडे, राहुल खंजिरे, शेखर शहा, रमेश कबाडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)२००९ च्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत : पी. एन. २००९ च्या पराभवाला राष्ट्रवादी कारणीभूत आहे, असा थेट आरोप करीत माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सहकारी पक्षाने दगा दिल्याचे सांगितले. भाजपच्या मुख्य प्रचारात नेत्यांच्या स्टेजवर सहकारी पक्षाचे लोक जाऊन बसले. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.